शहरं
Join us  
Trending Stories
1
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
2
कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
3
बांगलादेशात मोठा गोंधळ! बंडखोरांचा नेता हादी यांचा मृत्यू; दंगली उसळल्या, लोकांनी तोडफोड आणि जाळपोळ केली सुरू
4
आजचे राशीभविष्य, १९ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभ होईल, कार्यालयात संघर्ष किंवा मतभेदाचे प्रसंग येतील
5
कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच 
6
'व्हीबी-जी राम जी' विधेयक लोकसभेत मंजूर; विरोधकांनी विधेयकाचे कागद फाडून भिरकावले
7
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
8
भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
9
किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
10
ऐन निवडणुकीच्या तोंडावर मराठी शाळा मुद्दा ऐरणीवर, मराठी अभ्यास केंद्राचा मोर्चा; निवडणुकीनंतर चर्चा होणार
11
दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
12
खासगी विमान व्यवसाय महाराष्ट्रातून जाणार? पार्किंग, विमान उतरण्यासाठीचे स्लॉट मिळणे कठीण होत असल्याची भावना
13
१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
14
विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
15
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
16
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
17
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
18
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
19
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
20
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ऊस गाळपात सोलापूरचा प्रथम क्रमांक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 09:49 IST

१९० कारखान्यांचा पट्टा पडला; अहमदनगर द्वितीय तर कोल्हापूर तिसºया क्रमांकावर

ठळक मुद्देमार्च महिन्याच्या दुसºया आठवड्यापर्यंत सोलापूरचे सर्वच कारखाने बंदकोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांचा पट्टा मार्च महिन्यात पडण्यास सुरुवात अहमदनगरचे बहुतांशी साखर कारखाने मार्च महिन्यात पूर्ण क्षमतेने सुरू होते

सोलापूर : यंदाचा साखर हंगाम संपत आला असून, १९५ पैकी १९० कारखान्यांचा पट्टा पडला आहे.राज्यात ऊस गाळपात अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय असणाºया सोलापूर, अहमदनगरकोल्हापूर जिल्ह्याचे संपूर्ण कारखाने बंद झाले आहेत. सोलापूर जिल्हा गाळपात प्रथम क्रमांकावर तर एक कोटी ३६ लाख १० हजार ९२३ मेट्रिक टन गाळप करून अहमदनगर जिल्हा दुसºया क्रमांकावर आहे. यंदा अहमदनगर जिल्ह्याने कोल्हापूरला मागे टाकून ही कामगिरी केली आहे.

यावर्षी एक नोव्हेंबरपासून राज्यातील साखर हंगाम सुरू झाला होता. जानेवारी महिन्यात राज्यात तब्बल १९५ साखर कारखान्यांचा हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू होता. फेब्रुवारी महिन्याच्या दुसºया आठवड्यापासून एक-एक साखर कारखान्याचा पट्टा पडण्यास सुरुवात झाली. सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक ३१ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले होते. या साखर कारखान्यांनी राज्यात उच्चांकी एक कोटी ६० लाख ३७ हजार ९० मेट्रिक टन गाळप झाले.

सोलापूर जिल्ह्याचा गाळप हंगाम सुरु असेपर्यंत कोल्हापूर जिल्हा दुसºया तर अहमदनगर जिल्हा गाळपात तिसºया क्रमांकावर होता. मार्च महिन्याच्या दुसºया आठवड्यापर्यंत सोलापूरचे सर्वच कारखाने बंद झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांचा पट्टा मार्च महिन्यात पडण्यास सुरुवात झाली. मार्च ते एप्रिलच्या दुसºया आठवड्यात कोल्हापूरचे सर्व २२ कारखाने बंद झाले; मात्र अहमदनगरचे बहुतांशी साखर कारखाने मार्च महिन्यात पूर्ण क्षमतेने सुरू होते. 

यामुळे गाळपात कोल्हापूरला मागे टाकत अहमदनगर जिल्हा पुढे आला. कोल्हापूर जिल्ह्याचे एकूण गाळप एक कोटी ३३ लाख ३७ हजार ६६२ मे.टन तर अहमदनगर जिल्ह्याचे गाळप एक कोटी ३६ लाख १०हजार ९२३ मेट्रिक टनावर थांबले आहे. यावर्षी गाळपात सोलापूर प्रथम, अहमदनगर द्वितीय तर कोल्हापूर जिल्हा तिसºया क्रमांकावर राहिला आहे. पुणे जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांनी एक कोटी १९ लाख ७३ हजार ६४६ मे.टन गाळप झाले असून दोन साखर कारखान्याचे गाळप सुरू असल्याचे साखर आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले.

कोल्हापूरच्या जवाहरचे उच्चांकी गाळप

  • - कोल्हापूर जिल्ह्यातील जवाहर हा सहकारी साखर कारखाना १७ लाख ६३ हजार २३९ मे.टन गाळप करुन राज्यात प्रथम असून सोलापूर जिल्ह्यातील विठ्ठलराव शिंदे हा कारखाना १७ लाख ४४ हजार १४९ मे.टन गाळप करून दुसºया क्रमांकावर राहिला आहे. अहमदनगरचा अंबालिका(इंडेकॉन) हा कारखाना १३ लाख ६४ हजार २१५ मे.टन गाळप करून तिसºया क्रमांकावर आहे.  हे तिन्ही कारखाने बंद झाले आहेत. सातारच्या सह्याद्रीने १३ लाख १०० मे.टन गाळप केले आहे तर व हा कारखाना सुरू आहे.
  • - राज्याचे आतापर्यंतचे गाळप ९५१.६४ मे.टन झाले असून १०७०.७४ लाख क्विंटल साखर तयार झाली आहे.
टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेAhmednagarअहमदनगरkolhapurकोल्हापूरJalgaonजळगाव