शहरं
Join us  
Trending Stories
1
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
2
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
3
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
4
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
5
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
6
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
7
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
8
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
9
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
10
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
11
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
12
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
13
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
14
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
15
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
16
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
17
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
18
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?
19
गोव्याला जायचा प्लान करताय? ‘मुंबई-गोवा वंदे भारत’ट्रेनच्या शेकडो फेऱ्या रद्द; कारण आले समोर
20
क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 

तेलंगवाडीच्या डाळिंबाने बांगलादेशवासीयांना पाडली भुरळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 13:26 IST

युवा शेतकºयाने दिले व्यवस्थापनाला महत्त्व; कष्टाच्या जोरावर दोनाची ५५ एकर कमावली शेती

ठळक मुद्देशेती व्यवसायात यश मिळवायचे असेल तर प्रथम शेतीवर प्रेम व शेतीची सर्व महत्त्वाची कामे स्वत: केली पाहिजेतपिकांचे योग्य नियोजन व व्यवस्थापन केले तर कमी पाण्यावर ठिबकचा वापर

सत्यवान दाढे 

अनगर : क्षेत्र कोणतेही असो, त्यात यश मिळवायचेच असे ठरविले की, त्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत, असं ठरवून तेलंगवाडी (ता़ मोहोळ) येथील युवा शेतकरी सोमनाथ शिंदे पारंपरिक शेतीला फाटा देत डाळिंबाची लागवड केली अन् थेट बांगलादेशाला निर्यात केली़ त्यांनी शेतीत व्यवस्थापनाला महत्त्व दिले़ त्यामुळे त्यांनी पिकविलेल्या डाळिंबाचा आकार, रंग अन् चव पाहून बांगलादेशवासीयांना भुरळ पडली़ त्यानंतर त्यांनी त्याच देशात डाळिंब निर्यात करायला सुरुवात केली़ केवळ कष्टाच्या जोरावर दोन एकरावरून तब्बल ५५ एकर शेती विकत घेतल्याचे ते अभिमानाने सांगतात.

तेलंगवाडी येथे वडिलोपार्जित केवळ दोन एकर शेती आहे़ पारंपरिक पद्धतीने ही शेती केली जात होती. पण आपण थोडे शिकलो आहोत़ त्यामुळे त्या शिक्षणाचा वापर शेतीत करावा, या उद्देशाने त्यांनी आधुनिक पद्धतीने शेती करायला सुरुवात केली़ टप्प्याने सिद्धेवाडीच्या माळरानावर ३२ एकर शेती घेतली. त्यात डाळिंबाची बाग लावली़ त्यासाठी पाणी कमी असल्याने ठिबक सिंचन केले़ यासाठी वडील संदिपान शिंदे व काका कल्याण शिंदे यांचे मार्गदर्शन व भाऊ शशिकांत शिंदे यांचे सहकार्य लाभले़ यामुळे आज यशस्वी शेती करतोय, असे ते सांगतात.

शेतीत कोणत्याही पिकासाठी शेणखाताची अत्यंत आवश्यकता आहे़ त्यामुळे शेणखाताबरोबरच रासायनिक खतांचा व औषधांचाही वापर केला़ शिवाय मजुरांचा खर्च परवडत नसल्याने यांत्रिकीकरणावर भर दिला़ बागेच्या संरक्षणासाठी शेताच्या भोवती प्रतिबंधक जाळी मारली़ सनबर्निंगपासून फळांचे संरक्षण करण्यासाठी कागदाचा व कापडाचाही वापर केला जातो. या सर्वांमुळेच चार एकर क्षेत्रात ५० टन उत्पादन घेऊन २५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले.

असे आहे शेतीचे नियोजन- सध्या ५५ एकर शेतीमध्ये २० एकर क्षेत्रावर डाळिंब, २० एकर क्षेत्रावर ऊस, चार एकरात काकडी, चार एकरात टोमॅटो आणि उर्वरित क्षेत्रात पालेभाज्यांसह अन्य पिके घेतली जातात़ सध्या शेती परवडत नाही, अशी सर्वत्र ओरड असते़ पण शेतीचे योग्य व्यवस्थापन केल्यास लागवडीपेक्षा दुपटीपेक्षा जास्त उत्पन्न शेती मिळवून देते़ तरुण आणि गरजू शेतकºयांना बागेच्या लागवडीपासून सर्व व्यवस्थापनासह अगदी व्यापाºयांना माल देण्यापर्यंतची सर्व मदत करण्यास सतत सज्ज असतो, असे समाधान शिंदे यांनी सांगितले़

शेती व्यवसायात यश मिळवायचे असेल तर प्रथम शेतीवर प्रेम व शेतीची सर्व महत्त्वाची कामे स्वत: केली पाहिजेत़ पिकांचे योग्य नियोजन व व्यवस्थापन केले तर कमी पाण्यावर ठिबकचा वापर करून भरघोस उत्पन्न मिळते, याचा मला विश्वास आहे.   - सोमनाथ शिंदे, डाळिंब उत्पादक

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीfoodअन्न