शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
3
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
4
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
5
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
6
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
7
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
8
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
9
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
10
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
11
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
12
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
13
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
14
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
15
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
16
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
17
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
18
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
19
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
20
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला

राज्यातील ऊस गाळपात सोलापूरचा प्रथम क्रमांक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 09:49 IST

१९० कारखान्यांचा पट्टा पडला; अहमदनगर द्वितीय तर कोल्हापूर तिसºया क्रमांकावर

ठळक मुद्देमार्च महिन्याच्या दुसºया आठवड्यापर्यंत सोलापूरचे सर्वच कारखाने बंदकोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांचा पट्टा मार्च महिन्यात पडण्यास सुरुवात अहमदनगरचे बहुतांशी साखर कारखाने मार्च महिन्यात पूर्ण क्षमतेने सुरू होते

सोलापूर : यंदाचा साखर हंगाम संपत आला असून, १९५ पैकी १९० कारखान्यांचा पट्टा पडला आहे.राज्यात ऊस गाळपात अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय असणाºया सोलापूर, अहमदनगरकोल्हापूर जिल्ह्याचे संपूर्ण कारखाने बंद झाले आहेत. सोलापूर जिल्हा गाळपात प्रथम क्रमांकावर तर एक कोटी ३६ लाख १० हजार ९२३ मेट्रिक टन गाळप करून अहमदनगर जिल्हा दुसºया क्रमांकावर आहे. यंदा अहमदनगर जिल्ह्याने कोल्हापूरला मागे टाकून ही कामगिरी केली आहे.

यावर्षी एक नोव्हेंबरपासून राज्यातील साखर हंगाम सुरू झाला होता. जानेवारी महिन्यात राज्यात तब्बल १९५ साखर कारखान्यांचा हंगाम पूर्ण क्षमतेने सुरू होता. फेब्रुवारी महिन्याच्या दुसºया आठवड्यापासून एक-एक साखर कारखान्याचा पट्टा पडण्यास सुरुवात झाली. सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक ३१ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले होते. या साखर कारखान्यांनी राज्यात उच्चांकी एक कोटी ६० लाख ३७ हजार ९० मेट्रिक टन गाळप झाले.

सोलापूर जिल्ह्याचा गाळप हंगाम सुरु असेपर्यंत कोल्हापूर जिल्हा दुसºया तर अहमदनगर जिल्हा गाळपात तिसºया क्रमांकावर होता. मार्च महिन्याच्या दुसºया आठवड्यापर्यंत सोलापूरचे सर्वच कारखाने बंद झाले. कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांचा पट्टा मार्च महिन्यात पडण्यास सुरुवात झाली. मार्च ते एप्रिलच्या दुसºया आठवड्यात कोल्हापूरचे सर्व २२ कारखाने बंद झाले; मात्र अहमदनगरचे बहुतांशी साखर कारखाने मार्च महिन्यात पूर्ण क्षमतेने सुरू होते. 

यामुळे गाळपात कोल्हापूरला मागे टाकत अहमदनगर जिल्हा पुढे आला. कोल्हापूर जिल्ह्याचे एकूण गाळप एक कोटी ३३ लाख ३७ हजार ६६२ मे.टन तर अहमदनगर जिल्ह्याचे गाळप एक कोटी ३६ लाख १०हजार ९२३ मेट्रिक टनावर थांबले आहे. यावर्षी गाळपात सोलापूर प्रथम, अहमदनगर द्वितीय तर कोल्हापूर जिल्हा तिसºया क्रमांकावर राहिला आहे. पुणे जिल्ह्यातील १७ साखर कारखान्यांनी एक कोटी १९ लाख ७३ हजार ६४६ मे.टन गाळप झाले असून दोन साखर कारखान्याचे गाळप सुरू असल्याचे साखर आयुक्त कार्यालयाकडून सांगण्यात आले.

कोल्हापूरच्या जवाहरचे उच्चांकी गाळप

  • - कोल्हापूर जिल्ह्यातील जवाहर हा सहकारी साखर कारखाना १७ लाख ६३ हजार २३९ मे.टन गाळप करुन राज्यात प्रथम असून सोलापूर जिल्ह्यातील विठ्ठलराव शिंदे हा कारखाना १७ लाख ४४ हजार १४९ मे.टन गाळप करून दुसºया क्रमांकावर राहिला आहे. अहमदनगरचा अंबालिका(इंडेकॉन) हा कारखाना १३ लाख ६४ हजार २१५ मे.टन गाळप करून तिसºया क्रमांकावर आहे.  हे तिन्ही कारखाने बंद झाले आहेत. सातारच्या सह्याद्रीने १३ लाख १०० मे.टन गाळप केले आहे तर व हा कारखाना सुरू आहे.
  • - राज्याचे आतापर्यंतचे गाळप ९५१.६४ मे.टन झाले असून १०७०.७४ लाख क्विंटल साखर तयार झाली आहे.
टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेAhmednagarअहमदनगरkolhapurकोल्हापूरJalgaonजळगाव