शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

अवघ्या एक रुपया किलोनं कांदा विकताना शेतकऱ्यांना वाटली स्वत:च्या पेशाची लाज

By appasaheb.patil | Updated: November 20, 2018 17:18 IST

क्विंटलला ६०० रूपयांचा मिळाला दर : विक्रीतून मिळणाºया रकमेपेक्षा वाहतूक खर्च अधिक

ठळक मुद्देकांदा दर कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी पुरता हतबलकांद्याला क्विंटलमागे कमीतकमी १०० रुपयांचा दर मिळालासध्या मिळणारा दर कांदा विक्रीसाठी केलेला वाहतूक खर्चही निघत नसल्याने शेतकरी पुरता हतबल

अरुण बारसकर / आप्पासाहेब पाटीलसोलापूर : कांद्याची आवक फार मोठ्या प्रमाणावर होत नसतानाही कांदा दर कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी पुरता हतबल झाला आहे. सोलापूर बाजार समितीत सोमवारी कांद्याला क्विंटलमागे कमीतकमी १०० रुपयांचा दर मिळाला.

मागील आठवड्यापासून सोलापूर बाजार समितीत कांद्याची आवक बºयापैकी होऊ लागली आहे. दररोज ३०० च्या जवळपास ट्रक कांदा विक्रीसाठी येत आहे. चांगल्या कांद्यापैकी काही पोत्यांना( एक-दोन टक्के) एक हजारापेक्षा अधिक परंतु १६०० रुपयांपर्यंत दर मिळतो. मात्र अन्य सर्वच कांद्याला १०० रुपयांपासून दर मिळतो. 

बºयापैकी कांद्याला तीनशे- चारशेच दर मिळतो. सोमवारी बाजार समितीत २७० ट्रक कांदा आला होता. त्याला १०० रुपयांपासून १६०० रुपयांपर्यंत दर मिळाल्याचे बाजार समिती कांदा विभागाकडून सांगण्यात आले. मात्र विक्रीसाठी आलेल्या कांद्यापैकी काही कांद्यालाच एक हजार रुपयांपेक्षा अधिक दर  व्यापारी देतात असे सांगण्यात आले. सध्या मिळणारा दर कांदा विक्रीसाठी केलेला वाहतूक खर्चही निघत नसल्याने शेतकरी पुरता हतबल झाला आहे. 

सोमवारी बाजार समितीत वांगी, काटी, जवळगाव, कुंभारी, वळसंग आदी भागातून कांदा विक्रीसाठी आला होता़ कांद्याला कमी प्रमाणात भाव मिळाला आहे़ 

जास्तीचा भाव मिळेल या आशेने आम्ही कांदा विक्रीसाठी बाजार समितीत आणला होता़ मात्र चांगल्या प्रतिच्या कांद्याला सोमवारी फक्त ६०० रूपये भाव मिळाल्याने आम्ही निराश झालो़ मिळालेल्या पैशांतून उत्पादन खर्चदेखील निघाला नाही़ जर असाच भाव मिळाला तर जगायचं कसे असा प्रश्न समोर उपस्थित होत आहे़- चंद्रकांत जवळकोटे, शेतकरी, वांगी.

मी कालच आमच्या शेतातील कांदा कापणी करून सोमवारी विक्रीसाठी सोलापूरच्या बाजार समितीत आणला़ मात्र आवक कमी असताना दर म्हणावा तसा मिळाला नाही़ उलट शेतकºयांची घोर निराशा झाली़ उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळाल्याने शेतकरी नाराज झाला आहे़ शेतकºयांना जास्तीचा भाव मिळावा यासाठी शासनाने प्रयत्न करावेत़- अण्णाप्पा कटारे, शेतकरी, कुंभारी.

मी ५० पाकीट कांदा विक्रीसाठी आणला़ वाहतूक खर्च जास्तीचा जात आहे़ मी आणलेल्या कांद्याला सरासरी ५०० रूपये एवढा दर मिळाला़ कांदा लागवड, कापणी, खुरपणी, औषध फवारणी आदी खर्च धरला तर तो हजारो रूपयांत जातो़ अन् कांद्याला भाव मिळतो तो फक्त शेकडो रूपयांत़ काय करावं काही कळेनासे झाले आहे़ - सयाजी देशमुख, शेतकरी, काटी़

मी मोठ्या आशेने ३५ पाकीट कांदा विक्रीसाठी बाजारात आणला़ मी आणलेल्या १ नंबर कांद्याला ६०० रूपये, ३ नंबर कांद्याला ३०० रूपये दर मिळाला़ मला एक पाकीट कांद्यासाठी साधारणपणे २०० ते ३०० रूपये खर्च आला़ उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव मिळाल्याने कर्जाचा बोजा वाढला़ शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त होत आहे़ - त्रिंबक कापसे, शेतकरी, जवळगाव. 

टॅग्स :SolapurसोलापूरonionकांदाFarmerशेतकरीagricultureशेती