शहरं
Join us  
Trending Stories
1
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
2
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
3
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
4
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
5
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
6
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

ऊस शेतीसाठी नैसर्गिक खते वापरा ; सिद्धेश्वर कारखान्यातील परिसंवादात कृषी तज्ज्ञांचा सल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2018 2:42 PM

सोलापूर :  उसाची शेती करताना शेणखत, गांडूळ खत या सेंद्रिय खतांचा वापर केल्यास उत्पादनात वाढ होते़ शेतकºयांनी नैसर्गिक शेतीचा आग्रह धरावा, असे आवाहन मृदा शास्त्रज्ञ आबासाहेब साळुंखे यांनी कुमठे येथील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यात बोलताना केले.कुमठे येथील श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने ऊस उत्पादक शेतकºयांसाठी परिसंवाद आयोजित केला होता. ...

ठळक मुद्देऊस पिकासाठी माती परीक्षण महत्त्वाचेपारंपरिक शेतीचे दिवस आता संपले तंत्रज्ञानाचा वापर केला नाही तर शेती तोट्यात

सोलापूर :  उसाची शेती करताना शेणखत, गांडूळ खत या सेंद्रिय खतांचा वापर केल्यास उत्पादनात वाढ होते़ शेतकºयांनी नैसर्गिक शेतीचा आग्रह धरावा, असे आवाहन मृदा शास्त्रज्ञ आबासाहेब साळुंखे यांनी कुमठे येथील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्यात बोलताना केले.

कुमठे येथील श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने ऊस उत्पादक शेतकºयांसाठी परिसंवाद आयोजित केला होता. या परिसंवादात मृदा शास्त्रज्ञ आबासाहेब साळुंखे आणि कीटकनाशक तज्ज्ञ डॉ़ पांडुरंग मोहिते यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी कारखान्याचे चेअरमन धर्मराज काडादी होते. कारखान्याच्या कर्मयोगी आप्पासाहेब काडादी सांस्कृतिक भवनात हा परिसंवाद पार पडला.

ऊस पिकासाठी माती परीक्षण महत्त्वाचे असून, शेतकºयांचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत आबासाहेब साळुंखे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, कोणतेही पीक घेण्यासाठी माती परीक्षणाची गरज आहे. मातीमध्ये कोणते घटक आहेत, याची तपासणी झाल्याखेरीज तिला नवीन अन्नघटक काय द्यावे लागतील, हे कळणार नाही. पारंपरिक शेतीचे दिवस आता संपले आहेत. तंत्रज्ञानाचा वापर केला नाही तर शेती तोट्यात जाते असे सांगताना उसाच्या शेतीसाठी माती परीक्षण, सरी पद्धत, मातीतील जीवाणूंचे रक्षण आदींमुळे उत्पादन वाढते, असे त्यांनी स्पष्ट केले.

 या परिसंवादाला कारखान्याचे संचालक रमेश बावी, गुरुसिद्ध म्हेत्रे, सुरेश झळकी, मल्लप्पा चांभार, काशिनाथ कोळी, आत्माचे प्रकल्प संचालक विजयकुमार बरबडे, बळीराजा मासिकाचे युवराज भोसले यांची उपस्थिती होती़ शेतकºयांचा प्रतिसाद उत्तम होता. कारखान्याचे ऊसविकास अधिकारी विजयकुमार सरूर यांनी सूत्रसंचालन केले तर संचालक सिद्धाराम चाकोते यांनी आभार मानले.

प्रादुर्भाव टाळण्यासाठी काळजी घ्या- उसावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये, याची काळजी शेतकºयांनी आधीपासून घेतली पाहिजे़ त्यासाठी वेळोवेळी फवारण्यांची गरज असल्याचे मत कीटकनाशक तज्ज्ञ डॉ़ पांडुरंग मोहिते यांनी मांडले़ अध्यक्षपदावरून बोलताना धर्मराज काडादी यांनी साखर कारखानदारी संकटातून मार्गक्रमण करीत असल्याचे सांगितले़ आठ दिवसांत शासनाने नवीन धोरणाचा स्वीकार केल्यामुळे साखर उद्योगाला मदत होण्याची आशा त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :SolapurसोलापूरFarmerशेतकरीagricultureशेती