शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली स्फोटातील कारचा मालक सलमान पोलिसांच्या ताब्यात; गाडी दुसऱ्याला विकल्याचा दावा! पोलिसांची चौकशी सुरू
2
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
3
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
4
Red Fort Blast Video: अनेकांच्या उडाल्या चिंधड्या! स्फोटानंतरची दृश्ये बघून होईल थरकाप, नेमकी कुठे घडली घटना?
5
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
6
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
7
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क
8
Delhi Red Fort Blast: मोठी बातमी! दिल्लीत लाल किल्ल्याजवळ भीषण स्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
9
कुणाचा हात तुटून पडला, कुणाचा कोथळा बाहेर आला; प्रत्यक्षदर्शीने सांगितली दिल्ली स्फोटाची हादरवून टाकणारी घटना
10
'त्या' जमीन गैरव्यवहार प्रकरणात पार्थ पवार, शीतल तेजवानींना पोलिसांकडून क्लीन चिट
11
भयानक कोसळणार ...! मी १९७१ पासून सोने खरेदी करतोय, पण...; रॉबर्ट कियोसाकी यांच्या दाव्याने खळबळ 
12
दहशतवाद्यांच्या टोळीत महिला डॉक्टरही सामील, थेट पाकिस्तानशी कनेक्शन; कारमध्ये घेऊन फिरत होती एके ४७!
13
जडेजाला संघाबाहेर काढण्यात धोनी सगळ्यात पुढे असेल! माजी क्रिकेटरनं त्यामागचं कारणही सांगून टाकलं
14
भारताच्या शेजारी देशांत भरतो 'नवरीचा बाजार', खरेदी करण्यासाठी चीनमधून येतात लोक! काय आहे प्रकार?
15
राष्ट्रवादीने हटवले तरी रुपाली ठोंबरे पाटील 'प्रवक्त्या'च; पोस्ट करत म्हणाल्या, 'अजित पवारांना भेटून...'
16
ताजमहालसमोर साखरपुडा...! दोनवेळा ऑस्ट्रेलियाला वर्ल्डकप जिंकविणारी भारताची सून होणार; कोण आहे ती...
17
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
18
"मी तुझ्या बापाला मारलं, मृतदेह सुटकेसमध्ये..."; बायकोने नवऱ्याला संपवलं, लेकीला केला फोन
19
Honeymoon Destinations : गुलाबी थंडीत रोमँटिक हनिमून प्लॅन करताय? भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट!
20
"पंक्चर बनवणारे येऊन...!", बिहारमध्ये योगी आदित्यनाथांची तुफान बॅटिंग; विरोधकांवर थेट हल्लाबोल

स्वत:च्या पुढे जाऊन विचार करायचाय...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 13:51 IST

निसर्गाने रुद्रावतार धारण केला, की संपूर्ण मानवजात आत्मसमर्पित होते, याचं मानवजातीच्या इतिहासातील उदाहरण म्हणजे कोरोना. एवढासा न दिसणारा विषाणू... ...

निसर्गाने रुद्रावतार धारण केला, की संपूर्ण मानवजात आत्मसमर्पित होते, याचं मानवजातीच्या इतिहासातील उदाहरण म्हणजे कोरोना. एवढासा न दिसणारा विषाणू... त्यानं सारं जग हलवून सोडलं. प्रचंड उलथापालथ केलीय. तसं तर मानवानं अशा साथीच्या रोगाची अनेक संकट झेलली, पेलली, त्यावर मातही केली. महाराष्ट्राने आणि मराठी माणसाने तर १८९६ च्या प्लेगसारख्या साथीला सक्षमतेनं तोंड दिलं. खंबीरपणा, संयम, लवचिकता हे महाराष्ट्राचे पारंपरिक आणि वारसाने मिळालेले गुण आहेत. यावेळी त्यात गांभीर्य हा गुण जोडायचा आहे. शासन, स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणा अत्यंत सक्षमपणे, जीवावर उदार होऊन काम करत आहे. पण त्यांचे यश आपल्या विश्वासातून आणि साथ देण्यातून मिळणार असतं.

