शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics :"दोन ‘बंधू’ एकत्र येणार, त्यामुळे अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा..."; सामनातून विरोधकांना डिवचले, संकेतही दिले
2
‘अटी’तटीत अडकली ठाकरे युती, चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच; मनसेची आक्रमक भूमिका
3
काश्मीरमध्ये हाहाकार! ढगफुटीने तीन जणांचा मृत्यू; १०० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश
4
"भारतातील निवडणूक प्रक्रियेत...’’, महाराष्ट्रातील मतदानाचा उल्लेख करत राहुल गांधींचं अमेरिकेत मोठं विधान
5
अमेरिका-चीन ट्रेडवॉरचा फायदा; जागतिक स्मार्टफोन-लॅपटॉप कंपन्या भारतात येण्यास तयार
6
राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ एप्रिल २०२५: साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल
8
साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला, त्या क्रूर नराधमांना शिक्षा द्या
9
दोन मुलांना मारून टाकणार, पेटवून घेणार; महिलेचा 'तो' ईमेल आणि विख्यात डॉक्टरांनी संपवलं जीवन
10
राज्यात उन्हाने होरपळ, उकाड्यानं नागरिक हैराण; उष्णतेच्या लाटेचा इशारा
11
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
12
'असा' शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवणार?; शिक्षणाचा खेळखंडोबा म्हणजे देशाशी गद्दारी!
13
मुंबई विद्यापीठासाठी उघडले संशोधनाचे नवे दालन; आयआयटी-मुंबईच्या ‘हब’ संस्थेत समावेश
14
तारीख पे तारीखचा खेळ सुरू; यावर्षीही महापालिका निवडणुका होणार नाहीत..?
15
दोन टक्के व्याजासाठी विकासाला खीळ घालणे अमान्य; BMC आयुक्तांनी सांगितलं कारण...
16
आर्थिक राजधानीतही ‘हुंड्याचा फास’! अवघ्या २ वर्षांतच लक्ष्मीने गळफास घेऊन आयुष्य संपवले
17
रेल्वे पोलिसांकडून २९ बालकांची सुटका; मुंबई-चेन्नई एक्स्प्रेसमध्ये संशयास्पदरीत्या वाहतूक
18
पकडा आणि परत पाठवा! अमेरिका,चीन वर्चस्ववादाच्या लढाईने जागतिकीकरणाच्या आशयाचा पराभव
19
१२ हजार माणसांबरोबर धावले २० रोबोट्स; अखेरीस मॅरेथॉन स्पर्धेत जिंकलं कोण?
20
डॉक्टरांचा हलगर्जीपणा रुग्णाच्या मृत्यूस कारण?; नायर रुग्णालयाने सर्व आरोप फेटाळले

खूनापुर्वी काय म्हणाली होती रेश्मा पडकनूर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 14:45 IST

एवढं करुनही तौफिक दोन शब्द बोलला नाही म्हणून रेश्माने झळकीमध्ये केला होता राडा समीउल्लाह शेख यांची माहिती

ठळक मुद्दे- विजयपूर येथील रेश्मा पडकनूर याचा खून- खूनाचा संशय सोलापुरातील एमआयएमचे तौफिक शेख यांच्यावर होतोय- वंचित बहुजन आघाडीचे समीउल्लाह शेख यांनी सांगितली खूनापुर्वीची कहानी

सोलापूर : तौफिक शेख आणि रेश्मा पडकनूर यांच्यातील वाद मिटविण्यासाठी झळकी (ता. इंडी) येथील एका हॉटेलमध्ये १० मे रोजी सायंकाळी बैठक झाली होती. या भेटीत परस्परविरोधी फिर्याद शिथिल करण्याबाबतच्या कागदपत्रांवर सह्या केल्या होत्या. या सह्या केल्यानंतर तौफिक उठून बाहेर आले. एवढं करुनही तौफिक आपल्याशी दोन मिनिटं बसून दोन शब्द  बोलला नाही यावरुन रेश्माने हॉटेलबाहेर राडा केला होता. पण या परिस्थितीत तौफिक शांत राहिले होते, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते समीउल्लाह शेख यांनी केला. 

