शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

होय, अशीच आदर्श विवाह पद्धती हवी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2020 10:52 IST

अफाट श्रीमंतापासून ते कमालीचे दारिद्र्य असलेल्यापर्यंतचे सगळेच रस्त्यावर आले.

लग्न अथवा विवाह म्हटलं की वर आणि वधू दोघांच्याही आईबापाचे कंबरडे मोडलेच समजा. दोन नवदाम्पत्यांना संसाराचे सोपस्कार सुरू करण्यासाठी मंडपापासून देवदेवस्की करण्यापर्यंत अनेकानेक समस्यांना सामोरे जावे लागते. आर्थिक झळ बसल्याशिवाय लग्न होणेच शक्य नाही. अगदी वधूशोधापासून सुरू झालेली ही कथा अक्षता पडेपर्यंतच नव्हे तर त्या नंतरच्याही विधीपर्यंत चालूच असते. कांदापोहेपासून ते गोंधळाच्या जेवणापर्यंत घरच्यांचा नुसता गोंधळ उडालेला असतो. त्यामुळे साहजिकच सगळे गोंधळलेले असतात.

लग्नाशी संबंधित मंडप, मंगल कार्यालय, कपडेलत्ते, अल्पोपहार, सुग्रास जेवण, डेकोरेशन, वेगवेगळ्या प्रकारच्या विधीक्रिया, घोडा, बॅन्डबाजा, फटाके, भेटवस्तू, मुंडावळ्या, बाशिंग, रुखवत, भटजीबुवा, पूजापाठ, हारतुरे यासारख्या अनेक बाबी येतात आणि खूप मोठा खर्च आई-वडिलांना सोसावा लागतो. मग या खर्चासाठी वर-वधू दोघांच्याही आई-वडिलांना बँक, सोसायट्या, सावकारीच्या विळख्यातून जावे लागते. भरमसाठ झालेल्या खर्चामुळे पुढे आयुष्यभर पै-पैचा हिशोब चुकता करण्यासाठी चपला झिजवाव्या लागतात. आधीपासूनच या खर्चासाठी केलेल्या योग्य नियोजनामुळे काहींची या विळख्यातून सुटका होते. गडगंज संपत्ती असणाºयांना ही झळ पोहोचतच नाही, परंतु सर्वसामान्यांच्या पाचवीला पूजलेलं हे चक्र मात्र जास्तच त्रासदायक ठरते.

प्रचलित लग्न वा विवाह सोहळ्यामुळे बºयाच लोकांना त्रास झाला अन् होतो आहे आणि यात काहीच बदल नाही झाले तर त्रास होतच राहणार. आमच्याच  एका नातेवाईकांनी ऐपत नसतानाही मुलाचं धूमधडाक्यात लग्न लावून दिलं. उसनेपासने करून कसाबसा विवाह सोहळा पार पडला परंतु विवाहानंतर दुसºयाच महिन्यापासून देणेकरी वाट अडवू लागले. शेवटी वैतागून घर विकून देणेकºयांचे समाधान करून ते घरापासूनच परागंदा झाले. सांगा तुम्हीच काय म्हणावे या वृत्तीला? ही झाली आर्थिक विवंचनेची बाजू. नातेवाईकातील रूसवे फुगवे, उपस्थित राहणाºयांची कमी अधिक संख्या, जेवणावळीवरून होणारे वाद, कपडेलत्त्यांमुळे होणारी नाराजी, नात्यानात्यातील कलह, या असंख्य कारणांमुळे होणारा मानसिक त्रास परिणामी मनावर येणारा ताण याशिवाय सामाजिक बांधिलकीमुळे होणारा त्रासही आहेच म्हणा. या साºया कारणांमुळेच, ‘लग्न करणे म्हणजे आयुष्यातील मोठी चूक’ वाटते.

कोरोना महामारीमुळे संपूर्ण विश्वच स्थितप्रज्ञ झाले. अफाट श्रीमंतापासून ते कमालीचे दारिद्र्य असलेल्यापर्यंतचे सगळेच रस्त्यावर आले. इतर देशांप्रमाणे भारतही कुलूपबंद झाला आणि सगळ्यांच्या तोंडचे पाणीच पळाले, जगण्या मरण्यात भ्रांत निर्माण झाली. शासकीय, खासगी, सहकारी, मालकी सर्वच संस्था बंद झाल्या. अगदी हातावर पोट असणाºयांनाही घरीच राहण्याची सक्ती झाली. त्यामुळे साहजिकच सगळ्यांचे सर्वच नियोजन कोलमडले. त्यात विवाह सोहळेही आलेच म्हणा. अगदी तोंडावर लग्न असणाºयांनाही तोंडावर बोट आणि डोळ्यावर पट्टी बांधण्याची वेळ आली. विवाहेच्छुकांचा हिरमोड झाला. अ‍ॅडव्हान्स बुकिंगमुळे धाबेही दणाणले. अगदी जूनपर्यंत सगळं काही चिडीचूप. अनलॉक सुरू झाले अन् सगळेच पुन्हा वेगवेगळ्या नियोजनामागे लागले. लग्नघटिका समीप येऊन लॉकडाऊनच्या शिक्षेमुळे हिरमुसलेले पुन्हा प्रफुल्लित झाले. आता लग्नाला परवानगी मिळाली खरी परंतु ठरलेल्या चाकोरीच्या बाहेर न जाण्याची तंबीही मिळाली. ५० च्यावर वºहाडी नाकारले गेले. मग आलीच की पंचाईत. पण यामुळे आईबापावरील प्रचंड ताण मात्र कमी झाला. मोजक्याच ५० भाग्यवान वºहाडामुळे आता सगळेच सुरळीत होणार याची खात्री झाली बरं का!

अशाच एका आदर्श विवाहाचे आम्ही आॅनलाईन साक्षीदार ठरलो. नवापूर (नंदूरबार) येथील आमचे ज्येष्ठ सन्मित्राचे चिरंजीव नुकतेच विवाहबद्ध झाले. ना सनई चौघडा, ना मिरवणूक, ना बडेजाव आणि विशेष म्हणजे ना वायफळ खर्च पण शांत, सुंदर, शिस्तबद्ध लग्नसोहळा संपन्न झाला. लग्नात उपस्थित होते त्यांनी लांबून आणि जे नव्हते त्यांनी हवाईमार्गे (आॅनलाईन) शुभेच्छा, आशीर्वाद देऊन नवदाम्पत्याच्या नवसंसाराला श्रीगणेशा करण्यासाठी प्रेरणा दिली. मग सांगा इथे शारीरिक, मानसिक, सामाजिक, आर्थिक ताण पडला का? नाही ना! होय म्हणूनच आदर्श विवाहपद्धतीची सुरुवात झाली असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कोरोना आज ना उद्या संपेल परंतु कोरोनामुळे झालेला हा बदल परिवर्तनीय आहे आणि यापुढेही अशाचप्रकारे विवाह सोहळे होण्यास काय हरकत आहे?- आनंद घोडके,(लेखक शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत.) 

टॅग्स :Solapurसोलापूरmarriageलग्न