शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
3
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
4
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
5
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
6
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
7
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
8
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
9
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
10
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
11
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
12
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
13
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
14
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
15
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
16
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
17
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
18
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
19
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
20
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं

वांगीकरांच्या श्रमदानानं बंद हातपंप सुरू झाले अन् विहिरींची वाढली पाणीपातळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 8:29 PM

पाणी फाउंडेशनच्या निमित्ताने केलेल्या कामामुळे गावाचा तालुक्यात प्रथम क्रमांक आला व पाणीही अडले.

ठळक मुद्देउत्तर सोलापूर तालुक्यात आजतरी पाण्याचा दुष्काळ हटलेला नाहीमागील वर्षीही अशीच भीषण परिस्थिती निर्माण झाली होतीगतवर्षी संपूर्ण पावसाळ्यात गावचा वांगीरा ओढा वाहण्याइतका पाऊस पडला नाही

अरुण बारसकर

बीबीदारफळ : खळखळण्यासारखा पाऊस पडला नाही म्हणून वांगीरा ओढाही वाहिला नाही. पाण्याचा दुष्काळ पडल्याची जाणीव झाली अन् वांगीकर टिकाव, फावडे, घमेले घेऊन कामाला लागले. केलेल्या कामाचे बक्षीस तर मिळालेच शिवाय जेमतेम पावसामुळे बंद हातपंप सुरू झाले व विहिरींची पाणीपातळीही वाढली.

उत्तर सोलापूर तालुक्यात आजतरी पाण्याचा दुष्काळ हटलेला नाही. कारण पुरेसा पाऊस पडलेला नाही. मागील वर्षीही अशीच भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. अन्य गावांप्रमाणे वांगी गावातही पाण्याची स्थिती. गतवर्षी संपूर्ण पावसाळ्यात गावचा वांगीरा ओढा वाहण्याइतका पाऊस पडला नाही. यामुळे पाण्याची पातळी खोलवर गेली. काही तरी केले पाहिजे हा विचार सुरू असताना सत्यमेव जयते पानी फाउंडेशनच्या कामाची चर्चा सुरू झाली. कारण शेजारच्या भागाईवाडी, वडाळा व इतर गावांच्या एकजुटीने होणारा गावाचा विकास वांगीकरांना दिसत होता.

वांगीतील काही युवक-महिला प्रशिक्षण घेऊन आले. प्रशिक्षणात गावकºयांच्या श्रमदानातून सरकारच्या कामातून गाव बदलतंय ही धारणा झालेली. आपणही वांगीरा ओढ्याचा फायदा घ्यायचा या ईर्षेने प्रशिक्षणाला गेलेले तरुण पेटले होते. त्यांनी २०-२५ गावकºयांना सोबत घेत ८ एप्रिलला कामाचा श्रीगणेशा केला. पानी फाउंडेशनचे प्रशिक्षित पाणी अडविण्याची शास्त्रोक्त पद्धत सांगत असत. कसा तरी एप्रिल महिना सरला व मे महिना सुरू झाला. 

गावाच्या परिसरातील पाण्याचे स्रोत कोरडे पडले. ५०० फूट खोलीचे बोअरही बंद झाले तर ७०० फूट खोलीचा एखादा बोअर उचक्या देत कधी-कधी पाणी फेकू लागला. हे चित्र आपणच बदलू शकतो, ही पक्की धारणा झालेले गावकरी जोमाने कामाला लागले. शासनाची कामे, गावकºयांचे श्रमदान, सामाजिक संस्था व कंपन्यांनीही हातभार लावल्याने पाणी अडविण्याची कामे झाली.

शोषखड्ड्यांचा झाला फायदा- पावसाळा सुरू झाला अन् वांगी परिसरात रिमझिम पाऊस पडू लागला. शेतात पाणी अडविण्याची तर गावात शोषखड्ड्याची कामे झाली. तीन-चार पाऊस बºयापैकी पडला व पाणी थळथळले. जमिनीत पाणी मुरले व जिरलेही. - शोषखड्ड्यामुळे गावातील बंद पडलेले पाच हातपंप सुरू झाले तर पाणीपुरवठा बोअरचे पाणी वरती आले आहे. कोरड्या पडलेल्या विहिरींनाही आता पाणी आले आहे. वांगीरा ओढ्यालगतच्या विहिरीत तर पाण्यात चांगली वाढ झाली आहे.

या वर्षी २२९ मि.मी. पाऊस पडला आहे. पडलेल्या पावसाचा फायदा पाणीपातळी वाढण्यासाठी झाला आहे. आणखीन चांगला पाऊस पडला तर दुष्काळ हटेल. पाणी फाउंडेशनच्या निमित्ताने केलेल्या कामामुळे गावाचा तालुक्यात प्रथम क्रमांक आला व पाणीही अडले.- किसन गायकवाड वॉटर कप प्रशिक्षणार्थी

टॅग्स :SolapurसोलापूरWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धाwater shortageपाणीकपातgram panchayatग्राम पंचायतSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय