शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
2
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
3
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
4
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
5
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
6
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
7
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
8
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
9
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
10
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
11
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
12
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
13
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
14
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
15
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
16
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
17
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
18
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
19
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
20
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा

जलदिन विशेष : तहान लागण्यापूर्वीच पाण्याची किंमत ओळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 13:09 IST

सोलापूर शहरासह जिल्ह्यातील नागरिकांनी पाणी वापराकडे गांभीर्याने पाहण्याची गरज

ठळक मुद्देसोलापूर जिल्हा हा पाणी वापराच्या बाबतीत ‘श्रीमंत’ सोलापूर जिल्ह्यात १ जून ते ३० सप्टेंबर हा कालावधी पावसाचा गणला जातो

समीर इनामदारसोलापूर: पाण्याची किंमत तहानलेल्याच कळते असे म्हटले तरी तहान लागण्यापूर्वीच त्याची किंमत कळाली तर... सोलापूर शहर आणि जिल्ह्यात पडणारा पाऊस, वापरले जाणारे पाणी आणि त्याचा होणारा गैरवापर पाहिले तर आपण पाण्याकडे अजूनही गांभीर्याने पाहत नाही, हे लक्षात येते.

सोलापूर जिल्हा आपण दुष्काळी म्हणून अनेक वर्षांपासून सांगतो. परंतु इतर जिल्ह्यांची स्थिती पाहिल्यानंतर सोलापूर जिल्हा हा पाणी वापराच्या बाबतीत ‘श्रीमंत’ असल्याचे दिसून येते. ज्या पद्धतीने पाण्याचा वापर इथले नागरिक करताहेत, ते मागील कटू अनुभव लक्षात घेताना दिसून येत नाहीत.

सोलापूर जिल्ह्यात १ जून ते ३० सप्टेंबर हा कालावधी पावसाचा गणला जातो. साधारणत: ५५० मि. मी. इतका पाऊस या कालावधीत पडतो, असे मागील अंदाजावरून सांगता येते. कधी तो सरासरीइतका पडतो तर काही वर्षी तो सरासरीपेक्षा खूपच कमी पडतो. मागील वर्षी सोलापूर जिल्ह्यात चांगला पाऊस झाला म्हणजे सरासरी ४०७.२३ मि. मी. पाऊस पडला. ही सरासरी ८३ टक्के इतकी होती. सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी म्हणून गणले गेलेले ‘उजनी’ धरणही तुडुंब भरले. पर्यायाने सोलापूर जिल्ह्याची भूजल पातळी काही प्रमाणात वाढली. याला कारणीभूत जलयुक्त शिवारांतर्गत करण्यात आलेली कामे आहेत, हेही विसरता येणार नाही.

गेली काही वर्षे पाण्यासाठी टँकरची वाट पाहणारी गावे त्याचवेळी देशात सर्वाधिक साखर कारखाने असणारा जिल्हा असे परस्परविरोधी दृष्य जिल्ह्यात पाहावयास मिळाले. सोलापूर जिल्ह्यात आढळणारा खडक, पाणी साठवण्याची क्षमता आणि त्याचा वापर याचे प्रमाण पाहिले असता सोलापूर जिल्हा मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर करतो हे निश्चित. मूळ अहवालानुसार उजनी धरणाची साठवण क्षमता ११०.७८ टीएमसी असून, वार्षिक पाणी वापर ८५.५९ टीएमसी आहे.

आता सुधारित प्रकल्प अहवालानुसार उजनी प्रकल्पाची साठवण क्षमता ११७.२५ टीएमसी इतकी असून, उपयुक्त पाणीसाठा ५३.५८ टीएमसी व वार्षिक पाणी वापर ८३.९४ टीएमसी इतका आहे. उजनीद्वारे सोलापूर शहर, करमाळा, पंढरपूर, कुर्डूवाडी, सांगोला, अक्कलकोट, मंगळवेढा, इंदापूर इत्यादी शहरांना नगरपालिका व महानगरपालिकेद्वारे एकंदरीत ४२६ गावे व ३५ लाख लोकसंख्येस पिण्याच्या पाण्याची सोय केली जाते. त्याशिवाय १३ औद्योगिक संस्था, २३ साखर कारखाने, एनटीपीसी यांना पाणीपुरवठा करण्यात येतो. 

वाया जाणाºया पाण्याचे काय?- भारतामध्ये सुमारे ४१ हजार टीएमसी इतके पाणी समुद्राला जाऊन मिळते. सोलापूर जिल्ह्यातही पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून जाते. त्याशिवाय भूजलाचा वापरही मोठ्या प्रमाणावर केला जातो. याद्वारेही पाणी खूप वाया जाते. हे पाणी साठवून ठेवण्याची तयारी प्रशासनाने आणि नागरिकांनी करायला हवी. शेततळी, जलपुनर्भरण यांचाही वापर मोठ्या प्रमाणात करायला हवा. 

टॅग्स :SolapurसोलापूरWaterपाणी