शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
2
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
3
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
4
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
5
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
6
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
7
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
8
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
9
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
10
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
11
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
12
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
13
जीएसटीच्या पहिल्याच दिवशी मारुतीने २५,००० गाड्या विकल्या; ८० हजार लोकांची इन्क्वायरी...
14
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!
15
Muhurat Trading 2025 Date and Time: वेळ लिहून ठेवा! या मुहूर्तावर शेअर बाजारात होणार धनवर्षा; १ तासासाठी उघडणार मार्केट
16
मुसळधार पावसाने कोलकात्याला झोडपले, अनेक भागात पाणी साचले, मेट्रो विस्कळीत, ५ जणांचा मृत्यू
17
निमिषा प्रियासारखंच प्रकरण; १९ वर्षांपासून सौदी अरेबियाच्या तुरुंगात असलेला अब्दुल रहीम सुटणार!
18
"मी तुमचा मोठा चाहता...", रितेश देशमुखने प्रसाद ओकचं केलं कौतुक; गंमतीत म्हणाला...
19
"बिग बॉसचं मला काही विचारू नका", भाऊ अमालबद्दल विचारताच अरमान मलिक भडकला, व्हिडीओ व्हायरल
20
महिला पोलीस अधिकाऱ्याने वर्दीवरील बॅज फेकून मारला; Video व्हायरल, घटनेची दुसरी बाजू आली समोर

पाऊणेतीन हजार कोटी रुपयांच्या विकासकामांना फेब्रुवारीत होणार प्रारंभ - नितीन गडकरी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2019 12:30 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आश्वासनाचे आणि केलेल्या घोषणेची 99.99% कामे मार्गी लागल्याचा दावा नितीन गडकरी यांनी केला .

सोलापूर :  केंद्र सरकारने सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील विविध विकास कामांसाठी आठ हजार चारशे कोटी रुपयांची कामे मंजूर केली असून त्यातील पावणेतीन हजार कोटी रुपयांच्या कामांना फेब्रुवारी महिन्यात प्रारंभ होत असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा बुधवारी सोलापुरात झाली. त्या वेळी पंतप्रधानांच्या भाषणापूर्वी बोलताना ते म्हणाले, या देशाचे आणि समाजाचे चित्र आता बदलत आहे. पंतप्रधानांनी भरीव निधी दिल्यामुळे अनेक कामे सुरू झाली आहे. भूसंपादनाच्या कामाला देखील प्रारंभ झाला असून ही कामे वेगात वाढली आहे. सोलापूर जिल्ह्यातील पाणीटंचाई लक्षात घेता चार ब्रिज कम बंधाऱ्याच्या कामांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे येत्या काही काळात पाणीटंचाईचे चित्र पूर्णपणे पालटून जाईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आश्वासनाचे आणि केलेल्या घोषणेची 99.99% कामे मार्गी लागल्याचा दावा त्यांनी यावेळी केला .

गडकरी पुढे म्हणाले, सिंचनाला प्राधान्य देण्याचे  काम सरकारने युद्धस्तरावर हाती घेतले आहे.  बळीराजा योजना मंजूर झाली असून  त्या माध्यमातून या कामाला वेग आलेला आहे. या कामासाठी नाबार्डकडून 75 टक्के कर्ज घेतले असून ते मंजूर झाले आहे. सरकार यासाठी  25 टक्के अनुदान देणार आहे. सिंचनासाठी आजवर कुणीही सरकारने जेवढा निधी दिला नाही  त्यापेक्षा अधिक निधी  पंतप्रधान मोदी  यांनी दिला असल्याने  सिंचनाचे सारे चित्र पालटून जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सोलापूर जिल्ह्यात सध्या 38 साखर कारखाने असून पुन्हा दोन साखर कारखाने नव्याने मंजूर होत असल्याची माहिती त्यांनी दिली. ऊस उत्पादकांच्या प्रश्नाला  त्यांनी यावेळी हात घातला. ते म्हणाले,  ही साखरेची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कमी आहे. त्यामुळे हे संकट ग्लोबल इकॉनोमीमुळे आहे. यावर मात करण्यासाठी पंतप्रधानांनी ऐतिहासिक पॅकेज दिलेले आहे. यामुळे साखर 29 रुपयांपेक्षा  कमी राहणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

पंतप्रधान मोदी यांचा काळामध्ये  केलेल्या महत्वकांक्षी घोषणा आणि महत्वकांक्षी निर्णयामुळे या देशाचे चित्र बदलत असल्याचा  दावा त्यांनी केला. ते म्हणाले की युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतोय. सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण झाली आहेत. त्यामुळे  त्यांच्या नेतृत्वात या देशाचा विकास वेगाने होईल.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीSolapurसोलापूरNarendra Modiनरेंद्र मोदी