शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
3
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
4
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
5
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
6
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
7
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
8
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
9
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
10
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
11
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
12
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
13
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
14
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
15
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
16
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
17
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
18
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
19
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
20
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर

उत्तर सोलापूर तालुक्यावर ‘उपग्रहाची वक्री नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2018 14:45 IST

प्रशासन म्हणतंय पाणी पातळी घटली... पाऊस ४० टक्केच.. खरीपही गेल्याचा आमचा अहवाल

ठळक मुद्देउत्तर सोलापूर तालुक्यात सप्टेंबरअखेरपर्यंत ४० टक्के पाऊस या पावसाची आकडेवारी फुगली ती शहरातील नोंदीमुळेपाच वर्षांच्या तुलनेत १.४३ मि.मी. इतकी पाणी पातळी खोलवर गेली

अरुण बारसकर सोलापूर: पाणी पातळी दीड मीटरने खाली गेली.., पाऊस अवघा ४० टक्के पडला.., खरीप पीकही गेले... असा अहवाल उत्तर सोलापूर तालुका प्रशासनाने पाठविला. तरीही  तालुक्याचा समावेश दुष्काळी तालुक्यात झाला नाही. आमचा अहवाल तर वस्तुस्थितीला धरुन होता परंतु उपग्रहाच्या आधारे  शासन ट्रीगर-२ मध्ये समावेश करीत असल्याचे अधिकारी सांगत आहेत. 

सोलापूर जिल्ह्यातच दुष्काळी परिस्थिती आहे. ग्रामीण भागातील चित्र पाहिल्यानंतर दुष्काळी परिस्थितीची जाणीव होते. उत्तर सोलापूर तालुक्यात सप्टेंबरअखेरपर्यंत ४० टक्के पाऊस पडला होता. या पावसाची आकडेवारी फुगली ती शहरातील नोंदीमुळे. तशा तालुकास्तरावरुन गेलेल्या अहवालात नोंद आहे. आॅक्टोबर महिन्यात झालेल्या पाणी पातळी मोजणीत पाच वर्षांच्या तुलनेत १.४३ मि.मी. इतकी पाणी पातळी खोलवर गेली असल्याचे अहवालात म्हटले आहे. 

खरीप हंगामातील पिकांच्या पेरणी क्षेत्रापैकी पाहणीत कोंडी, कळमण व मार्डी येथील सर्वच पिकांचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे तर वडाळा व बीबीदारफळ येथील बागायती खालील क्षेत्र वगळून संपूर्ण क्षेत्राचे ५० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचा अहवाल तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी व गटविकास अधिकाºयांच्या संयुक्त सहीने दिला होता. केवळ पावसावर अवलंबून असलेले बीबीदारफळ व गावडीदारफळचे तलाव कोरडे आहेत. हे सारे अहवालाच्या माध्यमातून कागदावर आणले असतानाही उत्तर तालुक्याचा ट्रीगर-२ मध्ये समावेश झाला नाही. अधिकाºयांच्या म्हणण्यानुसार दुष्काळी परिस्थिती तर आहेच मात्र उपग्रहाने सर्वेक्षण केल्याने शासन दुष्काळ नसल्याचे सांगत आहे.

सर्वात कमी ऊस उत्तरमध्येतालुक्यातील मार्डी मंडलात अवघा ४७ मि.मी., वडाळा मंडलात १८० मि.मी. तर तिºहे मंडलात १३३ मि.मी. पाऊस पडला आहे. शहराच्या भागातील सोलापूर मंडलात ५७४ मि.मी. तर शेळगी मंडलात २३१ मि.मी. पावसाची नोंद आहे. ग्रामीण भागातील कमी व शहरातील अधिक पडलेल्या पावसाची बेरीज करुन पाऊस ४० टक्के  इतकाच झाला. जिल्ह्यातील अन्य तालुक्यांच्या तुलनेत सर्वात कमी ३ हजार ७८५ हेक्टर ऊस उत्तर तालुक्यात आहे. 

पिकाखालील क्षेत्र, वनस्पती निर्देशांक, मृद आद्रता(मातीतील ओलावा), भूजल पातळी निर्देशांक हे सॅटेलाईटद्वारे मोजले जातात. याशिवाय अन्य काही बाबींचा विचार करुन ट्रीगर-२ मध्ये तालुक्यांचा समावेश होतो. संपूर्ण जिल्ह्याचीच आम्ही माहिती पाठवली. - बसवराज बिराजदार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

तालुक्यात पाण्याची स्थिती कठीण आहे. खरीप पिके तर गेली, रब्बीची पेरणी होणे कठीण आहे. जनावरे कशी जगवायची हा मोठा प्रश्न आहे. पावसाने ना ओढा वाहिला ना  पाणी साठले. संपूर्ण वर्षात एकही पीक आले नाही तर वर्षभर खायचे काय हा प्रश्न आहे.- जितेंद्र साठे, उपसरपंच, वडाळा

पाऊस पडेल या अपेक्षेने जनावरे सांभाळली. पाऊस पडला नसल्याने आता वैरणीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. सगळीकडेच वैरणीचा प्रश्न असल्याने जनावरे मातीमोल दराने विकावी लागत आहेत, जनावरे विकली तर करायचे काय अन् खायचे काय?, हा प्रश्न आहे.- शिवाजी पाटील, माजी उपसरपंच बीबीदारफळ 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषद