शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
IND vs ENG 5th Test Day 2, Stumps : दिवसभरात १५ विकेट्स! यशस्वी खेळीसह टीम इंडियाला दिलासा
3
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
4
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
5
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
6
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
7
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
8
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
9
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
10
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
11
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
12
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
13
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
14
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
15
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
16
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
17
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
18
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
19
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
20
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर

उत्पादन वाढीसाठी सेंद्रिय खताचा वापर करा, सहकारमंत्री सुभाष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 11:09 IST

सोलापूरात जिल्हा कृषी महोत्सवाचे थाटात उदघाटन, प्रदर्शनात २५० स्टॉल उभारले

ठळक मुद्देमहाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि आत्मा सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापुरातील होम मैदानावर सोलापूर जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजनकृषी महोत्सवात प्रदर्शनात २५० स्टॉल उभारले

सोलापूर : शेतकºयांनी उत्पादन वाढीसाठी माती परिक्षणाचा आग्रह धरावा. रासायनिक खतांचा वापर टाळून सेंद्रिय शेतीवर भर द्यावा. उत्पादन खर्चात कपात करावी आणि उत्पादित मालावर प्रक्रिया करून स्वत:च त्याचे मार्केटिंग करावे, असा सल्ला राज्याचे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी शेतकºयांना दिला. 

महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि आत्मा सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापुरातील होम मैदानावर सोलापूर जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे उद्घाटन रविवारी सकाळी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी देशमुख बोलत होते. पालकमंत्री विजयकुमार देशमुख अध्यक्षस्थानी होते. 

सहकारमंत्री म्हणाले, शेतकरी आज रासायनिक खते वापरून विषारी शेती करून त्यामध्ये विषारीच पिके आणि फळभाज्या तयार करत आहेत. रासायनिक खतांमुळे शेतीचा पोत बिघडत चालला आहे. रासायनिक शेती तात्पुरती फायदेशीर असली तरी सेंद्रिय शेतीचे अनेक फायदे आहेत. सेंद्र्रिय शेतीची आज काळाची गरज बनली आहे. हरितक्रांती करण्यासाठी शेतकरी आज आपल्या शेतीत रासायनिक खतांचा भडिमार करत आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. त्यामुळे रासायनिक खतांचा, कीटकनाशकांचा अतिवापर टाळून नैसर्गिक शेतीचा आग्रह धरावा, असे आवाहन त्यांनी केले.

 खतांच्या किमती स्थिर ठेवण्यात शासन यशस्वी ठरले आहे. यापूर्वी खतांची टंचाई नेहमीच निर्माण व्हायची, ऐन हंगामात खतांसाठी शेतकºयांच्या रांगा लागलेल्या आम्ही पाहिल्या़ युरियाचा वापर दुधाचे फॅट वाढवण्यासाठी तसेच हातभट्टी दारू बनवताना केला जायचा़ बहुतेक वेळा साठेबाजांकडून कृत्रिम टंचाई निर्माण केली जात होती . त्यामुळेच नरेंद्र मोदी सरकारने निमकोटिंग युरिया उत्पादन सुरू केले़परिणामी अन्यत्र होणारा युरियाचा वापर आता फक्त शेतीसाठीच केला जातो़ सध्या देशभर खते मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत़ गेल्या तीन वर्षांत युरियाचा काळाबाजारही झालेला नाही. खते मुबलक मिळत असताना केवळ दलालांची ओरड होताना दिसून येत आहे, असा टोमणा सहकार मंत्र्यांनी लगावला .

सरकारने गतवर्षी ७४ लाख क्विंटल तूर खरेदी केली. तुरीचे अधिक उत्पादन झाल्याने शेतकºयांना आधार देण्यासाठी हमीभावाने तुरीची खरेदी करण्याचा निर्णय घेतला. यंदा हरभºयाचे पीक अमाप आहे, त्याच्या खरेदीसाठी केंद्रे उघडल्याची माहिती सहकार मंत्र्यांनी दिली. गतवर्षी खरेदी केलेल्या तुरीची डाळ गरीब जनतेला स्वस्त धान्य दुकानांतून ५५ किलो दराने देण्यासाठी प्रशासनाने सहकार्य करण्याचे आवाहन केले. प्रारंभी आपल्या प्रास्ताविक भाषणात जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी सोलापूर जिल्ह्यातील कृषी क्षेत्रातील कामांचा आढावा घेतला. 

 पुण्याच्या अभिनव फार्म्स क्लबचे अध्यक्ष ज्ञानेश्वर बोडके यांचे समूह आणि गटशेती फायद्याची या विषयावर मार्गदर्शन झाले. शेती मुबलक आहे आणि चांगला पाऊस असतानासुद्धा आपण शेतीत प्रगती करू शकत नाही, असे सांगताना शेती ही उद्योगाच्या माध्यमातून केली पाहिजे, असे बोडके म्हणाले. या महोत्सवाच्या निमित्ताने शेतकरी, शेतकरी गट , शेतकरी मित्र , शेतकरी उत्पादक कंपनी , कृषीरत्न, उत्कृष्ट शेतकरी तसेच कृषी क्षेत्रात उत्कृष्ट काम केलेले क्षेत्रीय कर्मचारी आणि अधिकारी यांना सहकारमंत्री व पालकमंत्री यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 

यावेळी महापौर शोभा बनशेट्टी , जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, कृषी सभापती मल्लिकार्जुन पाटील, पक्षनेते आनंद तानवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड, जिल्हा कृषी अधीक्षक बसवराज बिराजदार,आत्माचे प्रकल्प संचालक विजयकुमार बरबडे, शहाजी पवार, अपर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, प्रतापसिंह परदेशी, जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख, शहर उपनिबंधक कुंदन भोळे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली, कृषी महोत्सव समितीचे सदस्य रवींद्र राऊत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले तर आभार कृषी अधीक्षक बसवराज बिराजदार यांनी मानले. 

मी नको बापूच बोलतील-  कृषी महोत्सव उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्ष सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख होते. त्यांना अध्यक्षीय विचार मांडण्याचा आग्रह केला असता मी नको , सुभाषबापूच बोलतील असे सांगून सहकारमंत्र्यांना बोलण्यासाठी पुरेसा वेळ दिला . या संधीचे सोने करीत सुभाषबापूंनी केंद्र आणि राज्य सरकारने राबविलेल्या शेतकºयांसाठीच्या योजना , आधीच्या सरकारच्या काळातील चुकीची धोरणं यावर मत मांडताना दुष्काळ ही इष्टापत्ती समजून मूठभर टँकरमाफियांनी कसा धंदा मांडला होता याकडे लक्ष वेधले.

टॅग्स :SolapurसोलापूरSubhash Deshmukhसुभाष देशमुखVijaykumar Deshmukhविजयकुमार देशमुखagricultureशेती