शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
6
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
7
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
8
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
10
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
11
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
12
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
13
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
14
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
15
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
16
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
17
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
18
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
19
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
20
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!

नदीला पाणी आल्यावर जाधव वस्तीमधील मुले पोहूनच गाठतात शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 13:06 IST

विद्यार्थ्यांची व्यथा : वाळूज अन् जाधववस्तीचे दोन नद्यांनी केले विभाजन

ठळक मुद्देसध्या दमदार पावसामुळे भोगावती आणि नागझरी नदीला पाणी आलेवाळूज गावच्या पूर्वेला नदीच्या पलीकडे २०० लोकांची जाधव वस्ती काही वेळेला नदीपात्राची खोली कळत नाही अशा परिस्थितीत जीव मुठीत धरून वाट काढत जावे लागत आहे

संभाजी मोटे 

वाळूज : मोहोळ तालुक्यातील वाळूज येथे भोगावती व नागझरी या दोन नद्यांचा संगम झालेला आहे़ पावसाळ्यात या दोन्ही नद्यांना पाणी आले की शाळकरी मुलांना जीव धोक्यात घालून पोहोत जाऊन शाळा गाठावी लागते.

सध्या दमदार पावसामुळे भोगावती आणि नागझरी नदीला पाणी आले आहे. वाळूज गावच्या पूर्वेला नदीच्या पलीकडे २०० लोकांची जाधव वस्ती आहे़ येथील शाळकरी मुलांना, शेतकरी आणि महिला यांना गावात येण्यासाठी दररोज नदीतून कपडे भिजवत वाट काढावी लागत आहे. काही वेळेला नदीपात्राची खोली कळत नाही़ अशा परिस्थितीत जीव मुठीत धरून वाट काढत जावे लागत आहे़ या नदीवर पूल बांधून देण्याची मागणी सातत्याने होत असून, ती पूर्ण करण्याची मागणी केली.

देशाला स्वातंत्र्य मिळून ७३ वर्षे झाली़ परंतु या नदीवर आणखीन पूल झाला नाही. त्यामुळे नदीला पाणी आल्यावर आमचा गावाशी संपर्क होत नाही.  दैनंदिन गरजा भागविण्यासाठी येथील नागरिकांना २० कि.मी. अंतरावरून वाळूजला यावे लागते. नदीला पाणी येऊन आज पंधरा दिवस झाले. शाळकरी मुलांना दररोज कपडे भिजवत जावे लागते. कधी-कधी पाऊस वाढताच नदीला पूरस्थिती उद्भवते़ अशावेळी गाव आणि वस्ती यांचा संपर्क तुटतो़ पाणी ओसरेपर्यंत वस्तीचा गावाशी संपर्क होत नाही.

पाणी जास्त असल्यास धोका होण्याचा संभव आहे. गावांचा निम्मा शिवार नदीच्या पलीकडे आहे. आता पेरणीचा हंगाम चालू आहे. पाण्यातून साहित्य नेताना शेतकºयांचे हाल होत आहेत़ आजपर्यंत कितीतरी लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या, परंतु प्रत्येकाने नुसती आश्वासने दिल्याचे नागरिक सुभाष जाधव, धनाजी मोटे, राजेंद्र मोटे, मारुती कादे, तुकाराम कादे यांनी सांगितले़ लवकरात लवकर या नदीवर पूल उभारण्याची मागणी होत आहे.

ओल्या कपड्यावर बसावे लागते शाळेतपावसाळ्यात कधी कधी भोगावती व नागझरी नद्यांना पाणी येते़ त्यामुळे गावचा संपर्क तुटतो़ दोन-दोन महिने पाणीपातळी खाली येत नाही़ अशा वेळी विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून रस्ता काढावा लागतो तर काहींना पोहूनच नदी पार करून शाळा गाठावी लागते़ पोहून आल्याने सर्व कपडे भिजलेले असतात़ या ओल्या कपड्यांनी शाळेत बसून ज्ञानार्जन करावे लागते़ पावसाळ्यात तर ढगाळ वातावरणामुळे कपडे वाळत नाहीत़ दिवसभर अंगावरील कपडे ओलेचे असतात़ त्यामुळे आजारी पडण्याचा धोका विद्यार्थ्यांना असतो़ 

टॅग्स :Solapurसोलापूरwater transportजलवाहतूकriverनदीSchoolशाळाStudentविद्यार्थीSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयEducationशिक्षण