घर, फ्लॅट, बंगला असलेले आपापल्या ठिकाणी सुरक्षित आहेत आणि यातलेच लोक कोणत्या ना कोणत्या निमित्ताने घराबाहेर पडत आहेत. 'गर्दी ' करत आहेत. संपूर्ण देशात आणि जिल्ह्यातही अनेक घटकांच्या मीठ-भाकरीचा प्रश्न सोडविण्यात अनेक सामाजिक संस्था पुढे येत आहेत. आपल्याच देशाचे नागरिक असलेल्या भटक्या जमाती, मजूर, स्थलांतरित यांचे या लॉकडाऊनमध्ये कितीतरी प्रश्न आवासून उभे आहेत. लोक कुठे कुठे दूर अडकले आहेत. कितीतरी संकटं सध्याच्या घडीला निर्माण झालेली आहेत. 

कोरोनाच्या या एकच महिन्याच्या काळात मानसिक रुग्णांच्या संख्येत २० टक्के वाढ झालेली आहे. त्यांचेही प्रश्न ‘सार्क’, ‘अंनिस’ आणि ‘स्पा’सारख्या संस्था सोडवत आहेत. मग आता आपल्याला प्राधान्य कोणत्या गोष्टीला द्यायचं आहे? संकट रोखण्याला. हे युद्ध मानवच जिंंकणार याला इतिहासाची साक्ष आहे. पण फक्त मानवता बाळगायला हवी आहे. कुणालाही कोरोनाचा संसर्ग होण्यासाठी कळत- नकळत सुद्धा मी कारणीभूत होणार नाही ही ती मानवता होय. दुसरं म्हणजे जगात निर्माण झालेल्या प्रत्येक जंतूचा शेवट असतोच. कोरोनाचंही असंच होणार आहे. फक्त दोन महिने संयम बाळगायचाय आणि प्रशासन जे नियम आणतंय त्याला सक्ती न समजता काळजी समजायचंय. 

स्व - प्रतिमेवर प्रेम करणाºया, सतत सेलिब्रेशन करणाºया लोकांना हा काळ स्वत:साठी खूप कठिण वाटत आहे. आज कित्येक वर्षांनी पांढºया कोटवाल्यांकडे आणि खाकी वर्दीकडे पाहून आपण नतमस्तक होतोय. प्रार्थना मंदिरांऐवजी आरोग्यमंदिरांची निकड कधी नव्हे इतकी वाटू लागली आहे़ डॉक्टर्स, शासन सगळे फक्त खबरदारी घ्या, काळजी घ्या असं सांगत आहेत. आपण काय करतो आहोत? पोलीस अधिकारी मुलाखतीतून पुन्हा पुन्हा सांगत आहेत, ‘लोक असं का करत आहेत, गांभीर्य का समजून घेत नाहीत याचीच चिंंता वाटते.’ शेवटी असं वाटायला लागलंय कोरोना तुम्हाला मारायला येत नाहीय, तुम्हीच मृत्यूच्या उंबरठ्यावर जाऊन उभं राहताय.

मग काय करायचं घरात बसून! आम्हाला कामाची सवय आहे, मी कधी घरात रिकामा बसत नसतो हा वृथा अभिमान मात्र उफाळून येतोय. त्यापेक्षा आता घरात राहून स्वत:साठी, कुटुंबासाठी आणि सर्वांच्या आरोग्यासाठी अनेक गोष्टी करता येऊच शकतात. 

प्रसारमाध्यमेही हे सर्व उपाय सुचविण्याची जबाबदारी उत्तमरित्या पार पाडत आहेतच. मात्र कोरोना ही इष्टापत्ती समजून विकासाच्या संधी कशा उपलब्ध होतील याचा भविष्यकालीन विचार आवश्यक आहे. तरच तो 'स्व' चा लोप करीत समाजाचा आणि आजघडीला विश्वाचा व्यापक विचार ठरेल. प्रकाशाच्या झगमगाटात आपली तारे पाहण्याची क्षमता कमी झालीय. घरात राहण्याची सक्ती असल्यामुळे स्वत:पासून आणि जगापासून दूर गेल्याची भावना येतेय. मोबाईल, टी. व्ही., कॉम्प्युटरपासून थोडं जरी अलिप्त राहिलं तरी असुरक्षित वाटू लागतं. माझा मौल्यवान वेळ जातोय असंही वाटू लागतं. केवळ पैसा कमावण्यासाठी वेळ देणं म्हणजेच मौल्यवान वेळ ही समजूत होतेय. घरात बसा आणि विवेकी विचार करा!- प्रा. डॉ. नभा काकडे,(लेखिका शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत)

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस