शहरं
Join us  
Trending Stories
1
वायकर मेहुणे मोबाईल वाद पेटला! आता ठाकरे गटाच्या आमदारावरही गुन्हा दाखल
2
न्यूझीलंडने शेवट विजयाने केला; PNG च्या ७८ धावांचा पाठलाग करताना संघर्ष करावा लागला
3
ओबीसी नेते एकवटू लागले! "आरक्षणाला कसा धक्का बसणार नाही हे सांगा"; मुंडे बहीण-भाऊ हाकेंच्या भेटीला
4
Ohh No! सुपर ८ लढतीपूर्वी टीम इंडियाच्या प्रमुख शिलेदाराला दुखापत, वाचा अपडेट्स 
5
Rahul Gandhi: ज्या मतदारसंघाने संकटकाळात आसरा दिला, राहुल गांधी तीच सीट सोडणार; प्रियंका गांधी वायनाड लढणार
6
T20 World Cup 2026 साठी १२ संघ ठरले पात्र, पाकिस्तानलाही मिळाली संधी; पण, कशी?
7
रिल्सच्या नादात तरुणीचा जीव गेला, रिव्हर्समध्ये कार डोंगरावरून दरीत कोसळून भीषण अपघात
8
मोहन भागवतांच्या मणिपूरवरील वक्तव्यानंतर अमित शाह अॅक्टिव्ह, बोलावली उच्चस्तरीय बैठक...
9
"गॅरी, पाकिस्तानसोबत वेळ वाया घालवू नकोस, टीम इंडियाला कोच करण्यासाठी ये!" 
10
६ चौकार, १८ षटकार! ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २७ चेंडूंत ठोकले शतक, मोडला ख्रिस गेलचा वर्ल्ड रेकