शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
6
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
7
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
8
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
9
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
10
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
11
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
12
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
13
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
14
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
15
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
16
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
17
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
18
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
19
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
20
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत

नीती आणि भीती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:22 IST

सगळीच माणसं मरणाला भीत नाहीत. भीतात ती आपल्या तत्त्वाला. कुणाचं काही का असेना आपलं काही चुकू नये, याचीच त्यांना ...

सगळीच माणसं मरणाला भीत नाहीत. भीतात ती आपल्या तत्त्वाला. कुणाचं काही का असेना आपलं काही चुकू नये, याचीच त्यांना भीती असते.

नेहमीप्रमाणे सराफांच्या दुकानी बसलो असताना साठी पार केलेले, दोन महिने दवाखान्यात राहून कोरोनाला हरवलेले, मरणाच्या दारातून परतलेले आबा दुकानी येताच शेठजींनी त्यांचे स्वागत केले. आम्हाला तुमची खूप आठवण होत होती, असं शेठजी आप्पा म्हणताच आबा बोलू लागले. या जगात कोणी कोणाचं नाही आप्पा, स्वतःची माझी पत्नीही मला कोरोना झाला असे समजताच दवाखान्यात आली नाही. डॉक्टररूपी देवाच्या आशीर्वादानं जिवंत आहे, काही तत्त्वज्ञान सांगू नका, असे आबा बोलत होते. असो. माझी कुणाकडेच तक्रार नाही. तेवढ्या पाटलिणीच्या पाटल्या करा लवकर म्हणजे झालं, शब्दातून सुटलो. पुन्हा पोस्ट कोविड, बोविड झाला तर निघायला बरं. पाटील सहजपणे बोलत होते. बाजूला बसून पाटलांची सहज स्थितप्रज्ञता मी अनुभवत होतो.

अतिशय साधी राहणी, मुखात रसाळ लोकवाणी पाहून आबांच्या मध्यम परिस्थितीपेक्षा समृद्ध मनस्थितीचा अंदाज येत होता. जेमतेम जुनी चौथी शिक्षण बघितले की, केवळ शिक्षणामुळेच व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो, हा अहंकार गळून पडत होता. कोणतेही पद नसताना आबांची समाजातील पत ऐकताना मानवी मूल्यांची सार्थकता अजूनही टिकून आहे हा सकारात्मक विचार दृढ होत होता. आनंदी रहायचेच असेल तर फक्त आपलं कर्म आनंदाने करत राहिलं की, माणूस आनंदीच राहतो इतकं साधं तत्त्वज्ञान अनुकरणीय होतं.

नाही कोणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी. अंती जाशील एक रे प्राण्या, माझे माझे म्हणूनी, हा संतविचार आणि आबांनी अनुभवलेला जीवनातील दाहक वास्तव आचार यांची सांगड घालत होतो. कधीही आळंदीची वारी न करणारे आबा माऊलींच्या आळंदीच्या मंदिरातील हे मी केले, ते मी केले. गर्वाने तू बोलू नको, क्षणार्धामध्ये उलथून जाईल प्रभुलीला तू विसरू नको हे वाक्य तंतोतंत आचरणात आणत होते. कठीण काळात आबांसाठी कोणाचंही नसलेलं ममत्व अशा काळातच आबांचं सर्वांसाठी असलेलं समत्व लक्षणीय होतं.

ग्रामीण भागातील साधा वेश आणि प्रांजळ आवेश असणारी अशी माणसं पाहिली, ऐकली, अनुभवली की माझा भारत देश महान का आहे

हे सांगावं लागत नाही. छोट्या गोष्टीतील हे अनमोल, अमर मोठेपण अभंग आणि अथांग आहे. शिक्षण, संस्कार, गुणवत्ता, मूल्ये ही शब्दांच्याही पलीकडील असतात आणि हे सगळं मानव जातीसाठी असतात. जेव्हा अशी मानवजात मरणाच्याही पलीकडील माणूसपण सिद्ध करते तेव्हा ओठावर आपोआप शब्द येतात, किती सुंदर, सुंदर हे जग ज्याने निर्मियले. त्या परमेशाला रे, वाहू या.. शब्दफुले.

- रंगनाथ काकडे, वैराग (लेखक अध्यात्म क्षेत्रात कार्यरत आहेत)

95 52 47 28 09