शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण तालुक्यातील वडापूर बॅरेजेसला जलसंपदा खात्याची तत्त्वत: मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 12:07 IST

सोलापूर :  दक्षिण सोलापूर तालुक्यात  भीमा नदीवर वडापूर बॅरेजेससाठी जलसंपदा मंत्र्यांनी तत्त्वत: मान्यता दिली असून, यासाठी तातडीने प्रस्ताव सादर ...

ठळक मुद्दे२२ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून १९८९ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणारसन २००३ पासून वडापूर धरणाच्या मुद्यावर राजकारण सुरूसोलापूर जिल्ह्यातील भीमा नदीवर २४, सीनावर २२ व नीरा नदीवर ५ को.प.बंधारे आहेत

सोलापूर :  दक्षिण सोलापूर तालुक्यात  भीमा नदीवर वडापूर बॅरेजेससाठी जलसंपदा मंत्र्यांनी तत्त्वत: मान्यता दिली असून, यासाठी तातडीने प्रस्ताव सादर केल्यास प्रशासकीय मंजुरी देण्याची तयारी त्यांनी दर्शविली आहे. या बॅरेजेससाठी २२ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून १९८९ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे, अशी माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

सन २००३ पासून वडापूर धरणाच्या मुद्यावर राजकारण सुरू होते. वडापूर गावचे विस्थापन, धरणाचा खर्च अशा अनेक समस्या समोर असताना मागील २० वर्षांपासून धरण केवळ चर्चेचा विषय ठरले होते. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी धरण बांधण्याऐवजी या ठिकाणी बॅरेजेसचा प्रस्ताव मांडला.  धरणाऐवजी बॅरेजेस बांधल्यास गावच्या जमिनी शाबूत राहतील आणि गावच्या विस्थापनाचा प्रश्न उद्भवणार नाही, हा मुद्दा प्रभावीपणे मांडला. त्यामुळे पाणी तंटा लवादाचे उल्लंघन देखील होणार नाही असा निर्णय झाला. जलसंपदा विभागाकडे वारंवार झालेल्या बैठका व पाठपुराव्यातून आज ४.६७२ द. ल. घ. मी.च्या पाणी साठवण क्षमतेच्या वडापूर बॅरेजेसला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी तत्त्वत: मान्यता दिल्याची माहिती सहकारमंत्री देशमुख यांनी दिली .

दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर येथे होणाºया बॅरेजेसमुळे १९८९ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून, आजूबाजूच्या  गावांनाही याचा लाभ होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाच्या खालील बाजूस कर्नाटक राज्यातील सीमेपर्यंत भीमा नदीची लांबी २६० कि.मी. आहे. तसेच सीना नदीची भीमा-सीना जोड कालव्यापासून खालील भागात भीमा नदीच्या संगमापर्यंतची लांबी १३५ कि.मी. आहे. व नीरा नदी ते भीमा नदी संगमापर्यंतची नीरा नदीची लांबी २५ कि.मी. आहे. सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदीवर २४, सीनावर २२ व नीरा नदीवर ५ को.प.बंधारे आहेत. 

या ठिकाणी बॅरेजेस बांधण्याबाबतची मागणी केली आहे. या नद्यांवर अस्तित्वातील एकूण ५१ बंधारे आहेत. तेथे बॅरेजेस व्हावे अशी मागणी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केली असून, प्रायोगिक तत्त्वावर वडापूर बॅरेजेसला मंजुरी देऊन सदरील ठिकाणी पहिले बॅरेजेस बांधण्यात येणार आहे व हीच संकल्पना जिल्ह्याला लागू होणार असल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

टॅग्स :SolapurसोलापूरWaterपाणीwater shortageपाणीटंचाईSubhash Deshmukhसुभाष देशमुखMaharashtraमहाराष्ट्र