शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

उजनी धरणाची वाटचाल मृतसाठ्याकडे, आठ महिन्यांत ५४ टीएमसी पाण्याचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2022 16:58 IST

तब्बल ६३ टीएमसी मृत्तसाठा : सोलापूरसाठी सोडतात २० टीएमसी पाणी

टेंभुर्णी : उजनी धरणातील तब्बल ५४ टीएमसी एवढा उपयुक्त पाणीसाठा आठ महिन्यांत संपला आहे. धरणाची वाटचाल आता मृतसाठ्याकडे सुरू झाली आहे. मागील पावसाळ्यात उजनी धरण ५ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री शंभर टक्के भरले होते.

उजनी धरणातील पाणीसाठा पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पडणाऱ्या पावसावर अवलंबून आहे. सोलापूर जिल्ह्यात कमी पाऊस होऊनही पुणे जिल्ह्यात पडलेल्या पावसामुळे धरण अनेक वेळा ओव्हर फ्लो झाले आहे. कोयना व जायकवाडी या राज्यातील मोठ्या धरणांतील पाणी साठवण क्षमतेपेक्षा उजनी धरणाची साठवण क्षमता जास्त असल्याने ते राज्यातील सर्वांत मोठे पाणी साठा असलेले धरण म्हणून ओळखले जाते. उजनी धरण जेव्हा शंभर टक्के भरलेले असते तेव्हा धरणात ११७ टीएमसी पाणी असते, तर जेव्हा १११ टक्के भरलेले असते तेव्हा १२३ टीएमसी पाणी साठा असतो.

धरणातील १२३ टीएमसीपैकी ५४ टीएमसी पाणी साठा उपयुक्त आहे, तर ६३ टीएमसी पाणीसाठा मृत्त आहे, तर ६ टीएमसी पाणी अतिरिक्त आहे. जवळपास २० टीएमसी एवढे पाणी सोलापूर शहरासाठी वापरले जाते व उर्वरित साठ्यांपैकी बरेचसे पाणी शेतीसाठी विशेष करून ऊस पिकासाठी वापरले जाते. याचबरोबर धरणातील पाण्यावर अनेक मोठ्या शहरासह शेकडो लहान-मोठ्या गावांच्या पाणीपुरवठा योजना अवलंबून आहेत, तसेच अनेक औद्योगिक वसाहतींसाठीही याच पाण्याचा वापर केला जातो. म्हणूनच सोलापूर जिल्ह्यासह पुणे व अहमदनगर या जिल्ह्यातील कृषी, सामाजिक व राजकीय, तसेच औद्योगिक क्षेत्राच्या दृष्टीने उजनी धरणाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.

...............

४३ वर्षांत धरण ३३ वेळा शंभर टक्के

उजनी धरणात पाणी अडवण्यास प्रारंभ झाल्यापासून ४३ वर्षांत धरण ३३ वेळा शंभर टक्के भरले आहे व तेवढ्याच वेळा ते रिकामे झाले आहे. सन २०२० व २०२१ ला धरण १३ मे रोजी मायनसमध्ये गेले होते, तर २०१९ आली धरण १५ मे रोजी मायनसमध्ये गेले होते. चालू वर्षी मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे मागील वर्षी पेक्षा २४ दिवसाने मायनसमध्ये जात आहे.

...................

धरणाची सद्य:स्थिती

  • एकूण पाणी साठा ६३.९७ टीएमसी
  • उपयुक्त साठा ०. ३१ टीएमसी
  • टक्केवारी 0. ५९ %
  • आउट फ्लो
  • सीना माढा योजना : २९६ क्युसेक
  • दहीगाव उपसा : ८८ क्युसेक
  • भीमा सीना बोगदा : ७० क्युसेक
  • मुख्य कालवा : १००० क्युसेक
टॅग्स :Solapurसोलापूरwater shortageपाणीकपातwater transportजलवाहतूकUjine Damउजनी धरण