शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
3
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
4
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांचा महायुतीला मोठा धक्का; एका क्लिकवर वाचा निकाल
6
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
7
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
8
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
9
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
10
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
12
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
13
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
14
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
15
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
16
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
17
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
18
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
19
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
20
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

होय, अशीच आदर्श विवाह पद्धती हवी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 10:52 IST

अफाट श्रीमंतापासून ते कमालीचे दारिद्र्य असलेल्यापर्यंतचे सगळेच रस्त्यावर आले.

लग्न अथवा विवाह म्हटलं की वर आणि वधू दोघांच्याही आईबापाचे कंबरडे मोडलेच समजा. दोन नवदाम्पत्यांना संसाराचे सोपस्कार सुरू करण्यासाठी मंडपापासून देवदेवस्की करण्यापर्यंत अनेकानेक समस्यांना सामोरे जावे लागते. आर्थिक झळ बसल्याशिवाय लग्न होणेच शक्य नाही. अगदी वधूशोधापासून सुरू झालेली ही कथा अक्षता पडेपर्यंतच नव्हे तर त्या नंतरच्याही विधीपर्यंत चालूच असते. कांदापोहेपासून ते गोंधळाच्या जेवणापर्यंत घरच्यांचा नुसता गोंधळ उडालेला असतो. त्यामुळे साहजिकच सगळे गोंधळलेले असतात.

लग्नाशी संबंधित मंडप, मंगल कार्यालय, कपडेलत्ते, अल्पोपहार, सुग्रास जेवण, डेकोरेशन, वेगवेगळ्या प्रकारच्या विधीक्रिया, घोडा, बॅन्डबाजा, फटाके, भेटवस्तू, मुंडावळ्या, बाशिंग, रुखवत, भटजीबुवा, पूजापाठ, हारतुरे यासारख्या अनेक बाबी येतात आणि खूप मोठा खर्च आई-वडिलांना सोसावा लागतो. मग या खर्चासाठी वर-वधू दोघांच्याही आई-वडिलांना बँक, सोसायट्या, सावकारीच्या विळख्यातून जावे लागते. भरमसाठ झालेल्या खर्चामुळे पुढे आयुष्यभर पै-पैचा हिशोब चुकता करण्यासाठी चपला झिजवाव्या लागतात. आधीपासूनच या खर्चासाठी केलेल्या योग्य नियोजनामुळे काहींची या विळख्यातून सुटका होते. गडगंज संपत्ती असणाºयांना ही झळ पोहोचतच नाही, परंतु सर्वसामान्यांच्या पाचवीला पूजलेलं हे चक्र मात्र जास्तच त्रासदायक ठरते.

प्रचलित लग्न वा विवाह सोहळ्यामुळे बºयाच लोकांना त्रास झाला अन् होतो आहे आणि यात काहीच बदल नाही झाले तर त्रास होतच राहणार. आमच्याच  एका नातेवाईकांनी ऐपत नसतानाही मुलाचं धूमधडाक्यात लग्न लावून दिलं. उसनेपासने करून कसाबसा विवाह सोहळा पार पडला परंतु विवाहानंतर दुसºयाच महिन्यापासून देणेकरी वाट अडवू लागले. शेवटी वैतागून घर विकून देणेकºयांचे समाधान करून ते घरापासूनच परागंदा झाले. सांगा तुम्हीच काय म्हणावे या वृत्तीला? ही झाली आर्थिक विवंचनेची बाजू. नातेवाईकातील रूसवे फुगवे, उपस्थित राहणाºयांची कमी अधिक संख्या, जेवणावळीवरून होणारे वाद, कपडेलत्त्यांमुळे होणारी नाराजी, नात्यानात्यातील कलह, या असंख्य कारणांमुळे होणारा मानसिक त्रास परिणामी मनावर येणारा ताण याशिवाय सामाजिक बांधिलकीमुळे होणारा त्रासही आहेच म्हणा. या साºया कारणांमुळेच, ‘लग्न करणे म्हणजे आयुष्यातील मोठी चूक’ वाटते.

कोरोना महामारीमुळे संपूर्ण विश्वच स्थितप्रज्ञ झाले. अफाट श्रीमंतापासून ते कमालीचे दारिद्र्य असलेल्यापर्यंतचे सगळेच रस्त्यावर आले. इतर देशांप्रमाणे भारतही कुलूपबंद झाला आणि सगळ्यांच्या तोंडचे पाणीच पळाले, जगण्या मरण्यात भ्रांत निर्माण झाली. शासकीय, खासगी, सहकारी, मालकी सर्वच संस्था बंद झाल्या. अगदी हातावर पोट असणाºयांनाही घरीच राहण्याची सक्ती झाली. त्यामुळे साहजिकच सगळ्यांचे सर्वच नियोजन कोलमडले. त्यात विवाह सोहळेही आलेच म्हणा. अगदी तोंडावर लग्न असणाºयांनाही तोंडावर बोट आणि डोळ्यावर पट्टी बांधण्याची वेळ आली. विवाहेच्छुकांचा हिरमोड झाला. अ‍ॅडव्हान्स बुकिंगमुळे धाबेही दणाणले. अगदी जूनपर्यंत सगळं काही चिडीचूप. अनलॉक सुरू झाले अन् सगळेच पुन्हा वेगवेगळ्या नियोजनामागे लागले. लग्नघटिका समीप येऊन लॉकडाऊनच्या शिक्षेमुळे हिरमुसलेले पुन्हा प्रफुल्लित झाले. आता लग्नाला परवानगी मिळाली खरी परंतु ठरलेल्या चाकोरीच्या बाहेर न जाण्याची तंबीही मिळाली. ५० च्यावर वºहाडी नाकारले गेले. मग आलीच की पंचाईत. पण यामुळे आईबापावरील प्रचंड ताण मात्र कमी झाला. मोजक्याच ५० भाग्यवान वºहाडामुळे आता सगळेच सुरळीत होणार याची खात्री झाली बरं का!

अशाच एका आदर्श विवाहाचे आम्ही आॅनलाईन साक्षीदार ठरलो. नवापूर (नंदूरबार) येथील आमचे ज्येष्ठ सन्मित्राचे चिरंजीव नुकतेच विवाहबद्ध झाले. ना सनई चौघडा, ना मिरवणूक, ना बडेजाव आणि विशेष म्हणजे ना वायफळ खर्च पण शांत, सुंदर, शिस्तबद्ध लग्नसोहळा संपन्न झाला. लग्नात उपस्थित होते त्यांनी लांबून आणि जे नव्हते त्यांनी हवाईमार्गे (आॅनलाईन) शुभेच्छा, आशीर्वाद देऊन नवदाम्पत्याच्या नवसंसाराला श्रीगणेशा करण्यासाठी प्रेरणा दिली. मग सांगा इथे शारीरिक, मानसिक, सामाजिक, आर्थिक ताण पडला का? नाही ना! होय म्हणूनच आदर्श विवाहपद्धतीची सुरुवात झाली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कोरोना आज ना उद्या संपेल परंतु कोरोनामुळे झालेला हा बदल परिवर्तनीय आहे आणि यापुढेही अशाचप्रकारे विवाह सोहळे होण्यास काय हरकत आहे?- आनंद घोडके,(लेखक शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत.) 

टॅग्स :Solapurसोलापूरmarriageलग्न