शहरं
Join us  
Trending Stories
1
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
2
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
5
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
6
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
7
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
8
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
9
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
10
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
11
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
12
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
13
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
14
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

होय, अशीच आदर्श विवाह पद्धती हवी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 03, 2020 10:52 AM

अफाट श्रीमंतापासून ते कमालीचे दारिद्र्य असलेल्यापर्यंतचे सगळेच रस्त्यावर आले.

लग्न अथवा विवाह म्हटलं की वर आणि वधू दोघांच्याही आईबापाचे कंबरडे मोडलेच समजा. दोन नवदाम्पत्यांना संसाराचे सोपस्कार सुरू करण्यासाठी मंडपापासून देवदेवस्की करण्यापर्यंत अनेकानेक समस्यांना सामोरे जावे लागते. आर्थिक झळ बसल्याशिवाय लग्न होणेच शक्य नाही. अगदी वधूशोधापासून सुरू झालेली ही कथा अक्षता पडेपर्यंतच नव्हे तर त्या नंतरच्याही विधीपर्यंत चालूच असते. कांदापोहेपासून ते गोंधळाच्या जेवणापर्यंत घरच्यांचा नुसता गोंधळ उडालेला असतो. त्यामुळे साहजिकच सगळे गोंधळलेले असतात.

लग्नाशी संबंधित मंडप, मंगल कार्यालय, कपडेलत्ते, अल्पोपहार, सुग्रास जेवण, डेकोरेशन, वेगवेगळ्या प्रकारच्या विधीक्रिया, घोडा, बॅन्डबाजा, फटाके, भेटवस्तू, मुंडावळ्या, बाशिंग, रुखवत, भटजीबुवा, पूजापाठ, हारतुरे यासारख्या अनेक बाबी येतात आणि खूप मोठा खर्च आई-वडिलांना सोसावा लागतो. मग या खर्चासाठी वर-वधू दोघांच्याही आई-वडिलांना बँक, सोसायट्या, सावकारीच्या विळख्यातून जावे लागते. भरमसाठ झालेल्या खर्चामुळे पुढे आयुष्यभर पै-पैचा हिशोब चुकता करण्यासाठी चपला झिजवाव्या लागतात. आधीपासूनच या खर्चासाठी केलेल्या योग्य नियोजनामुळे काहींची या विळख्यातून सुटका होते. गडगंज संपत्ती असणाºयांना ही झळ पोहोचतच नाही, परंतु सर्वसामान्यांच्या पाचवीला पूजलेलं हे चक्र मात्र जास्तच त्रासदायक ठरते.

प्रचलित लग्न वा विवाह सोहळ्यामुळे बºयाच लोकांना त्रास झाला अन् होतो आहे आणि यात काहीच बदल नाही झाले तर त्रास होतच राहणार. आमच्याच  एका नातेवाईकांनी ऐपत नसतानाही मुलाचं धूमधडाक्यात लग्न लावून दिलं. उसनेपासने करून कसाबसा विवाह सोहळा पार पडला परंतु विवाहानंतर दुसºयाच महिन्यापासून देणेकरी वाट अडवू लागले. शेवटी वैतागून घर विकून देणेकºयांचे समाधान करून ते घरापासूनच परागंदा झाले. सांगा तुम्हीच काय म्हणावे या वृत्तीला? ही झाली आर्थिक विवंचनेची बाजू. नातेवाईकातील रूसवे फुगवे, उपस्थित राहणाºयांची कमी अधिक संख्या, जेवणावळीवरून होणारे वाद, कपडेलत्त्यांमुळे होणारी नाराजी, नात्यानात्यातील कलह, या असंख्य कारणांमुळे होणारा मानसिक त्रास परिणामी मनावर येणारा ताण याशिवाय सामाजिक बांधिलकीमुळे होणारा त्रासही आहेच म्हणा. या साºया कारणांमुळेच, ‘लग्न करणे म्हणजे आयुष्यातील मोठी चूक’ वाटते.

कोरोना महामारीमुळे संपूर्ण विश्वच स्थितप्रज्ञ झाले. अफाट श्रीमंतापासून ते कमालीचे दारिद्र्य असलेल्यापर्यंतचे सगळेच रस्त्यावर आले. इतर देशांप्रमाणे भारतही कुलूपबंद झाला आणि सगळ्यांच्या तोंडचे पाणीच पळाले, जगण्या मरण्यात भ्रांत निर्माण झाली. शासकीय, खासगी, सहकारी, मालकी सर्वच संस्था बंद झाल्या. अगदी हातावर पोट असणाºयांनाही घरीच राहण्याची सक्ती झाली. त्यामुळे साहजिकच सगळ्यांचे सर्वच नियोजन कोलमडले. त्यात विवाह सोहळेही आलेच म्हणा. अगदी तोंडावर लग्न असणाºयांनाही तोंडावर बोट आणि डोळ्यावर पट्टी बांधण्याची वेळ आली. विवाहेच्छुकांचा हिरमोड झाला. अ‍ॅडव्हान्स बुकिंगमुळे धाबेही दणाणले. अगदी जूनपर्यंत सगळं काही चिडीचूप. अनलॉक सुरू झाले अन् सगळेच पुन्हा वेगवेगळ्या नियोजनामागे लागले. लग्नघटिका समीप येऊन लॉकडाऊनच्या शिक्षेमुळे हिरमुसलेले पुन्हा प्रफुल्लित झाले. आता लग्नाला परवानगी मिळाली खरी परंतु ठरलेल्या चाकोरीच्या बाहेर न जाण्याची तंबीही मिळाली. ५० च्यावर वºहाडी नाकारले गेले. मग आलीच की पंचाईत. पण यामुळे आईबापावरील प्रचंड ताण मात्र कमी झाला. मोजक्याच ५० भाग्यवान वºहाडामुळे आता सगळेच सुरळीत होणार याची खात्री झाली बरं का!

अशाच एका आदर्श विवाहाचे आम्ही आॅनलाईन साक्षीदार ठरलो. नवापूर (नंदूरबार) येथील आमचे ज्येष्ठ सन्मित्राचे चिरंजीव नुकतेच विवाहबद्ध झाले. ना सनई चौघडा, ना मिरवणूक, ना बडेजाव आणि विशेष म्हणजे ना वायफळ खर्च पण शांत, सुंदर, शिस्तबद्ध लग्नसोहळा संपन्न झाला. लग्नात उपस्थित होते त्यांनी लांबून आणि जे नव्हते त्यांनी हवाईमार्गे (आॅनलाईन) शुभेच्छा, आशीर्वाद देऊन नवदाम्पत्याच्या नवसंसाराला श्रीगणेशा करण्यासाठी प्रेरणा दिली. मग सांगा इथे शारीरिक, मानसिक, सामाजिक, आर्थिक ताण पडला का? नाही ना! होय म्हणूनच आदर्श विवाहपद्धतीची सुरुवात झाली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कोरोना आज ना उद्या संपेल परंतु कोरोनामुळे झालेला हा बदल परिवर्तनीय आहे आणि यापुढेही अशाचप्रकारे विवाह सोहळे होण्यास काय हरकत आहे?- आनंद घोडके,(लेखक शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत.) 

टॅग्स :Solapurसोलापूरmarriageलग्न