शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
2
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
3
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
4
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
5
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
6
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
7
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
8
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
9
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
10
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
11
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
12
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
13
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
14
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
15
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
16
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
17
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
18
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
19
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
20
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...

नदीला पाणी आल्यावर जाधव वस्तीमधील मुले पोहूनच गाठतात शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 13:06 IST

विद्यार्थ्यांची व्यथा : वाळूज अन् जाधववस्तीचे दोन नद्यांनी केले विभाजन

ठळक मुद्देसध्या दमदार पावसामुळे भोगावती आणि नागझरी नदीला पाणी आलेवाळूज गावच्या पूर्वेला नदीच्या पलीकडे २०० लोकांची जाधव वस्ती काही वेळेला नदीपात्राची खोली कळत नाही अशा परिस्थितीत जीव मुठीत धरून वाट काढत जावे लागत आहे

संभाजी मोटे 

वाळूज : मोहोळ तालुक्यातील वाळूज येथे भोगावती व नागझरी या दोन नद्यांचा संगम झालेला आहे़ पावसाळ्यात या दोन्ही नद्यांना पाणी आले की शाळकरी मुलांना जीव धोक्यात घालून पोहोत जाऊन शाळा गाठावी लागते.

सध्या दमदार पावसामुळे भोगावती आणि नागझरी नदीला पाणी आले आहे. वाळूज गावच्या पूर्वेला नदीच्या पलीकडे २०० लोकांची जाधव वस्ती आहे़ येथील शाळकरी मुलांना, शेतकरी आणि महिला यांना गावात येण्यासाठी दररोज नदीतून कपडे भिजवत वाट काढावी लागत आहे. काही वेळेला नदीपात्राची खोली कळत नाही़ अशा परिस्थितीत जीव मुठीत धरून वाट काढत जावे लागत आहे़ या नदीवर पूल बांधून देण्याची मागणी सातत्याने होत असून, ती पूर्ण करण्याची मागणी केली.

देशाला स्वातंत्र्य मिळून ७३ वर्षे झाली़ परंतु या नदीवर आणखीन पूल झाला नाही. त्यामुळे नदीला पाणी आल्यावर आमचा गावाशी संपर्क होत नाही.  दैनंदिन गरजा भागविण्यासाठी येथील नागरिकांना २० कि.मी. अंतरावरून वाळूजला यावे लागते. नदीला पाणी येऊन आज पंधरा दिवस झाले. शाळकरी मुलांना दररोज कपडे भिजवत जावे लागते. कधी-कधी पाऊस वाढताच नदीला पूरस्थिती उद्भवते़ अशावेळी गाव आणि वस्ती यांचा संपर्क तुटतो़ पाणी ओसरेपर्यंत वस्तीचा गावाशी संपर्क होत नाही.

पाणी जास्त असल्यास धोका होण्याचा संभव आहे. गावांचा निम्मा शिवार नदीच्या पलीकडे आहे. आता पेरणीचा हंगाम चालू आहे. पाण्यातून साहित्य नेताना शेतकºयांचे हाल होत आहेत़ आजपर्यंत कितीतरी लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या, परंतु प्रत्येकाने नुसती आश्वासने दिल्याचे नागरिक सुभाष जाधव, धनाजी मोटे, राजेंद्र मोटे, मारुती कादे, तुकाराम कादे यांनी सांगितले़ लवकरात लवकर या नदीवर पूल उभारण्याची मागणी होत आहे.

ओल्या कपड्यावर बसावे लागते शाळेतपावसाळ्यात कधी कधी भोगावती व नागझरी नद्यांना पाणी येते़ त्यामुळे गावचा संपर्क तुटतो़ दोन-दोन महिने पाणीपातळी खाली येत नाही़ अशा वेळी विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून रस्ता काढावा लागतो तर काहींना पोहूनच नदी पार करून शाळा गाठावी लागते़ पोहून आल्याने सर्व कपडे भिजलेले असतात़ या ओल्या कपड्यांनी शाळेत बसून ज्ञानार्जन करावे लागते़ पावसाळ्यात तर ढगाळ वातावरणामुळे कपडे वाळत नाहीत़ दिवसभर अंगावरील कपडे ओलेचे असतात़ त्यामुळे आजारी पडण्याचा धोका विद्यार्थ्यांना असतो़ 

टॅग्स :Solapurसोलापूरwater transportजलवाहतूकriverनदीSchoolशाळाStudentविद्यार्थीSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयEducationशिक्षण