शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

दक्षिण तालुक्यातील वडापूर बॅरेजेसला जलसंपदा खात्याची तत्त्वत: मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2019 12:07 IST

सोलापूर :  दक्षिण सोलापूर तालुक्यात  भीमा नदीवर वडापूर बॅरेजेससाठी जलसंपदा मंत्र्यांनी तत्त्वत: मान्यता दिली असून, यासाठी तातडीने प्रस्ताव सादर ...

ठळक मुद्दे२२ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून १९८९ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणारसन २००३ पासून वडापूर धरणाच्या मुद्यावर राजकारण सुरूसोलापूर जिल्ह्यातील भीमा नदीवर २४, सीनावर २२ व नीरा नदीवर ५ को.प.बंधारे आहेत

सोलापूर :  दक्षिण सोलापूर तालुक्यात  भीमा नदीवर वडापूर बॅरेजेससाठी जलसंपदा मंत्र्यांनी तत्त्वत: मान्यता दिली असून, यासाठी तातडीने प्रस्ताव सादर केल्यास प्रशासकीय मंजुरी देण्याची तयारी त्यांनी दर्शविली आहे. या बॅरेजेससाठी २२ कोटी रुपये खर्च अपेक्षित असून १९८९ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे, अशी माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

सन २००३ पासून वडापूर धरणाच्या मुद्यावर राजकारण सुरू होते. वडापूर गावचे विस्थापन, धरणाचा खर्च अशा अनेक समस्या समोर असताना मागील २० वर्षांपासून धरण केवळ चर्चेचा विषय ठरले होते. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी धरण बांधण्याऐवजी या ठिकाणी बॅरेजेसचा प्रस्ताव मांडला.  धरणाऐवजी बॅरेजेस बांधल्यास गावच्या जमिनी शाबूत राहतील आणि गावच्या विस्थापनाचा प्रश्न उद्भवणार नाही, हा मुद्दा प्रभावीपणे मांडला. त्यामुळे पाणी तंटा लवादाचे उल्लंघन देखील होणार नाही असा निर्णय झाला. जलसंपदा विभागाकडे वारंवार झालेल्या बैठका व पाठपुराव्यातून आज ४.६७२ द. ल. घ. मी.च्या पाणी साठवण क्षमतेच्या वडापूर बॅरेजेसला जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी तत्त्वत: मान्यता दिल्याची माहिती सहकारमंत्री देशमुख यांनी दिली .

दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडापूर येथे होणाºया बॅरेजेसमुळे १९८९ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असून, आजूबाजूच्या  गावांनाही याचा लाभ होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणाच्या खालील बाजूस कर्नाटक राज्यातील सीमेपर्यंत भीमा नदीची लांबी २६० कि.मी. आहे. तसेच सीना नदीची भीमा-सीना जोड कालव्यापासून खालील भागात भीमा नदीच्या संगमापर्यंतची लांबी १३५ कि.मी. आहे. व नीरा नदी ते भीमा नदी संगमापर्यंतची नीरा नदीची लांबी २५ कि.मी. आहे. सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदीवर २४, सीनावर २२ व नीरा नदीवर ५ को.प.बंधारे आहेत. 

या ठिकाणी बॅरेजेस बांधण्याबाबतची मागणी केली आहे. या नद्यांवर अस्तित्वातील एकूण ५१ बंधारे आहेत. तेथे बॅरेजेस व्हावे अशी मागणी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केली असून, प्रायोगिक तत्त्वावर वडापूर बॅरेजेसला मंजुरी देऊन सदरील ठिकाणी पहिले बॅरेजेस बांधण्यात येणार आहे व हीच संकल्पना जिल्ह्याला लागू होणार असल्याची माहिती सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

टॅग्स :SolapurसोलापूरWaterपाणीwater shortageपाणीटंचाईSubhash Deshmukhसुभाष देशमुखMaharashtraमहाराष्ट्र