शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
2
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
3
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
4
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
5
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
6
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
7
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
8
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
9
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
10
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
11
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
12
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज
13
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
14
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
15
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
16
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
17
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
18
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
19
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
20
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 

प्रक्षाळ पूजेने विठ्ठल-रुक्मिणीचा शिणवटा दूर!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 3:48 AM

अनेक वर्षांची परंपरा : केशरयुक्त पाण्याने घातले स्नान; दैनंदिन नित्योपचार पूर्ववत सुरू

पंढरपूर (जि़सोलापूर): आषाढी वारी सोहळ्यादरम्यान २४ तास अखंडपणे उभे दर्शन दिल्यामुळे देवाला आलेला थकवा किंवा शिणवटा दूर करण्यासाठी प्रक्षाळपूजा करण्यात आली. या पूजेप्रसंगी विठ्ठल-रुक्मिणी मातेस केशरयुक्त पाण्याने स्नान घालण्यात आले़ त्यानंतर, खास पुरणपोळीचा नैवेद्य दाखविण्यात आला. शिवाय रात्री १४ पदार्थ घालून खास बनविण्यात आलेला काढाही दाखविण्यात आला़ ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे.

पंढरीत येणाऱ्या प्रत्येक भक्ताला विठ्ठलाचे दर्शन घडावे, यासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी माता हे रात्रंदिवस अखंडपणे उभे असतात, अशी श्रद्धा आहे. यात्रेच्या काळात मंदिरातील दररोजचा पहाटेचा काकडा, सायंकाळी साडेपाच वाजताचे दागिने, पोशाख घालणे, सायंकाळी धूप आरती, रात्री शेजारती असे नित्योपचार बंद असतात. यात्रेच्या आधीच देवाचा पलंगदेखील काढण्यात येत असतो. त्यामुळे भक्तांना अहोरात्र अखंडपणे दर्शन देऊन श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेला थकवा येतो, असे मानले जाते. देवाला आलेला थकवा किंवा शिणवटा काढण्यासाठीच आषाढी वारी सोहळ्यानंतर मंदिरात खास प्रक्षाळपूजेचा उत्सव साजरा करण्याची ही परंपरा पूर्वापार चालत आलेली आहे. त्यानुसार २१ जुलै रोजी मंदिराची स्वच्छता करण्यात आली. त्यानंतर विठ्ठल-रुक्मिणीमातेला केशरयुक्त गरम पाण्याने स्नान घालण्यात आले़प्रक्षाळ पूजा मंदिरे समितीचे सदस्य संभाजी शिंदे यांनी सपत्नीक केली. प्रक्षाळपूजेनिमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीस पारंपरिक दागिने व आकर्षक पोशाख परिधान करण्यात आला होता. तसेच विठ्ठल रुक्मिणीच्या गाभाºयाला देखील विविध रंगीबेरंगी फुलांनी आकर्षक पद्धतीने सजविण्यात आले होते़ आजपासून श्री विठ्ठलावरील रोजचे नित्योपचार सुरू करण्यात आल्याची माहिती व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांनी दिली. प्रक्षाळपूजेनंतर मंदिरातील विठ्ठलाचे व रुक्मिणीमातेचे दैनंदिन नित्योपचार पूर्ववत सुरु झाले. पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुक्मिणीला पारंपरिक दागिने व आकर्षक पोशाख परिधान करण्यात आला होता़ गाभाराही फुलांनी सजविण्यात आला होता़

१४ पदार्थांपासून बनविला काढाश्री विठ्ठल-रुक्मिणी मातेचा थकवा दूर व्हावा, यासाठी खास काढा देण्याची जुनी परंपरा आहे. त्यानुसार गवती चहाची पाने, गूळ, जायफळ, लेंडीपिंपळी, ज्येष्ठमध, काळे मिरे, काजू, बदाम, खारीक, सुंठ, बेदाणा, लवंग, वेलदोडा, चारोळे आदी विविध पदार्थांपासून खास काढा बनविण्यात आला होता़ हा काढा रात्रीच्या वेळी विठ्ठलाला दाखविण्यात येतो. भक्तांना यात्राकाळात २४ तास दर्शन देऊन विठ्ठलाला आलेला शिणवटा किंवा थकवा या काढ्यामुळे दूर होतो, अशी यामागची भावना असल्याचे सांगण्यात आले़

टॅग्स :Pandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीर