शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आज देशवासियांना संबोधित करणार; पाच वाजता कोणत्या विषयावर बोलणार?
2
Nagpur Crime: घरातून बाहेर पडला अन् कारमध्ये मिळाला व्यावसायिकाचा मृतदेह; मृत्यू की हत्या?
3
युद्ध युरोपच्या दाराशी! रशियन ड्रोनची नाटो देशांच्या हद्दीत घुसखोरी, तिसऱ्या महायुद्धाचा धोका वाढला?
4
नवरात्रीपासून GST चे नवे दर लागू होणार; कोणी टाळाटाळ केल्यास 'इथे' करा तक्रार; हेल्पलाइन नंबर जारी
5
नेपाळचे जेन-झी माजी पंतप्रधान ओलींचा पिच्छा सोडेनात! आता केली 'अशी' मागणी, म्हणाले...
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींशी पहिली भेट कधी झाली? अमित शाहांनी सांगितला सगळा किस्सा
7
'बगराम हवाई तळ परत करा, अन्यथा परिणाम खूप वाईट होतील'; डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तानला धमकी
8
पत्नीचा 'तो' नातेवाईक पाहून संताप अनावर झाला; चिडलेल्या पतीने चाकूने वार केला! थराराने परिसर हादरला
9
H-1B व्हिसासाठी ८८ लाख रुपये फक्त 'या' लोकांनाच भरावे लागणार; व्हाइट हाउसचे स्पष्टीकरण
10
Poonam Pandey: रामायणात पूनम पांडे रावणाच्या पत्नीच्या भूमिकेत, रामलीला कमिटी म्हणते- "तिला सुधरायचं आहे..."
11
पगार फक्त ५३,०००, तरी ९ वर्षांत झाला करोडपती! कॉर्पोरेट कर्मचाऱ्याने सांगितलं गुंतवणुकीचं गुपित
12
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
13
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
14
एच-१ बी कर्मचाऱ्यांनो तातडीने अमेरिकेत परत या, अन्यथा मार्ग बंद; भारतीय आयटी कंपन्यांची धावपळ
15
नवरात्रीच्या मराठी शुभेच्छा, Messages,Images, Whatsapp Status ला शेअर करुन करूया जागर शक्तीचा!
16
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
17
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
18
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
19
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
20
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?

नदीला पाणी आल्यावर जाधव वस्तीमधील मुले पोहूनच गाठतात शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 13:06 IST

विद्यार्थ्यांची व्यथा : वाळूज अन् जाधववस्तीचे दोन नद्यांनी केले विभाजन

ठळक मुद्देसध्या दमदार पावसामुळे भोगावती आणि नागझरी नदीला पाणी आलेवाळूज गावच्या पूर्वेला नदीच्या पलीकडे २०० लोकांची जाधव वस्ती काही वेळेला नदीपात्राची खोली कळत नाही अशा परिस्थितीत जीव मुठीत धरून वाट काढत जावे लागत आहे

संभाजी मोटे 

वाळूज : मोहोळ तालुक्यातील वाळूज येथे भोगावती व नागझरी या दोन नद्यांचा संगम झालेला आहे़ पावसाळ्यात या दोन्ही नद्यांना पाणी आले की शाळकरी मुलांना जीव धोक्यात घालून पोहोत जाऊन शाळा गाठावी लागते.

सध्या दमदार पावसामुळे भोगावती आणि नागझरी नदीला पाणी आले आहे. वाळूज गावच्या पूर्वेला नदीच्या पलीकडे २०० लोकांची जाधव वस्ती आहे़ येथील शाळकरी मुलांना, शेतकरी आणि महिला यांना गावात येण्यासाठी दररोज नदीतून कपडे भिजवत वाट काढावी लागत आहे. काही वेळेला नदीपात्राची खोली कळत नाही़ अशा परिस्थितीत जीव मुठीत धरून वाट काढत जावे लागत आहे़ या नदीवर पूल बांधून देण्याची मागणी सातत्याने होत असून, ती पूर्ण करण्याची मागणी केली.

देशाला स्वातंत्र्य मिळून ७३ वर्षे झाली़ परंतु या नदीवर आणखीन पूल झाला नाही. त्यामुळे नदीला पाणी आल्यावर आमचा गावाशी संपर्क होत नाही.  दैनंदिन गरजा भागविण्यासाठी येथील नागरिकांना २० कि.मी. अंतरावरून वाळूजला यावे लागते. नदीला पाणी येऊन आज पंधरा दिवस झाले. शाळकरी मुलांना दररोज कपडे भिजवत जावे लागते. कधी-कधी पाऊस वाढताच नदीला पूरस्थिती उद्भवते़ अशावेळी गाव आणि वस्ती यांचा संपर्क तुटतो़ पाणी ओसरेपर्यंत वस्तीचा गावाशी संपर्क होत नाही.

पाणी जास्त असल्यास धोका होण्याचा संभव आहे. गावांचा निम्मा शिवार नदीच्या पलीकडे आहे. आता पेरणीचा हंगाम चालू आहे. पाण्यातून साहित्य नेताना शेतकºयांचे हाल होत आहेत़ आजपर्यंत कितीतरी लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या, परंतु प्रत्येकाने नुसती आश्वासने दिल्याचे नागरिक सुभाष जाधव, धनाजी मोटे, राजेंद्र मोटे, मारुती कादे, तुकाराम कादे यांनी सांगितले़ लवकरात लवकर या नदीवर पूल उभारण्याची मागणी होत आहे.

ओल्या कपड्यावर बसावे लागते शाळेतपावसाळ्यात कधी कधी भोगावती व नागझरी नद्यांना पाणी येते़ त्यामुळे गावचा संपर्क तुटतो़ दोन-दोन महिने पाणीपातळी खाली येत नाही़ अशा वेळी विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून रस्ता काढावा लागतो तर काहींना पोहूनच नदी पार करून शाळा गाठावी लागते़ पोहून आल्याने सर्व कपडे भिजलेले असतात़ या ओल्या कपड्यांनी शाळेत बसून ज्ञानार्जन करावे लागते़ पावसाळ्यात तर ढगाळ वातावरणामुळे कपडे वाळत नाहीत़ दिवसभर अंगावरील कपडे ओलेचे असतात़ त्यामुळे आजारी पडण्याचा धोका विद्यार्थ्यांना असतो़ 

टॅग्स :Solapurसोलापूरwater transportजलवाहतूकriverनदीSchoolशाळाStudentविद्यार्थीSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयEducationशिक्षण