शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह आणि एकनाथ शिंदेंमध्ये ५० मिनिटे बैठक; रवींद्र चव्हाणांबाबत तक्रारीचा सूर, काय घडलं?
2
दिल्लीत तक्रार अन् मुंबईत डिल? उपमुख्यमंत्री पदासाठी शिंदेचा नेता भाजपशी जुळवून घेण्याच्या प्रयत्नात, अंधारेंचा दावा
3
Ashish Shelar:... तर मुंबईत अजित पवार गटाशी युती करणार नाही, आशिष शेलार यांचा इशारा!
4
SBI मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४१,८२६ चं फिक्स व्याज; परताव्याची गॅरंटी
5
आजचे राशीभविष्य - २० नोव्हेंबर २०२५, 'या' राशीच्या व्यक्तींसाठी आज लाभदायी दिवस, शेअर-सट्टा ह्यात धनलाभ होईल
6
Mahayuti: एकनाथ शिंदे दिल्लीत, अजित पवार ‘वर्षा' बंगल्यावर, महायुतीत 'ऑल इज वेल'?
7
Dombivli: डोंबिवलीत भाजप मजबूत, मनसेच्या माजी नगरसेवकांसाठी शिंदेसेनेने टाकले जाळे!
8
Ulhasnagar: पक्षांतर करणाऱ्यांच्या फोटोला आधी फासले काळे; नंतर सन्मानाने स्थान!
9
India- Israel: भारत-इस्रायलचे संबंध आणखी होणार वृद्धिंगत!
10
Andhra Pradesh: आंध्र प्रदेशात सात नक्षलवाद्यांचा खात्मा, ५० जणांना अटक; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त
11
Palghar: पालघरमध्ये शिक्षकाच्या मारहाणीला घाबरून मुलं लपली जंगलात, मग पुढं काय घडलं?
12
SC: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे का ढकलत नाहीत? न्यायालयाकडून राज्य सरकारला जाब
13
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
14
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
15
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
16
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
17
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
18
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
19
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
20
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
Daily Top 2Weekly Top 5

पाऊणेतीन हजार कोटी रुपयांच्या विकासकामांना फेब्रुवारीत होणार प्रारंभ - नितीन गडकरी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2019 12:30 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आश्वासनाचे आणि केलेल्या घोषणेची 99.99% कामे मार्गी लागल्याचा दावा नितीन गडकरी यांनी केला .

सोलापूर :  केंद्र सरकारने सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील विविध विकास कामांसाठी आठ हजार चारशे कोटी रुपयांची कामे मंजूर केली असून त्यातील पावणेतीन हजार कोटी रुपयांच्या कामांना फेब्रुवारी महिन्यात प्रारंभ होत असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा बुधवारी सोलापुरात झाली. त्या वेळी पंतप्रधानांच्या भाषणापूर्वी बोलताना ते म्हणाले, या देशाचे आणि समाजाचे चित्र आता बदलत आहे. पंतप्रधानांनी भरीव निधी दिल्यामुळे अनेक कामे सुरू झाली आहे. भूसंपादनाच्या कामाला देखील प्रारंभ झाला असून ही कामे वेगात वाढली आहे. सोलापूर जिल्ह्यातील पाणीटंचाई लक्षात घेता चार ब्रिज कम बंधाऱ्याच्या कामांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे येत्या काही काळात पाणीटंचाईचे चित्र पूर्णपणे पालटून जाईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आश्वासनाचे आणि केलेल्या घोषणेची 99.99% कामे मार्गी लागल्याचा दावा त्यांनी यावेळी केला .

गडकरी पुढे म्हणाले, सिंचनाला प्राधान्य देण्याचे  काम सरकारने युद्धस्तरावर हाती घेतले आहे.  बळीराजा योजना मंजूर झाली असून  त्या माध्यमातून या कामाला वेग आलेला आहे. या कामासाठी नाबार्डकडून 75 टक्के कर्ज घेतले असून ते मंजूर झाले आहे. सरकार यासाठी  25 टक्के अनुदान देणार आहे. सिंचनासाठी आजवर कुणीही सरकारने जेवढा निधी दिला नाही  त्यापेक्षा अधिक निधी  पंतप्रधान मोदी  यांनी दिला असल्याने  सिंचनाचे सारे चित्र पालटून जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सोलापूर जिल्ह्यात सध्या 38 साखर कारखाने असून पुन्हा दोन साखर कारखाने नव्याने मंजूर होत असल्याची माहिती त्यांनी दिली. ऊस उत्पादकांच्या प्रश्नाला  त्यांनी यावेळी हात घातला. ते म्हणाले,  ही साखरेची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कमी आहे. त्यामुळे हे संकट ग्लोबल इकॉनोमीमुळे आहे. यावर मात करण्यासाठी पंतप्रधानांनी ऐतिहासिक पॅकेज दिलेले आहे. यामुळे साखर 29 रुपयांपेक्षा  कमी राहणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

पंतप्रधान मोदी यांचा काळामध्ये  केलेल्या महत्वकांक्षी घोषणा आणि महत्वकांक्षी निर्णयामुळे या देशाचे चित्र बदलत असल्याचा  दावा त्यांनी केला. ते म्हणाले की युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतोय. सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण झाली आहेत. त्यामुळे  त्यांच्या नेतृत्वात या देशाचा विकास वेगाने होईल.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीSolapurसोलापूरNarendra Modiनरेंद्र मोदी