शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

पर्यटनाकडे ओढा; तिरुपती-बालाजीला जातात दररोज ८०० सोलापूरकर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2020 14:27 IST

ग्रामीण भागातूनही पसंती, अनलॉकनंतर संख्या वाढली, धार्मिक पर्यटनांकडे ओढा वाढला

ठळक मुद्देमागील दोन वर्षांपासून केरळमधील वायनाड, अंदमान निकोबार, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय येथे सोलापूरकर भेट देत आहेतजे नेहमी बाहेर फिरतात त्यांना सतत नवे पाहण्याची इच्छा असते. त्यामुळे आता ईशान्य भारताकडे पर्यटन वाढले आहे.

सोलापूर : धार्मिक पर्यटनासाठीसोलापूर जिल्हा ओळखला जातो. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सध्या धार्मिक स्थळे बंद आहेत; मात्र रोज सुमारे ८०० सोलापूरकर हे तिरुपती बालाजी येथे जात आहेत. लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यापासून तिरुपती बालाजी येथे जाण्याचे प्रमाण वाढतच आहे. जागतिक पर्यटन दिनाच्या पूर्वसंध्येला ही माहिती मिळाली.

पंढरपूर, अक्कलकोट, तुळजापूर, गाणगापूर ही धार्मिक पर्यटन स्थळे सोलापूरच्या जवळ आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून मागील सात महिन्यांपासून मंदिरे बंद आहेत. यामुळे जिल्ह्यात होणारे धार्मिक पर्यटनही बंद आहे. या परिस्थितीत सोलापूरकर हे तिरुपती बालाजी देवस्थानला जाण्यास पसंती देत आहेत. सोलापूर-हैदराबाद रस्ता चांगला तयार झाला आहे. तर उद्यान एक्स्प्रेसचीही सोय असल्याने सोलापुरातून तिरुपती बालाजी मंदिराचे दर्शन घेणे सोयीचे झाले आहे.

जून महिन्यापासून लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यास सुरुवात झाली. जूनमध्ये रोज २०० भाविक, जुलैमध्ये ५००, आॅगस्टमध्ये ६०० तर सप्टेंबरमध्ये रोज ८०० भाविक जात आहेत. यात जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील भाविकांचाही समावेश आहे. आॅक्टोबर महिन्याचे बुकिंग सुरु झाले असून या महिन्यात अधिक लोक जाण्याची शक्यता असल्याचे सोलापुरातील तिरुमला तिरुपती देवस्थानचे काऊंटर आॅपरेटर सिद्राम उपलंची यांनी सांगितले.

धार्मिक पर्यटनातून निसर्ग पर्यटन शहर व जिल्ह्यामधून अनेक लोक पर्यटनाला जात असतात. साधारणपणे धार्मिक पर्यटनातून निसर्ग पर्यटन करण्याकडे सोलापूरकरांचा ओढा आहे. धार्मिक पर्यटन करताना त्या स्थळाच्या आसपास असलेल्या नैसर्गिक ठिकाणी जाऊन आपला क्षीण घालवण्यास पसंती देतात. एखाद्या धार्मिक ठिकाणी जायचे असेल तर वाटेत येणारे नैसर्गिक स्थळ पाहणे हे जास्त सोयीचे होते. त्यामुळे निसर्ग आणि धार्मिक पर्यटनाचा सुंदर असा मिलाफ घालण्याचा प्रयत्न केला जातो, अशी माहिती टूर्स अँड ट्रॅव्हल्स कंपन्यांनी दिली.

सोलापूरकर अष्टविनायक, साडेतीन शक्तीपीठ, गोवा, कोकण, महाबळेश्वर, लोणावळा, कोल्हापूर, गणपती पुळे आदी ठिकाणी जास्त भेटी देतात. मालवण येथे पर्यटनाच्या दृष्टीने चांगली कामे होत असल्याने तिथे देखील लोक जात आहेत. सध्या कोविडमुळे गाड्या जागेवरच थांबल्या आहेत. शासनाने परवानगी दिल्यास पुन्हा एकदा पर्यटन सुरु करता येईल.- जगदीश चडचणकर

मागील दोन वर्षांपासून केरळमधील वायनाड, अंदमान निकोबार, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय येथे सोलापूरकर भेट देत आहेत. जे नेहमी बाहेर फिरतात त्यांना सतत नवे पाहण्याची इच्छा असते. त्यामुळे आता ईशान्य भारताकडे पर्यटन वाढले आहे. सध्या हिमाचल, राजस्थान आणि कर्नाटक येथील पर्यटन क्षेत्र खुले झाले आहे. काही अटींसह तशी परवानगी महाराष्ट्रातही द्यावी.- प्रवीण वैद्य 

टॅग्स :Solapurसोलापूरtourismपर्यटनtirupati balaji mandirतिरुपती बालाजी मंदिर, राजूरघाटrailwayरेल्वे