शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

जलदिन विशेष : तहान लागण्यापूर्वीच पाण्याची किंमत ओळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 13:09 IST

सोलापूर शहरासह जिल्ह्यातील नागरिकांनी पाणी वापराकडे गांभीर्याने पाहण्याची गरज

ठळक मुद्देसोलापूर जिल्हा हा पाणी वापराच्या बाबतीत ‘श्रीमंत’ सोलापूर जिल्ह्यात १ जून ते ३० सप्टेंबर हा कालावधी पावसाचा गणला जातो

समीर इनामदारसोलापूर: पाण्याची किंमत तहानलेल्याच कळते असे म्हटले तरी तहान लागण्यापूर्वीच त्याची किंमत कळाली तर... सोलापूर शहर आणि जिल्ह्यात पडणारा पाऊस, वापरले जाणारे पाणी आणि त्याचा होणारा गैरवापर पाहिले तर आपण पाण्याकडे अजूनही गांभीर्याने पाहत नाही, हे लक्षात येते.

सोलापूर जिल्हा आपण दुष्काळी म्हणून अनेक वर्षांपासून सांगतो. परंतु इतर जिल्ह्यांची स्थिती पाहिल्यानंतर सोलापूर जिल्हा हा पाणी वापराच्या बाबतीत ‘श्रीमंत’ असल्याचे दिसून येते. ज्या पद्धतीने पाण्याचा वापर इथले नागरिक करताहेत, ते मागील कटू अनुभव लक्षात घेताना दिसून येत नाहीत.

सोलापूर जिल्ह्यात १ जून ते ३० सप्टेंबर हा कालावधी पावसाचा गणला जातो. साधारणत: ५५० मि. मी. इतका पाऊस या कालावधीत पडतो, असे मागील अंदाजावरून सांगता येते. कधी तो सरासरीइतका पडतो तर काही वर्षी तो सरासरीपेक्षा खूपच कमी पडतो. मागील वर्षी सोलापूर जिल्ह्यात चांगला पाऊस झाला म्हणजे सरासरी ४०७.२३ मि. मी. पाऊस पडला. ही सरासरी ८३ टक्के इतकी होती. सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी म्हणून गणले गेलेले ‘उजनी’ धरणही तुडुंब भरले. पर्यायाने सोलापूर जिल्ह्याची भूजल पातळी काही प्रमाणात वाढली. याला कारणीभूत जलयुक्त शिवारांतर्गत करण्यात आलेली कामे आहेत, हेही विसरता येणार नाही.

गेली काही वर्षे पाण्यासाठी टँकरची वाट पाहणारी गावे त्याचवेळी देशात सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा असे परस्परविरोधी दृष्य जिल्ह्यात पाहावयास मिळाले. सोलापूर जिल्ह्यात आढळणारा खडक, पाणी साठवण्याची क्षमता आणि त्याचा वापर याचे प्रमाण पाहिले असता सोलापूर जिल्हा मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर करतो हे निश्चित. मूळ अहवालानुसार उजनी धरणाची साठवण क्षमता ११०.७८ टीएमसी असून, वार्षिक पाणी वापर ८५.५९ टीएमसी आहे.

आता सुधारित प्रकल्प अहवालानुसार उजनी प्रकल्पाची साठवण क्षमता ११७.२५ टीएमसी इतकी असून, उपयुक्त पाणीसाठा ५३.५८ टीएमसी व वार्षिक पाणी वापर ८३.९४ टीएमसी इतका आहे. उजनीद्वारे सोलापूर शहर, करमाळा, पंढरपूर, कुर्डूवाडी, सांगोला, अक्कलकोट, मंगळवेढा, इंदापूर इत्यादी शहरांना नगरपालिका व महानगरपालिकेद्वारे एकंदरीत ४२६ गावे व ३५ लाख लोकसंख्येस पिण्याच्या पाण्याची सोय केली जाते. त्याशिवाय १३ औद्योगिक संस्था, २३ साखर कारखाने, एनटीपीसी यांना पाणीपुरवठा करण्यात येतो. 

वाया जाणाºया पाण्याचे काय?- भारतामध्ये सुमारे ४१ हजार टीएमसी इतके पाणी समुद्राला जाऊन मिळते. सोलापूर जिल्ह्यातही पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून जाते. त्याशिवाय भूजलाचा वापरही मोठ्या प्रमाणावर केला जातो. याद्वारेही पाणी खूप वाया जाते. हे पाणी साठवून ठेवण्याची तयारी प्रशासनाने आणि नागरिकांनी करायला हवी. शेततळी, जलपुनर्भरण यांचाही वापर मोठ्या प्रमाणात करायला हवा. 

टॅग्स :SolapurसोलापूरWaterपाणी