शहरं
Join us  
Trending Stories
1
मेक्सिकोमध्ये GenZचे जोरदार आंदोलन, तरूण रस्त्यावर का उतरले? इतका तीव्र संताप कशासाठी?
2
Shubman Gill Hospitalised : शुभमन गिलला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ; BCCI नं दिली मोठी अपडेट
3
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेेंबर २०२५: आर्थिक लाभ होतील, मित्र व स्नेह्यांची भेट आनंददायी राहील.
4
पाकिस्तानची सौदी अरेबियानंतर आता आणखी एका मुस्लिम देशाशी हातमिळवणी? नवा 'प्लॅन' काय?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना घवघवीत यश, मनसोक्त जगण्याचा काळ; नोकरीत प्रगती, इच्छापूर्ती!
6
'प्रेम? ही तर ओव्हररेटेड भावना', धनुषच्या उत्तराने सर्वच चकित; क्रिती म्हणाली, 'मला नाही वाटत...'
7
'वाराणसी' एस एस राजामौलींच्या सिनेमाचं टायटल घोषित, महेश बाबूचा व्हिडीओ टीझर आऊट
8
Bihar CM: मुख्यमंत्री कोण? एनडीएमध्ये चर्चा सुरूच; बिहारच्या नेतृत्वाबाबत गूढ कायम!
9
Kalyan: रेल्वेतून पडून जखमी; डॉक्टरांनी घरी पाठवले, काही तासांत मृत्यू!
10
ड्रायव्हिंग टेस्ट फक्त नावापुरती! मुंबई RTO मध्ये स्टिअरिंगवर हात ठेवताच मिळतंय लायसन्स
11
JJ Hospital: जेजे रुग्णालयाची कॅन्सर रुग्णांसाठी ११ एकर जागेची मागणी!
12
Mumbai: मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळा येथे बांधकाम सुरू असताना माती कोसळली; २ ठार, ३ जखमी
13
Court: राजकारण्यांवरील खटल्यांचा निपटारा करा! महाराष्ट्र, गोव्यातील ४७८ प्रकरणांवर हायकोर्टाचे आदेश
14
Congress: ठाकरेंना मोठा धक्का! काँग्रेसची 'एकला चलो'ची घोषणा; मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढणार
15
Akasa Air: नवी मुंबई विमानतळामुळे प्रवाशांना दिलासा; ख्रिसमसपासून दिल्ली, गोवासह ४ शहरांसाठी थेट सेवा
16
Vasai: बालदिनीच क्रूर शिक्षा! शाळेत उशिरा आली म्हणून १०० उठाबशा, विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू
17
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
18
लालू प्रसाद यादवांच्या मुलीचा खळबळजनक आरोप! रोहिणी म्हणाल्या "तेजस्वीने मला घरातून बाहेर..."
19
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
20
एका वर्षात तिसरी वेळ! भारताच्या शेजारी देशात सापडली तब्बल १००० टन सोन्याची खाण, कोणता आहे देश?
Daily Top 2Weekly Top 5

नीती आणि भीती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:22 IST

सगळीच माणसं मरणाला भीत नाहीत. भीतात ती आपल्या तत्त्वाला. कुणाचं काही का असेना आपलं काही चुकू नये, याचीच त्यांना ...

सगळीच माणसं मरणाला भीत नाहीत. भीतात ती आपल्या तत्त्वाला. कुणाचं काही का असेना आपलं काही चुकू नये, याचीच त्यांना भीती असते.

नेहमीप्रमाणे सराफांच्या दुकानी बसलो असताना साठी पार केलेले, दोन महिने दवाखान्यात राहून कोरोनाला हरवलेले, मरणाच्या दारातून परतलेले आबा दुकानी येताच शेठजींनी त्यांचे स्वागत केले. आम्हाला तुमची खूप आठवण होत होती, असं शेठजी आप्पा म्हणताच आबा बोलू लागले. या जगात कोणी कोणाचं नाही आप्पा, स्वतःची माझी पत्नीही मला कोरोना झाला असे समजताच दवाखान्यात आली नाही. डॉक्टररूपी देवाच्या आशीर्वादानं जिवंत आहे, काही तत्त्वज्ञान सांगू नका, असे आबा बोलत होते. असो. माझी कुणाकडेच तक्रार नाही. तेवढ्या पाटलिणीच्या पाटल्या करा लवकर म्हणजे झालं, शब्दातून सुटलो. पुन्हा पोस्ट कोविड, बोविड झाला तर निघायला बरं. पाटील सहजपणे बोलत होते. बाजूला बसून पाटलांची सहज स्थितप्रज्ञता मी अनुभवत होतो.

अतिशय साधी राहणी, मुखात रसाळ लोकवाणी पाहून आबांच्या मध्यम परिस्थितीपेक्षा समृद्ध मनस्थितीचा अंदाज येत होता. जेमतेम जुनी चौथी शिक्षण बघितले की, केवळ शिक्षणामुळेच व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो, हा अहंकार गळून पडत होता. कोणतेही पद नसताना आबांची समाजातील पत ऐकताना मानवी मूल्यांची सार्थकता अजूनही टिकून आहे हा सकारात्मक विचार दृढ होत होता. आनंदी रहायचेच असेल तर फक्त आपलं कर्म आनंदाने करत राहिलं की, माणूस आनंदीच राहतो इतकं साधं तत्त्वज्ञान अनुकरणीय होतं.

नाही कोणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी. अंती जाशील एक रे प्राण्या, माझे माझे म्हणूनी, हा संतविचार आणि आबांनी अनुभवलेला जीवनातील दाहक वास्तव आचार यांची सांगड घालत होतो. कधीही आळंदीची वारी न करणारे आबा माऊलींच्या आळंदीच्या मंदिरातील हे मी केले, ते मी केले. गर्वाने तू बोलू नको, क्षणार्धामध्ये उलथून जाईल प्रभुलीला तू विसरू नको हे वाक्य तंतोतंत आचरणात आणत होते. कठीण काळात आबांसाठी कोणाचंही नसलेलं ममत्व अशा काळातच आबांचं सर्वांसाठी असलेलं समत्व लक्षणीय होतं.

ग्रामीण भागातील साधा वेश आणि प्रांजळ आवेश असणारी अशी माणसं पाहिली, ऐकली, अनुभवली की माझा भारत देश महान का आहे

हे सांगावं लागत नाही. छोट्या गोष्टीतील हे अनमोल, अमर मोठेपण अभंग आणि अथांग आहे. शिक्षण, संस्कार, गुणवत्ता, मूल्ये ही शब्दांच्याही पलीकडील असतात आणि हे सगळं मानव जातीसाठी असतात. जेव्हा अशी मानवजात मरणाच्याही पलीकडील माणूसपण सिद्ध करते तेव्हा ओठावर आपोआप शब्द येतात, किती सुंदर, सुंदर हे जग ज्याने निर्मियले. त्या परमेशाला रे, वाहू या.. शब्दफुले.

- रंगनाथ काकडे, वैराग (लेखक अध्यात्म क्षेत्रात कार्यरत आहेत)

95 52 47 28 09