शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
3
“मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है”; CM एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
4
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
5
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
6
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
7
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंचा डच्चू?
8
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
9
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
10
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
11
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
14
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
15
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
16
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
17
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
18
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
19
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
20
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?

रेल्वे रूळ तुटल्याचे दिसताच शेतकºयांने लाल रंगाचे बनियन दाखवून रेल्वे थांबविली

By appasaheb.patil | Published: December 13, 2019 1:12 PM

शेतकºयाची तत्परता : तात्पुरत्या रुळाच्या दुरुस्तीनंतर भुसावळ एक्स्प्रेस धावली सुरळीत 

ठळक मुद्देमनमाडहून अहमदनगरच्या दिशेने जाणारी भुसावळ-पुणे एक्सप्रेस ही वांबोरीहून अहमदनगरच्या दिशेने जात होती रेल्वे लाईन ओलांडून आपल्या शेतात पाणी देण्यासाठी शेतकरी रामदास बापूराव थोरात (वय ४५, रा़ विळद, ता़ अहमदनगर, जि़ अहमदनगर) हे जात होते

सोलापूर : वार मंगळवाऱ़़ दुपारी बारानंतरची वेऴ़़ शेतकरी आपल्या शेतात पाणी देण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडत होता... अशातच रेल्वे रूळ तुटल्याचे शेतकºयाच्या निर्दशनास आले... अशातच रुळावरून धडधडत येणारी भुसावळ-पुणे एक्स्प्रेस पाहिली... या तुटलेल्या रुळावरून गाडी गेल्यास अनर्थ घडणार हे मनात येताच शेतकºयाने सतर्कता दाखवत स्वत:च्या अंगातील बनियन काढून त्याचा झेंडा बनविला़ त्या बनियनची लाल निशाणी दिसताच रेल्वे चालकांनी प्रसंगावधान राखत गती कमी करीत शेतकºयानजीकच रेल्वे थांबवली अन् काय झाले, याबाबत माहिती घेताच धक्कादायक माहिती समोर आली़ याचवेळी रेल्वे चालकासह प्रवाशांनी हजारो प्रवाशांचे प्राण वाचवून मोठा अनर्थ टाळल्याबद्दल शेतकºयाच्या जिद्दीचे कौतुक केले.

दरम्यान, मंगळवार १० डिसेंबर रोजी मनमाडहून अहमदनगरच्या दिशेने जाणारी भुसावळ-पुणे एक्सप्रेस ही वांबोरीहून अहमदनगरच्या दिशेने जात होती़ यावेळी रेल्वे लाईन ओलांडून आपल्या शेतात पाणी देण्यासाठी शेतकरी रामदास बापूराव थोरात (वय ४५, रा़ विळद, ता़ अहमदनगर, जि़ अहमदनगर) हे जात होते़ याचवेळी अचानक किलोमीटर ३६९़०़१ विळद-वांबोरीच्या मध्ये रेल्वे रूळ तुटल्याचे शेतकºयाच्या निदर्शनास आले़ याचवेळी समोरच्या दिशेने भरधाव वेगाने गाडी येत असल्याचे शेतकºयाने पाहिले.

 प्रसंगावधान दाखवित तत्काळ संबंधित शेतकºयाने आपल्या अंगातील लाल बनियन काढून त्याला झेंडा बनविला अन् रेल्वेला थांबण्याचा इशारा केला़ रेल्वे चालकानेही प्रसंगावधान पाहून हळूहळू रेल्वेची गती कमी करीत रेल्वे थांबवली़ यावेळी रेल्वे चालकाने संबंधित शेतकºयास काय झाले, याबाबतची माहिती विचारली असता शेतकºयाने रेल्वे रूळ कट झाल्याचे सांगितले़ यानंतर लागलीच रेल्वे चालकाने संबंधित वरिष्ठ अधिकाºयांना घडलेल्या घटनेची माहिती दिली़ त्यानंतर तत्काळ रेल्वे दुरुस्त करणारी टीम घटनास्थळी दाखल झाली़ रेल्वे रूळ दुरुस्त झाल्यानंतर गाडी सुरळीतपणे पुढच्या प्रवासासाठी मार्गस्थ झाली.

जिवाचीही केली नाही पर्वा...- हजारो प्रवाशांचे जीव वाचविणारे शेतकरी रामदास बापूराव थोरात़़़ वय ४५ वर्षे़़़ वयाने व तब्येतीने जास्त असलेल्या शेतकºयाने भुसावळ-पुणे रेल्वे थांबविण्यासाठी रेल्वे रुळामधील असलेल्या दगडाचा सामना करीत करीत पळतच साधारण: अर्धा किलोमीटरचे अंतर कापले़ यावेळी त्यांना जास्त पळाल्याने धाप लागत होता, मात्र जिवाची पर्वा न करता शेतकरी रामदास थोरात यांनी प्रवाशांचा जीव वाचविण्यासाठी जिवाची पर्वा केली नाही़ शेवटी अंगातील लाल बनियन काढून त्याचा झेंडा बनविला अन् रेल्वे थांबविली़ यामुळे हजारो प्रवाशांचे प्राण वाचले़ 

शेतकºयाच्या जिद्दीचं होतंय कौतुक...- प्रसंगावधान पाहून शेतकरी रामदास बापूराव थोरात याने हजारो प्रवाशांचे प्राण वाचविले़ या जिद्दी कामगिरीमुळे रेल्वे प्रशासनातर्फे शेतकºयाचा सन्मान करण्यात आला़ यावेळी त्यास रोख रक्कम, प्रशस्तीपत्र देण्यात आले़ घडलेला प्रकार सांगताच मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागातील रेल्वे प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाºयांसह कर्मचाºयांच्या अंगावर शहारे आले़ 

टॅग्स :Solapurसोलापूरcentral railwayमध्य रेल्वेrailwayरेल्वे