शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

दक्षिण तालुक्यातील वडापूर बॅरेजेसला जलसंपदा खात्याची तत्त्वत: मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 12:07 IST

सोलापूर :  दक्षिण सोलापूर तालुक्यात  भीमा नदीवर वडापूर बॅरेजेससाठी जलसंपदा मंत्र्यांनी तत्त्वत: मान्यता दिली असून, यासाठी तातडीने प्रस्ताव सादर ...

ठळक मुद्दे२२ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून १९८९ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणारसन २००३ पासून वडापूर धरणाच्या मुद्यावर राजकारण सुरूसोलापूर जिल्ह्यातील भीमा नदीवर २४, सीनावर २२ व नीरा नदीवर ५ को.प.बंधारे आहेत

सोलापूर :  दक्षिण सोलापूर तालुक्यात  भीमा नदीवर वडापूर बॅरेजेससाठी जलसंपदा मंत्र्यांनी तत्त्वत: मान्यता दिली असून, यासाठी तातडीने प्रस्ताव सादर केल्यास प्रशासकीय मंजुरी देण्याची तयारी त्यांनी दर्शविली आहे. या बॅरेजेससाठी २२ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून १९८९ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे, अशी माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

सन २००३ पासून वडापूर धरणाच्या मुद्यावर राजकारण सुरू होते. वडापूर गावचे विस्थापन, धरणाचा खर्च अशा अनेक समस्या समोर असताना मागील २० वर्षांपासून धरण केवळ चर्चेचा विषय ठरले होते. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी धरण बांधण्याऐवजी या ठिकाणी बॅरेजेसचा प्रस्ताव मांडला.  धरणाऐवजी बॅरेजेस बांधल्यास गावच्या जमिनी शाबूत राहतील आणि गावच्या विस्थापनाचा प्रश्न उद्भवणार नाही, हा मुद्दा प्रभावीपणे मांडला. त्यामुळे पाणी तंटा लवादाचे उल्लंघन देखील होणार नाही असा निर्णय झाला. जलसंपदा विभागाकडे वारंवार झालेल्या बैठका व पाठपुराव्यातून आज ४.६७२ द. ल. घ. मी.च्या पाणी साठवण क्षमतेच्या वडापूर बॅरेजेसला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी तत्त्वत: मान्यता दिल्याची माहिती सहकारमंत्री देशमुख यांनी दिली .

दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर येथे होणाºया बॅरेजेसमुळे १९८९ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून, आजूबाजूच्या  गावांनाही याचा लाभ होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाच्या खालील बाजूस कर्नाटक राज्यातील सीमेपर्यंत भीमा नदीची लांबी २६० कि.मी. आहे. तसेच सीना नदीची भीमा-सीना जोड कालव्यापासून खालील भागात भीमा नदीच्या संगमापर्यंतची लांबी १३५ कि.मी. आहे. व नीरा नदी ते भीमा नदी संगमापर्यंतची नीरा नदीची लांबी २५ कि.मी. आहे. सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदीवर २४, सीनावर २२ व नीरा नदीवर ५ को.प.बंधारे आहेत. 

या ठिकाणी बॅरेजेस बांधण्याबाबतची मागणी केली आहे. या नद्यांवर अस्तित्वातील एकूण ५१ बंधारे आहेत. तेथे बॅरेजेस व्हावे अशी मागणी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केली असून, प्रायोगिक तत्त्वावर वडापूर बॅरेजेसला मंजुरी देऊन सदरील ठिकाणी पहिले बॅरेजेस बांधण्यात येणार आहे व हीच संकल्पना जिल्ह्याला लागू होणार असल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

टॅग्स :SolapurसोलापूरWaterपाणीwater shortageपाणीटंचाईSubhash Deshmukhसुभाष देशमुखMaharashtraमहाराष्ट्र