शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

राज्यातील सर्वच साखर कारखान्यांचा गाळप हंगाम एप्रिलपर्यंत चालणार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2022 17:30 IST

एप्रिलपर्यंत चालेल गाळप : कारखानदारांना वजनाचा अंदाज येईना, 

सोलापूर : उसाचे क्षेत्र वाढल्याचा अंदाज होताच; पण एकरी उत्पादनातही वाढ होईल? याचा अंदाज न आल्याने यंदाचा साखर हंगाम लांबत आहे. साखर आयुक्तांनी व्यक्त केलेल्या अंदाजापेक्षाही अधिक गाळप होईल, असे सध्याचे चित्र आहे.

सध्या राज्यात १९७ तर सोलापूर जिल्ह्यात ३३ साखर कारखाने पूर्ण क्षमतेने सुरू आहेत. ऊस क्षेत्रात वाढ झाल्याचे साखर कारखाने, कृषी खाते व साखर आयुक्त कार्यालयाकडून सांगितले जात होते. यावर्षी सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात जोरदार पाऊस पडला असताना १५ ऑक्टोबरपासून गाळप हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतला. पाऊस व पाण्यामुळे ऊस तोडणीला अडथळा येत असतानाही साखर कारखाने सुरू ठेवले.

याशिवाय जून महिन्यापासून चांगला पाऊस पडत राहिल्याने उसाला पोषक ठरले. त्याचा परिणाम उसाचे वजन वाढण्यासाठी झाला. यामुळे जिल्ह्यातील साखर कारखान्यांचे गाळप दीड कोटी मेट्रिक टनांपेक्षा अधिक झाले, तरीही आणखीन किती गाळप होईल, याचा अंदाज साखर कारखान्यांना येत नाही.

उताऱ्यात ३० टनांनी वाढ

  • - सोलापूर जिल्ह्यात नेहमी हेक्टरी ८५ ते ९५ मेट्रिक टन सरासरी उतारा पडतो. यावर्षी हेक्टरी ११० ते १३० टन उतारा पडत आहे.
  • * मागील वर्षी २८ फेब्रुवारीपासून जिल्ह्यातील साखर कारखाने हळूहळू बंद होऊ लागले. ३१ मार्चला संपूर्ण कारखाने बंद झाले होते.
  • * यावर्षी ३१ मार्चपासून कारखाने बंद होण्यास सुरुवात होईल व १५ एप्रिलला सर्व कारखाने बंद होतील, असा अंदाज आहे.
  • * जिल्ह्यातील १८० लाख मेट्रिक टन ऊस गाळप होईल, असा अंदाज होता. प्रत्यक्षात दोन कोटी मेट्रिक टनांपेक्षा अधिक गाळप होईल, असे सांगण्यात आले.

 

साखर आयुक्त कारवाई करणार!

सोलापूर जिल्ह्यातील ३३ व उस्मानाबाद जिल्ह्यातील १२ अशा ४५ साखर कारखान्यांचे गाळप सुरू आहे. या साखर कारखान्यांची एफआरपीबाबत प्रादेशिक सहसंचालकांनी सुनावणी घेऊन साखर संचालकांकडे अहवाल सादर केला आहे. सोलापूर विभागातील ४५ पैकी १५ कारखान्यांनी ८० टक्क्यांपेक्षा अधिक रक्कम शेतकऱ्यांना दिली आहे, तर ३० कारखान्यांनी ८० टक्क्यांपेक्षा कमी रक्कम दिली आहे. या अहवालावर साखर आयुक्त कारवाई करणार आहेत.

 

कालच उस्मानाबाद जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा आढावा घेतला. आजही कारखाने किती दिवस चालतील हे सांगता येत नाही, असे कारखान्यांकडून सांगण्यात आले. एकरी उतारा वाढल्याने व किती ऊस शिल्लक राहिला हे कारखान्यांच्या लक्षात येत नाही.

- पांडुरंग साठे, प्रादेशिक उपसंचालक

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेagricultureशेतीFarmerशेतकरी