शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

उजनीचा पाणीसाठा ४३ टक्क्यांपर्यंत घसरला ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 15:15 IST

भीमानगर :   उजनी धरणाची पाणीपातळी ४३ टक्क्यांपर्यंत खाली आली असून, मागील वर्षी आजच्या दिवशी उजनी धरणात १०५.८१ टक्के ...

ठळक मुद्देआॅगस्ट महिन्यात पाणीसाठा होता १०६ टक्केधरणात सध्या ८६.९९ टीएमसी पाणीसाठा २३.३३ टीएमसी पाणी उपयुक्त साठा

भीमानगर :  उजनी धरणाचीपाणीपातळी ४३ टक्क्यांपर्यंत खाली आली असून, मागील वर्षी आजच्या दिवशी उजनी धरणात १०५.८१ टक्के एवढा पाणीसाठा होता. आॅगस्ट महिन्यात १०६ टक्के असलेला पाणीसाठा डिसेंबर महिन्यात कमालीचा घटला आहे. 

यावर्षीच्या पावसाळ्यात आॅगस्ट महिन्यात उजनी धरण १०६ टक्के भरूनही पाण्याचे नियोजन व्यवस्थित न झाल्यामुळे धरणातील पाणीसाठा कमालीचा कमी झाला असल्याचे जाणकार सांगतात. आज धरणात पाणीसाठा केवळ ४३ टक्के इतकाच आहे.याचे परिणाम ऐन उन्हाळ्यात दिसणार आहेत. सध्या सोलापूर शहरासाठी पाणी सोडण्याची मागणी होत असून ,रब्बी हंगामासाठीची जानेवारी महिन्यात बोगद्यातून सीना नदीत व कालव्याला पाणी सोडावे लागणार आहे. यामुळे जानेवारी- फेब्रुवारी महिन्यातच धरण रिकामे होणार आहे.

 सोलापूर, पुणे व अहमदनगर जिल्ह्यातून पाण्याचा उपसा सुरूच असून, त्यातच उन्हाळ्यात बाष्पीभवनाचे प्रमाणही वाढणार आहे. याशिवाय सीना-माढा उपसा सिंचन योजना, दहिगाव उपसा सिंचन योजना, बार्शी उपसा सिंचन, शिरापूर उपसा सिंचन योजना या सर्व योजनांना ठरल्याप्रमाणे आवर्तने द्यावी लागणार आहेत.

यामुळे धरणातील साठा मायनसमध्ये येण्यास वेळ लागणार नाही. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्याप्रामणे उजनीच्या डाव्या व उजव्या कालव्याला साधारणपणे जानेवारीच्या २० तारखेला पाणी सोडण्याचे नियोजन आहे. जानेवारीमध्ये सोडलेले पाणी साधारणत: ३० दिवस सुरू राहणार आहे. त्यानंतर मार्च महिन्यापर्यंत पाण्याची फार अशी गंभीरता जाणवणार नाही, मात्र त्यानंतर पाणी.. पाणी.. करण्याची वेळ येणार आहे.

धरणात २३.३३ टक्के उपयुक्त साठा- धरणात सध्या ८६.९९ टीएमसी पाणीसाठा असला तरी त्यापैकी २३.३३ टीएमसी पाणी उपयुक्त साठा आहे. त्यानंतर मात्र मृत साठ्यातील पाणी वापरावे लागणार आहे. हे पाणी पुढील वर्षी जुलै-आॅगस्ट महिन्यापर्यंत जपून वापरावे लागणार आहे. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात धरणातील पाणीसाठा १०५ टक्के होता, तरीही जुलैपर्यंत धरण मायनसमध्ये आले होते. यावर्षीची स्थिती तर फारच गंभीर आहे. 

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणWaterपाणीwater shortageपाणीटंचाई