शहरं
Join us  
Trending Stories
1
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले
2
'त्यावेळी जे घडले, ते अत्यंत चुकीचे होते', 1984 च्या शीख दंगलींबाबत राहुल गांधींचे मोठे विधान
3
आधी गुंगीचं औषध दिलं मग डोक्यात दगड घातला; सांगलीत आई-बहिणीकडून तरुणाचा खून, मग...
4
अमृतसरमध्ये २ पाकिस्तानी गुप्तहेरांना अटक; भारतीय सैन्याची गोपनीय माहिती केली लीक
5
स्मरण दिन: शंकर महाराजांचे ‘मालक’ स्वामी समर्थ; गुरु-शिष्याचे नाते अद्भूत, कशी झाली भेट?
6
पाकिस्तानच्या मनात भारताची भीती; राष्ट्रपतींनी तातडीनं बोलावली संसदेची विशेष बैठक
7
डोक्यात कुऱ्हाडीचा दांडा घालून बापाने केला मुलाचा खून, माजलगावमधील धक्कादायक घटना
8
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
9
१५० वर्षांचे आयुष्य, चमत्कारिक वागण्यातील गूढ; धनकवडीचा अवलिया योगी सद्गुरु शंकर महाराज
10
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
"PM मोदी काय माझ्या मावशीचा मुलगा आहे का जे लगेच..."; पाक खासदाराचे विधान चर्चेच
12
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
13
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
14
Raid 2: रितेश देशमुख-अजय देवगणच्या सिनेमाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर, ३ दिवसांत किती कमावले?
15
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आढळले ५४ बिबटे; एक बिबट्या ९ किमी अंतर पार करून वसईत पोहचला
16
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
17
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
18
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
19
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
20
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द

नीती आणि भीती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:22 IST

सगळीच माणसं मरणाला भीत नाहीत. भीतात ती आपल्या तत्त्वाला. कुणाचं काही का असेना आपलं काही चुकू नये, याचीच त्यांना ...

सगळीच माणसं मरणाला भीत नाहीत. भीतात ती आपल्या तत्त्वाला. कुणाचं काही का असेना आपलं काही चुकू नये, याचीच त्यांना भीती असते.

नेहमीप्रमाणे सराफांच्या दुकानी बसलो असताना साठी पार केलेले, दोन महिने दवाखान्यात राहून कोरोनाला हरवलेले, मरणाच्या दारातून परतलेले आबा दुकानी येताच शेठजींनी त्यांचे स्वागत केले. आम्हाला तुमची खूप आठवण होत होती, असं शेठजी आप्पा म्हणताच आबा बोलू लागले. या जगात कोणी कोणाचं नाही आप्पा, स्वतःची माझी पत्नीही मला कोरोना झाला असे समजताच दवाखान्यात आली नाही. डॉक्टररूपी देवाच्या आशीर्वादानं जिवंत आहे, काही तत्त्वज्ञान सांगू नका, असे आबा बोलत होते. असो. माझी कुणाकडेच तक्रार नाही. तेवढ्या पाटलिणीच्या पाटल्या करा लवकर म्हणजे झालं, शब्दातून सुटलो. पुन्हा पोस्ट कोविड, बोविड झाला तर निघायला बरं. पाटील सहजपणे बोलत होते. बाजूला बसून पाटलांची सहज स्थितप्रज्ञता मी अनुभवत होतो.

अतिशय साधी राहणी, मुखात रसाळ लोकवाणी पाहून आबांच्या मध्यम परिस्थितीपेक्षा समृद्ध मनस्थितीचा अंदाज येत होता. जेमतेम जुनी चौथी शिक्षण बघितले की, केवळ शिक्षणामुळेच व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो, हा अहंकार गळून पडत होता. कोणतेही पद नसताना आबांची समाजातील पत ऐकताना मानवी मूल्यांची सार्थकता अजूनही टिकून आहे हा सकारात्मक विचार दृढ होत होता. आनंदी रहायचेच असेल तर फक्त आपलं कर्म आनंदाने करत राहिलं की, माणूस आनंदीच राहतो इतकं साधं तत्त्वज्ञान अनुकरणीय होतं.

नाही कोणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी. अंती जाशील एक रे प्राण्या, माझे माझे म्हणूनी, हा संतविचार आणि आबांनी अनुभवलेला जीवनातील दाहक वास्तव आचार यांची सांगड घालत होतो. कधीही आळंदीची वारी न करणारे आबा माऊलींच्या आळंदीच्या मंदिरातील हे मी केले, ते मी केले. गर्वाने तू बोलू नको, क्षणार्धामध्ये उलथून जाईल प्रभुलीला तू विसरू नको हे वाक्य तंतोतंत आचरणात आणत होते. कठीण काळात आबांसाठी कोणाचंही नसलेलं ममत्व अशा काळातच आबांचं सर्वांसाठी असलेलं समत्व लक्षणीय होतं.

ग्रामीण भागातील साधा वेश आणि प्रांजळ आवेश असणारी अशी माणसं पाहिली, ऐकली, अनुभवली की माझा भारत देश महान का आहे

हे सांगावं लागत नाही. छोट्या गोष्टीतील हे अनमोल, अमर मोठेपण अभंग आणि अथांग आहे. शिक्षण, संस्कार, गुणवत्ता, मूल्ये ही शब्दांच्याही पलीकडील असतात आणि हे सगळं मानव जातीसाठी असतात. जेव्हा अशी मानवजात मरणाच्याही पलीकडील माणूसपण सिद्ध करते तेव्हा ओठावर आपोआप शब्द येतात, किती सुंदर, सुंदर हे जग ज्याने निर्मियले. त्या परमेशाला रे, वाहू या.. शब्दफुले.

- रंगनाथ काकडे, वैराग (लेखक अध्यात्म क्षेत्रात कार्यरत आहेत)

95 52 47 28 09