शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नीती आणि भीती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:22 IST

सगळीच माणसं मरणाला भीत नाहीत. भीतात ती आपल्या तत्त्वाला. कुणाचं काही का असेना आपलं काही चुकू नये, याचीच त्यांना ...

सगळीच माणसं मरणाला भीत नाहीत. भीतात ती आपल्या तत्त्वाला. कुणाचं काही का असेना आपलं काही चुकू नये, याचीच त्यांना भीती असते.

नेहमीप्रमाणे सराफांच्या दुकानी बसलो असताना साठी पार केलेले, दोन महिने दवाखान्यात राहून कोरोनाला हरवलेले, मरणाच्या दारातून परतलेले आबा दुकानी येताच शेठजींनी त्यांचे स्वागत केले. आम्हाला तुमची खूप आठवण होत होती, असं शेठजी आप्पा म्हणताच आबा बोलू लागले. या जगात कोणी कोणाचं नाही आप्पा, स्वतःची माझी पत्नीही मला कोरोना झाला असे समजताच दवाखान्यात आली नाही. डॉक्टररूपी देवाच्या आशीर्वादानं जिवंत आहे, काही तत्त्वज्ञान सांगू नका, असे आबा बोलत होते. असो. माझी कुणाकडेच तक्रार नाही. तेवढ्या पाटलिणीच्या पाटल्या करा लवकर म्हणजे झालं, शब्दातून सुटलो. पुन्हा पोस्ट कोविड, बोविड झाला तर निघायला बरं. पाटील सहजपणे बोलत होते. बाजूला बसून पाटलांची सहज स्थितप्रज्ञता मी अनुभवत होतो.

अतिशय साधी राहणी, मुखात रसाळ लोकवाणी पाहून आबांच्या मध्यम परिस्थितीपेक्षा समृद्ध मनस्थितीचा अंदाज येत होता. जेमतेम जुनी चौथी शिक्षण बघितले की, केवळ शिक्षणामुळेच व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो, हा अहंकार गळून पडत होता. कोणतेही पद नसताना आबांची समाजातील पत ऐकताना मानवी मूल्यांची सार्थकता अजूनही टिकून आहे हा सकारात्मक विचार दृढ होत होता. आनंदी रहायचेच असेल तर फक्त आपलं कर्म आनंदाने करत राहिलं की, माणूस आनंदीच राहतो इतकं साधं तत्त्वज्ञान अनुकरणीय होतं.

नाही कोणाचे कोणी, तुझे नव्हे रे कोणी. अंती जाशील एक रे प्राण्या, माझे माझे म्हणूनी, हा संतविचार आणि आबांनी अनुभवलेला जीवनातील दाहक वास्तव आचार यांची सांगड घालत होतो. कधीही आळंदीची वारी न करणारे आबा माऊलींच्या आळंदीच्या मंदिरातील हे मी केले, ते मी केले. गर्वाने तू बोलू नको, क्षणार्धामध्ये उलथून जाईल प्रभुलीला तू विसरू नको हे वाक्य तंतोतंत आचरणात आणत होते. कठीण काळात आबांसाठी कोणाचंही नसलेलं ममत्व अशा काळातच आबांचं सर्वांसाठी असलेलं समत्व लक्षणीय होतं.

ग्रामीण भागातील साधा वेश आणि प्रांजळ आवेश असणारी अशी माणसं पाहिली, ऐकली, अनुभवली की माझा भारत देश महान का आहे

हे सांगावं लागत नाही. छोट्या गोष्टीतील हे अनमोल, अमर मोठेपण अभंग आणि अथांग आहे. शिक्षण, संस्कार, गुणवत्ता, मूल्ये ही शब्दांच्याही पलीकडील असतात आणि हे सगळं मानव जातीसाठी असतात. जेव्हा अशी मानवजात मरणाच्याही पलीकडील माणूसपण सिद्ध करते तेव्हा ओठावर आपोआप शब्द येतात, किती सुंदर, सुंदर हे जग ज्याने निर्मियले. त्या परमेशाला रे, वाहू या.. शब्दफुले.

- रंगनाथ काकडे, वैराग (लेखक अध्यात्म क्षेत्रात कार्यरत आहेत)

95 52 47 28 09