शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
4
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
5
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
6
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
7
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
8
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
9
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
10
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
11
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
12
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
13
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
14
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
15
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
16
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
17
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
18
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
19
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
20
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
Daily Top 2Weekly Top 5

एक घागर पाण्यासाठी तीन तासांची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 15:06 IST

मोहोळ तालुक्यातील नरखेड गावातील दुष्काळी कहाणी; पाण्याअभावी विहिर, बोअर पडले कोरडे

ठळक मुद्देवैराग रोडवर मोहोळपासून १३ कि.मी. अंतरावर वसलेले साडेपाच हजार लोकसंख्येचे नरखेड हे गावभोगावती नदी गेल्या सहा महिन्यांपासून व सीना नदी महिन्यापासून कोरडी जमिनीतील पाणीपातळी खोल गेल्यामुळे ४०० फुटांपर्यंत बोअर घेतले तरी ते कोरडे जात असल्याने गावकरी आणि शेतकरी हतबल

हणमंत पवार 

नरखेड : वैराग रोडवर मोहोळपासून १३ कि.मी. अंतरावर वसलेले साडेपाच हजार लोकसंख्येचे नरखेड हे गाव. गावात मोठ्या वाड्या-वस्त्या. गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी भोगावती नदीमध्ये दोन विहिरी, ग्रामपंचायत कार्यालयालगत विहीर, सीना नदीवरून दोन गावांतर्गत पाईपलाईन, गावामध्ये पाण्याचे ४ आड, ४ हातपंप, १०-१२ बोअर एवढी साधने असूनही फक्त ग्रामपंचायत कार्यालयातील बोअर आणि सीना नदीवरील संगमावरून केलेली पाईपलाईन हा पर्याय वगळला तर गावातील विहिरी, बोअर आटले आहेत.

ग्रामपंचायतीचे सर्वच बोअर बंद पडले आहेत. सिद्धेश्वर मंदिरासमोरील बोअरला तुटक-तुटक पाणी येत असल्याने हा आधारही कधी बंद पडेल, याचा भरवसा राहिलेला नाही.

ज्वारी हे मुख्य पीक गावकरी घेतात, मात्र पाण्याअभावी उत्पादन घटले आहे. ज्वारीव्यतिरिक्त इतर पिके पाण्याअभावी जळून चालली आहेत. भोगावती नदी गेल्या सहा महिन्यांपासून व सीना नदी महिन्यापासून कोरडी आहे. जमिनीतील पाणीपातळी खोल गेल्यामुळे ४०० फुटांपर्यंत बोअर घेतले तरी ते कोरडे जात असल्याने गावकरी आणि शेतकरी हतबल झाले आहेत. 

गावाशेजारील अनेक वाड्यावस्त्यांवर बोअर, विहिरी आहेत. त्याही २० ते २५ मिनिटांपुढे चालत नाहीत. शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय आहे. गावात ४-५ दूध डेअºया आहेत, परंतु पाणीटंचाईमुळे हा व्यवसाय धोक्यात आला आहे. दुपारच्या तीव्र उन्हामध्येसुद्धा पिण्याच्या व जनावरांच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. जनावरांच्या खाद्याचे भाव वाढल्याने दुधाचा व्यवसायही तोट्यात आल्याने गावकºयामंध्ये नैराश्य दिसत आहे. नरखेड भागासह गावात चारा छावणीची मागणी करूनसुद्धा मंजूर झाली नाही.

या संकटाच्या दिवसात गावातील बागायतदार बांधव स्वत:च्या पीकशेतीला पाणी न देता तेच पाणी गावाला देत आहेत. सोसायटी चेअरमन जयवंत पाटील, काकासाहेब पाटील, गौरीहर भडंगे, पांडुरंग शेंडगे, वसंत भडंगे, हरिदास मोटे, सुनील भडंगे यांनी या कामी पुढाकार घेतला आहे. काही बोअरमालकांनीही सहकार्याचा हात गावासाठी पुढे केला आहे. नरखेडसह मसले चौधरी, देगाव येथे सर्वात जास्त पाणीटंचाई असून त्या खालोखाल डिकसळ, भोयरे, एकुरके, बोपले, मलिकपेठ, हिंगणी, भांबेवाडी, यलमवाडी आदी भागातील वाड्यावस्त्यांवर पाणीटंचाई भासत आहे.

पाणी मिळविण्यासाठी अख्या गावात जणू स्पर्धाच..- या गावाला भेट दिली तेव्हा ग्रामपंचायतीसमोरील बोअरवर प्रचंड गर्दी दिसली. दोन घागरीसाठी व्यवसाय-कामधंदा सोडून नंबर लावून दिवसभर रांगेत असलेले गावकरी दिसले. ते म्हणाले, फक्त दोन घागरीसाठी दिवसभर रांगेत ३ तास उभे राहावे लागत आहे. संगमावरील सीना नदीवर पाण्यासाठी खड्डा खोदून नवीन पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. दोन टँकरद्वारे गावात पाणी येते. ते विहिरीमध्ये सोडले जाते. तेथून पाईपलाईनने गावाला येते. ते मिळविण्यासाठी अख्या गावात जणू स्पर्धा असते. 

गावातील सर्व विहिरी कोरड्या पडल्याने आम्ही सीना नदीवरील संगमातून नवीन पाईपलाईन केली आहे, तर दोन टँकर व काही बोअरच्या माध्यमातून गावातील पाणीटंचाई दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे.- उमेश पाटील, जि. प. सदस्य 

सीना नदीवरील घाटणे बॅरेज ५ ते ७ मीटरने अडविल्यास व गावातील पाण्याचे नियोजन केल्यास नरखेडसह भागातील पाणीटंचाई दूर होण्यासाठी मदत होईल. त्यासाठी सीना-भोगावती जोडकालवा होणे गरजेचे आहे. - शहाजी मोटे, माजी सरपंच

ग्रामपंचायतीला पाणीपुरवठ्यासाठी शासनाच्या वतीने मोठा निधी उपलब्ध झाला आहे. परंतु दुष्काळ, पाणीटंचाई व नियोजनाअभावी पाण्यासाठी लोकांचे हाल होत आहेत.- सुधाकर काशिद गुरुजी, अंनिस कार्यकर्ते 

नरखेडमधील पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासनाकडून दोन टँकरला मंजुरी मिळाली आहे. नवीन पाईपलाईन व काही बोअरच्या आणि गावाशेजारील शेतकºयांच्या खासगी बोअरच्या माध्यमातून पाणीटंचाई दूर करण्याचा प्रयत्न चालू आहे.-तात्यासाहेब नाईकनवरे, ग्रामसेवक

टॅग्स :Solapurसोलापूरdroughtदुष्काळWaterपाणीwater transportजलवाहतूक