शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

रेल्वेतून चुकून आलेल्या मुलाचा सोलापुरात झाला उद्धार ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 15:00 IST

तामिळनाडूचे वर्धराज झाले पक्के सोलापूरकर; सोशल शाळेत नोकरी मिळाली..निवृत्तही झाले

ठळक मुद्देवर्धराज हे पाच वर्षांचे असताना तामिळनाडूतून सोलापुरात रेल्वेने चुकून आलेसुमारे ४० वर्षे सोशल शाळेमध्ये वर्धराज यांनी काम केलेअनोळखी व्यक्तीच्या मदतीसाठी जाती-धर्माच्या भिंतीही कोसळल्या

शीतलकुमार कांबळे 

सोलापूर : लहान असताना चुकून रेल्वेत बसून तामिळनाडूतून सोलापुरात आलेला मुलगा सोलापूरकर होऊन गेला. इथेच काम करत निवृत्तही झाला. त्यांचे कुटुंबही आता येथेच राहते. या शहराने त्यांना नाव, काम, कुटुंब दिले. मराठी भाषा येत नसतानाही सोलापूरने त्यांना आपलेसे केले. एखाद्या चित्रपटात शोभावी अशी त्यांची कथा आहे.

वर्धराज हे पाच वर्षांचे असताना तामिळनाडूतून सोलापुरात रेल्वेने चुकून आले. स्टेशनवर पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांना बालगृहात ठेवले. १९६४ ते १९६९ पर्यंत ते तिथेच राहिले. त्यानंतर सलगर वस्ती येथील शासकीय शाळेमध्ये ते शिकत होते. एकेदिवशी रस्त्यावरून जात असताना वर्धराज यांचा अपघात झाला. शासकीय रुग्णालयात त्यांच्यावर सुमारे एक वर्ष शस्त्रक्रिया व उपचार करण्यात आले. डॉ. विनायक चितळे यांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया केली. पुढे डॉ. विनायक चितळे यांनी त्यांना आपल्या रुग्णालयात कामाला घेतले.

काही वर्षांनंतर सोशल संस्थेचे डॉ. महमदअली वडवान हे उपचारासाठी डॉ. चितळे यांच्या रुग्णालयात गेले होते. तिथे वर्धराज यांनी डॉ. वडवान यांची सेवा केली. डॉ. वडवान यांना वर्धराजचा स्वभाव आवडला. त्यांनी वर्धराज याला आपल्या सोशल संस्थेत शिपाई पदावर कामावर घेण्याविषयी डॉ. चितळे यांना विचारले. डॉ. चितळे यांनीही त्यांना होकार दिला. तसेच वर्धराजही सोशल शाळेमध्ये काम करण्यास तयार झाले. त्यानंतर कागदपत्रांची पूर्तता करून वर्धराज यांना शाळेत रुजू करून घेतले. सुमारे ४० वर्षे सोशल शाळेमध्ये वर्धराज यांनी काम केले. ३१ जुलै रोजी ते निवृत्त झाले. यानिमित्त शाळेतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

अनोळखी व्यक्तीच्या मदतीसाठी जाती-धर्माच्या भिंतीही कोसळल्यावर्धराज यांना सांभाळण्यासाठी अनेक जण पुढे आले. वर्धराज यांचा धर्म व जात कुठली होती हे न पाहता हिंदू, मुस्लीम तसेच ख्रिश्चन धर्मातील लोकांनी वर्धराज यांना शिकविले, कामाला लावले, त्यांचे लग्नही लावून दिले. एका अनोळखी व्यक्तीसाठी जाती-धर्माच्या भिंतीही गळून पडल्या. बालगृहात असताना वळसंगकर बाई यांनी मराठी शिकवले, सलगर वस्ती येथील शाळेतील शिक्षक सुरेंद्र गायकवाड यांनी त्यांना आपल्या घरी सांभाळले, डॉ. विनायक चितळे यांनी उपचार करून वर्धराज यांना आपल्याच रुग्णालयात कामाला घेतले, डॉ. वडवान यांनी आपल्या शाळेत नोकरी लावली, ख्रिश्चन असणाºया कुसुम केतनी वर्धराज यांचे लग्न लावून दिले. लग्न लावण्यासाठी सिद्राम बंडगर, आखाडे सिस्टर यांनीही मदत केली.

काही वर्षांपूर्वी तामिळनाडूमधील सेलम या जिल्ह्यातील माझ्या गावात गेलो होतो. तिथे माझी फक्त एक मावस बहीण आहे. इतर सर्व नातेवाईकांचा मृत्यू झाला आहे. तामिळनाडूूमध्ये आडनाव नसते. येथे मला स्वामी हे आडनाव बालगृहानेच दिले. माझ्या आयुष्याच्या जडणघडणीत खूप जणांचा वाटा आहे. सोलापूरकरांनी जाती-धर्म विसरून मला मदत केली. मी सध्या होटगी रोड येथील भारतमाता नगरमध्ये राहतो. या शहराने मला सर्व काही दिल्याने आयुष्यभर या शहराचा ऋणी आहे. - वर्धराज स्वामी

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेEducationशिक्षणSchoolशाळा