शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

सोलापूर जिल्ह्यातील बंद पडलेल्या  पाणीपुरवठा योजना सुरू होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 20:38 IST

सोलापूर : विविध कारणांमुळे बंद पडलेल्या दहा पाणीपुरवठा योजना टंचाईमुळे सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी टंचाई आराखड्यातून ...

ठळक मुद्देच्दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागात पाण्याची टंचाई दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना दुरुस्तीअभावी किंवा थकीत वीज बिलामुळे ज्या योजना बंद

सोलापूर : विविध कारणांमुळे बंद पडलेल्या दहा पाणीपुरवठा योजना टंचाईमुळे सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. यासाठी टंचाई आराखड्यातून निधीचा वापर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिली.

 जीवन प्राधिकरण योजनेकडील चार योजना व जिल्हा परिषदेकडील ६ प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या माध्यमातून टंचाई काळात पाणीपुरवठा सुरू करण्यात येत आहे. बंद पडलेल्या या योजनांच्या दुरुस्तीसाठी २ कोटी ७० लाखांची गरज आहे.  फेब्रुवारी अखेरपर्यंत या योजना कार्यान्वित करण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. 

 दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. दुरुस्तीअभावी किंवा थकीत वीज बिलामुळे ज्या योजना बंद आहेत, अशा योजना पुन्हा सुरू करण्यात येत आहेत.  या योजना सुरू केल्यास टँकरची गरज भासणार नाही, त्यामुळे या योजनांना निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. 

जीवन प्राधिकरण योजनेकडील आंधळगाव, नंदूर (ता. मंगळवेढा), कोळगाव (ता. करमाळा), कव्हे  या चार योजनांसाठी १ कोटी २० लाख रुपयांची गरज आहे.  जिल्हा परिषदेकडील १९ प्रादेशिक पाणीपुरवठ्यांपैकी ८ योजना सुरु आहेत. त्यातील ६ योजना दुरुस्तीअभावी बंद आहेत.  त्यात व्होळे, कोर्टी, बोरगाव, जेऊर, भाळवणी, लिंबोरे या योजनांचा समावेश आहे. या योजनांच्या दुरुस्तीसाठी १ कोटी ५० लाखांची गरज आहे. या योजनांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून दिल्यास २५ गावांच्या पाण्याचा प्रश्न मिटणार आहे. यामुळे ३६ टँकर देण्याची गरज भासणार नाही.

तलावात पाणी सोडण्याचे नियोजन च्दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागात पाण्याची टंचाई दिसून येत आहे. टंचाई काळात विविध योजनेचे पाणी तलावात सोडून ग्रामीण भागातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.  त्यानुसार उत्तर सोलापूर तालुक्यातील गावडीदारफळ, पंढरपूर तालुक्यातील तिसंगी, मोहोळ तालुक्यातील आष्टी, सांगोला तालुक्यातील घेरडी तलावात विविध योजनेतून पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयWaterपाणीdroughtदुष्काळ