शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

Janata Curfew; सोलापूरकरांचा स्वयं कर्फ्यू; सर्वच रस्ते सामसूम...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 10:32 IST

‘कोरोना’विरूद्धचा लढा यशस्वी होतोय़़़; एन्ट्री पॉर्इंटवर  पोलिसांचा बंदोबस्त

ठळक मुद्दे शहराच्या एन्ट्री पॉर्इंटवर शहर पोलीस आयुक्तालयाचा बंदोबस्तप्रमुख चौकातही पोलीस तैनात राहणार असून, दिवसभर सर्वत्र पेट्रोलिंगचला तर मग कोरोनाविरुद्ध हा लढा यशस्वी करू

सोलापूर: कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी व देशातील नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी  रविवार दि. २२ मार्च रोजी सकाळी ७ ते रात्री ९ या वेळात नागरिक स्वयंस्फूर्तीने कर्फ्यू पाळत आहेत. चला तर मग कोरोनाविरुद्ध हा लढा यशस्वी करू या असा नारा प्रत्येक सोलापूरकर देत आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये, दुकाने, बाजारपेठा पूर्णपणे बंद आहेत. 

जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. भारतातही याचा फैलाव होऊ नये यासाठी विशेष काळजी घेण्यात येत आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यात आढळलेल्या संशयित रुग्णांवरून कोरोना विषाणू प्रादुर्भावाची साखळी खंडित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार दि. २२ मार्च रोजी एक दिवस जनता कर्फ्यू पाळण्यात यावा असे आवाहन केले आहे.

या आवाहनाला सोलापूरकर १०० टक्के प्रतिसाद देत आहेत. कोरोना विषाणूचे गांभीर्य पाहता या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक संघटना, संस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. सोलापुरात कोरोना संशयित १४ रुग्ण आढळले. प्रशासनाने वेगाने हालचाली करून प्रादुर्भाव टाळण्यासाठी यंत्रणा कामाला लावली. यातील १३ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. परदेश व मुंबई, पुणे व इतर राज्यातून परत आलेल्या रहिवाशांच्या संसर्गामुळे ही साखळी वाढू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने जनता कर्फ्यू यशस्वी करण्याबाबत आवाहन केले आहे. 

कोरोना संसर्गाची साखळी तुटण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविल्या. सध्या अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारची दुकाने, शॉपिंग मॉल्स, पान टपरी, हॉटेल्स उघडण्यावर ३१ मार्चपर्यंत बंदी घातली आहे. त्यामुळे शनिवारी शहरातील वर्दळ कमी झाल्याचे दिसून आले. लोक अत्यावश्यक साहित्य खरेदीसाठी बाहेर पडले व खरेदी आटोपल्यानंतर लागलीच घरी परतल्याचे दिसून आले. भाजीपाला, दूध व इतर किराणा साहित्याचा साठा करून नागरिक निवांत झाले आहेत. रविवारी कोणत्याही परिस्थितीत बाहेर पडायचे नाही असा निर्धार नागरिकांमध्ये दिसून आला. 

कर्फ्यू म्हणजे काय- जनता कर्फ्यूबाबत सगळीकडेच चर्चा आहे. कायदा व सुव्यवस्था राबविण्यासाठी पोलिसांनी राबविलेला कर्फ्यू सोलापूरकरांच्या कायम लक्षात आहे. त्याच धर्तीवर आता सोलापुरातील नागरिक स्वयंस्फूर्तीने कर्फ्यू पाळणार आहेत. कोरोनाच्या विषाणूला पळवून लावण्यासाठी विनाकारण कोणीही रस्त्यावर येणार नाही असा निर्धार सर्वांनीच केल्याचे दिसून येत आहे. पण या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहे. रुग्णांना दवाखान्यात ये-जा करता येईल व त्यांच्यासाठी लागणारी औषधे खरेदी करता येण्यासाठी मेडिकल, पेट्रोलपंप सुरू राहतील. महामार्गावरील वाहतूक सुरू असेल. कोणावरही जबरदस्ती केली जाणार नाही. 

कोरोनाचा प्रतिबंध व प्रसार रोखण्यासाठी रविवारी पुकारण्यात आलेला जनता कर्फ्यू सर्वांनी उत्स्फूर्तपणे पाळावा. या काळात पोलिसांचा कायदेशीर धाक असणार नाही. पण या अनुषंगाने जे आदेश देण्यात आलेले आहेत, त्याच्या अंमलबजावणीसाठी यंत्रणा कार्यरत राहणार आहे. प्रशासनाला नागरिकांनी मदत करावी- मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी

एन्ट्री पॉर्इंटवर राहणार पोलिसांचा बंदोबस्त- केंद्र शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या जनतेच्या कर्फ्यूदरम्यान शहराच्या एन्ट्री पॉर्इंटवर शहर पोलीस आयुक्तालयाचा बंदोबस्त लावण्यात आला आहे. प्रमुख चौकातही पोलीस तैनात राहणार असून, दिवसभर सर्वत्र पेट्रोलिंग होणार आहे. - हैदराबाद रोड, पुणे रोड, मंगळवेढा रोड, विजापूर रोड, तुळजापूर रोड, होटगी रोड, अक्कलकोट रोड आदी शहरात येणाºया प्रत्येक रोडच्या सीमेवर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याhospitalहॉस्पिटलHealthआरोग्य