शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

पाऊणेतीन हजार कोटी रुपयांच्या विकासकामांना फेब्रुवारीत होणार प्रारंभ - नितीन गडकरी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2019 12:30 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आश्वासनाचे आणि केलेल्या घोषणेची 99.99% कामे मार्गी लागल्याचा दावा नितीन गडकरी यांनी केला .

सोलापूर :  केंद्र सरकारने सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील विविध विकास कामांसाठी आठ हजार चारशे कोटी रुपयांची कामे मंजूर केली असून त्यातील पावणेतीन हजार कोटी रुपयांच्या कामांना फेब्रुवारी महिन्यात प्रारंभ होत असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा बुधवारी सोलापुरात झाली. त्या वेळी पंतप्रधानांच्या भाषणापूर्वी बोलताना ते म्हणाले, या देशाचे आणि समाजाचे चित्र आता बदलत आहे. पंतप्रधानांनी भरीव निधी दिल्यामुळे अनेक कामे सुरू झाली आहे. भूसंपादनाच्या कामाला देखील प्रारंभ झाला असून ही कामे वेगात वाढली आहे. सोलापूर जिल्ह्यातील पाणीटंचाई लक्षात घेता चार ब्रिज कम बंधाऱ्याच्या कामांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे येत्या काही काळात पाणीटंचाईचे चित्र पूर्णपणे पालटून जाईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या आश्वासनाचे आणि केलेल्या घोषणेची 99.99% कामे मार्गी लागल्याचा दावा त्यांनी यावेळी केला .

गडकरी पुढे म्हणाले, सिंचनाला प्राधान्य देण्याचे  काम सरकारने युद्धस्तरावर हाती घेतले आहे.  बळीराजा योजना मंजूर झाली असून  त्या माध्यमातून या कामाला वेग आलेला आहे. या कामासाठी नाबार्डकडून 75 टक्के कर्ज घेतले असून ते मंजूर झाले आहे. सरकार यासाठी  25 टक्के अनुदान देणार आहे. सिंचनासाठी आजवर कुणीही सरकारने जेवढा निधी दिला नाही  त्यापेक्षा अधिक निधी  पंतप्रधान मोदी  यांनी दिला असल्याने  सिंचनाचे सारे चित्र पालटून जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

सोलापूर जिल्ह्यात सध्या 38 साखर कारखाने असून पुन्हा दोन साखर कारखाने नव्याने मंजूर होत असल्याची माहिती त्यांनी दिली. ऊस उत्पादकांच्या प्रश्नाला  त्यांनी यावेळी हात घातला. ते म्हणाले,  ही साखरेची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कमी आहे. त्यामुळे हे संकट ग्लोबल इकॉनोमीमुळे आहे. यावर मात करण्यासाठी पंतप्रधानांनी ऐतिहासिक पॅकेज दिलेले आहे. यामुळे साखर 29 रुपयांपेक्षा  कमी राहणार नाही, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

पंतप्रधान मोदी यांचा काळामध्ये  केलेल्या महत्वकांक्षी घोषणा आणि महत्वकांक्षी निर्णयामुळे या देशाचे चित्र बदलत असल्याचा  दावा त्यांनी केला. ते म्हणाले की युवकांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळतोय. सरकारने दिलेली आश्वासने पूर्ण झाली आहेत. त्यामुळे  त्यांच्या नेतृत्वात या देशाचा विकास वेगाने होईल.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीSolapurसोलापूरNarendra Modiनरेंद्र मोदी