रेश्मा पडकनूर खून प्रकरणासाठी विजयपूर पोलीस काल सोलापुरात आले होते. दरम्यान, रेश्मा आणि समीउल्लाह शेख यांच्यातील एक आॅडिओ क्लीप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्याबद्दलचा खुलासा करण्यासाठी समीउल्लाह यांनी रविवारी सायंकाळी ‘लोकमत’शी संवाद साधला. ते म्हणाले, माझी आणि रेश्मा पडकनूरची ओळख दोन वर्षांपूर्वी झाली होती. पण सात ते आठ महिन्यांपासून ती अधून-मधून मला फोन करायची.

पैशाच्या व्यवहारावरुन तौफिक शेखसोबत वाद सुरू असल्याचे तिचे म्हणणे होते. हा वाद वाढवू नका, दोघेही राजकीय क्षेत्रात काम करीत आहात, सुबरीने घे, असे तिला समजावून सांगितले होते. लोकसभेची निवडणूक सुरू असताना पुन्हा तिचे फोन सुरू झाले. सोलापुरात घडणाºया घडामोडींची तिला कुणीतरी माहिती देत असावे. सोलापुरातील कावेरी हॉटेलमध्ये दोघांत वाद झाल्याचे तिने मला सांगितले होते. त्यावरुन तिने तौफिक शेख विरुध्द फिर्यादही दिली. वंचित बहुजन आघाडीचे नेते पोलीस आयुक्तांना भेटायला गेले होते. या भेटीवेळी तिने विजयपुरातून मला फोन केला होता. याचा अर्थ ती सर्व गोष्टींवर लक्ष ठेवून होती. 

यादरम्यान माझ्यासोबत फोनवर झालेल्या बोलण्याची क्लीप तिने काही लोकांना पाठविली असावी. ती इतरांसोबत झालेली बोलण्याची क्लीप मला पाठवित होती, अर्थात माझेही कॉल रेकॉर्डिंग करीत असणार.

पण हा वाद मिटवून घेण्यास आम्ही तिला राजी केले होते. त्यासाठी तिने सोलापुरातील एक वकील मागितला होता. मी एका वकिलाची भेटही घालून दिली. या वकिलाच्या भेटीनंतर रेश्माने तौफिकविरुध्द केलेले आरोप मागे घेण्याची तयारी दाखविली. परंतु, मी सोलापुरात येणार नाही. मला काय जामीन मिळेल. गरज असेल तर त्यालाच विजयपूरला यायला सांगा, असा निरोप तिने दिला होता. वकिलांशी चर्चा करुन दोघांनी सोलापूर-विजयपूरच्या सीमेवरील झळकी येथे भेट घेण्याचे ठरविले. १० मे रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमाराला वकिलांसमवेत दोघेही भेटले. माझी एवढी बदनामी होऊनही तौफिकविरुध्द केलेली तक्रार मी मागे घ्यायला तयार होते. कागदावर सह्या केल्यानंतर त्याला माझ्याशी बोलू वाटले नाही. दोन मिनिटं बसून बोलला असता तर काय झाले असते, म्हणून मी त्याच्याशी भांडले, असे रेश्माने सांगितल्याचे समीउल्लाह शेख यांनी सांगितले. तौफिक शेख गेली पाच-सहा वर्षे कोणत्याही प्रकारच्या वादापासून दूर होते. ते दिवसातून पाच वेळा नमाजला जातात. त्यांचा या खून प्रकरणाशी संबंध असणार नाही, असे स्पष्टीकरण समीउल्लाह यांनी दिले. 

 

टॅग्स :SolapurसोलापूरKarnatakकर्नाटकKarnatak Politicsकर्नाटक राजकारणCrime Newsगुन्हेगारीSolapur City Policeसोलापूर शहर पोलीस