शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील सर्वच साखर कारखान्यांचा गाळप हंगाम एप्रिलपर्यंत चालणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2022 17:30 IST

एप्रिलपर्यंत चालेल गाळप : कारखानदारांना वजनाचा अंदाज येईना, 

सोलापूर : उसाचे क्षेत्र वाढल्याचा अंदाज होताच; पण एकरी उत्पादनातही वाढ होईल? याचा अंदाज न आल्याने यंदाचा साखर हंगाम लांबत आहे. साखर आयुक्तांनी व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षाही अधिक गाळप होईल, असे सध्याचे चित्र आहे.

सध्या राज्यात १९७ तर सोलापूर जिल्ह्यात ३३ साखर कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. ऊस क्षेत्रात वाढ झाल्याचे साखर कारखाने, कृषी खाते व साखर आयुक्त कार्यालयाकडून सांगितले जात होते. यावर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात जोरदार पाऊस पडला असताना १५ ऑक्टोबरपासून गाळप हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतला. पाऊस व पाण्यामुळे ऊस तोडणीला अडथळा येत असतानाही साखर कारखाने सुरू ठेवले.

याशिवाय जून महिन्यापासून चांगला पाऊस पडत राहिल्याने उसाला पोषक ठरले. त्याचा परिणाम उसाचे वजन वाढण्यासाठी झाला. यामुळे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे गाळप दीड कोटी मेट्रिक टनांपेक्षा अधिक झाले, तरीही आणखीन किती गाळप होईल, याचा अंदाज साखर कारखान्यांना येत नाही.

उताऱ्यात ३० टनांनी वाढ

  • - सोलापूर जिल्ह्यात नेहमी हेक्टरी ८५ ते ९५ मेट्रिक टन सरासरी उतारा पडतो. यावर्षी हेक्टरी ११० ते १३० टन उतारा पडत आहे.
  • * मागील वर्षी २८ फेब्रुवारीपासून जिल्ह्यातील साखर कारखाने हळूहळू बंद होऊ लागले. ३१ मार्चला संपूर्ण कारखाने बंद झाले होते.
  • * यावर्षी ३१ मार्चपासून कारखाने बंद होण्यास सुरुवात होईल व १५ एप्रिलला सर्व कारखाने बंद होतील, असा अंदाज आहे.
  • * जिल्ह्यातील १८० लाख मेट्रिक टन ऊस गाळप होईल, असा अंदाज होता. प्रत्यक्षात दोन कोटी मेट्रिक टनांपेक्षा अधिक गाळप होईल, असे सांगण्यात आले.

 

साखर आयुक्त कारवाई करणार!

सोलापूर जिल्ह्यातील ३३ व उस्मानाबाद जिल्ह्यातील १२ अशा ४५ साखर कारखान्यांचे गाळप सुरू आहे. या साखर कारखान्यांची एफआरपीबाबत प्रादेशिक सहसंचालकांनी सुनावणी घेऊन साखर संचालकांकडे अहवाल सादर केला आहे. सोलापूर विभागातील ४५ पैकी १५ कारखान्यांनी ८० टक्क्यांपेक्षा अधिक रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे, तर ३० कारखान्यांनी ८० टक्क्यांपेक्षा कमी रक्कम दिली आहे. या अहवालावर साखर आयुक्त कारवाई करणार आहेत.

 

कालच उस्मानाबाद जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा आढावा घेतला. आजही कारखाने किती दिवस चालतील हे सांगता येत नाही, असे कारखान्यांकडून सांगण्यात आले. एकरी उतारा वाढल्याने व किती ऊस शिल्लक राहिला हे कारखान्यांच्या लक्षात येत नाही.

- पांडुरंग साठे, प्रादेशिक उपसंचालक

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेagricultureशेतीFarmerशेतकरी