शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

अवघ्या एक रुपया किलोनं कांदा विकताना शेतकऱ्यांना वाटली स्वत:च्या पेशाची लाज

By appasaheb.patil | Updated: November 20, 2018 17:18 IST

क्विंटलला ६०० रूपयांचा मिळाला दर : विक्रीतून मिळणाºया रकमेपेक्षा वाहतूक खर्च अधिक

ठळक मुद्देकांदा दर कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी पुरता हतबलकांद्याला क्विंटलमागे कमीतकमी १०० रुपयांचा दर मिळालासध्या मिळणारा दर कांदा विक्रीसाठी केलेला वाहतूक खर्चही निघत नसल्याने शेतकरी पुरता हतबल

अरुण बारसकर / आप्पासाहेब पाटीलसोलापूर : कांद्याची आवक फार मोठ्या प्रमाणावर होत नसतानाही कांदा दर कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकरी पुरता हतबल झाला आहे. सोलापूर बाजार समितीत सोमवारी कांद्याला क्विंटलमागे कमीतकमी १०० रुपयांचा दर मिळाला.

मागील आठवड्यापासून सोलापूर बाजार समितीत कांद्याची आवक बºयापैकी होऊ लागली आहे. दररोज ३०० च्या जवळपास ट्रक कांदा विक्रीसाठी येत आहे. चांगल्या कांद्यापैकी काही पोत्यांना( एक-दोन टक्के) एक हजारापेक्षा अधिक परंतु १६०० रुपयांपर्यंत दर मिळतो. मात्र अन्य सर्वच कांद्याला १०० रुपयांपासून दर मिळतो. 

बºयापैकी कांद्याला तीनशे- चारशेच दर मिळतो. सोमवारी बाजार समितीत २७० ट्रक कांदा आला होता. त्याला १०० रुपयांपासून १६०० रुपयांपर्यंत दर मिळाल्याचे बाजार समिती कांदा विभागाकडून सांगण्यात आले. मात्र विक्रीसाठी आलेल्या कांद्यापैकी काही कांद्यालाच एक हजार रुपयांपेक्षा अधिक दर  व्यापारी देतात असे सांगण्यात आले. सध्या मिळणारा दर कांदा विक्रीसाठी केलेला वाहतूक खर्चही निघत नसल्याने शेतकरी पुरता हतबल झाला आहे. 

सोमवारी बाजार समितीत वांगी, काटी, जवळगाव, कुंभारी, वळसंग आदी भागातून कांदा विक्रीसाठी आला होता़ कांद्याला कमी प्रमाणात भाव मिळाला आहे़ 

जास्तीचा भाव मिळेल या आशेने आम्ही कांदा विक्रीसाठी बाजार समितीत आणला होता़ मात्र चांगल्या प्रतिच्या कांद्याला सोमवारी फक्त ६०० रूपये भाव मिळाल्याने आम्ही निराश झालो़ मिळालेल्या पैशांतून उत्पादन खर्चदेखील निघाला नाही़ जर असाच भाव मिळाला तर जगायचं कसे असा प्रश्न समोर उपस्थित होत आहे़- चंद्रकांत जवळकोटे, शेतकरी, वांगी.

मी कालच आमच्या शेतातील कांदा कापणी करून सोमवारी विक्रीसाठी सोलापूरच्या बाजार समितीत आणला़ मात्र आवक कमी असताना दर म्हणावा तसा मिळाला नाही़ उलट शेतकºयांची घोर निराशा झाली़ उत्पादन खर्चापेक्षा कमी दर मिळाल्याने शेतकरी नाराज झाला आहे़ शेतकºयांना जास्तीचा भाव मिळावा यासाठी शासनाने प्रयत्न करावेत़- अण्णाप्पा कटारे, शेतकरी, कुंभारी.

मी ५० पाकीट कांदा विक्रीसाठी आणला़ वाहतूक खर्च जास्तीचा जात आहे़ मी आणलेल्या कांद्याला सरासरी ५०० रूपये एवढा दर मिळाला़ कांदा लागवड, कापणी, खुरपणी, औषध फवारणी आदी खर्च धरला तर तो हजारो रूपयांत जातो़ अन् कांद्याला भाव मिळतो तो फक्त शेकडो रूपयांत़ काय करावं काही कळेनासे झाले आहे़ - सयाजी देशमुख, शेतकरी, काटी़

मी मोठ्या आशेने ३५ पाकीट कांदा विक्रीसाठी बाजारात आणला़ मी आणलेल्या १ नंबर कांद्याला ६०० रूपये, ३ नंबर कांद्याला ३०० रूपये दर मिळाला़ मला एक पाकीट कांद्यासाठी साधारणपणे २०० ते ३०० रूपये खर्च आला़ उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव मिळाल्याने कर्जाचा बोजा वाढला़ शेतीमालाला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त होत आहे़ - त्रिंबक कापसे, शेतकरी, जवळगाव. 

टॅग्स :SolapurसोलापूरonionकांदाFarmerशेतकरीagricultureशेती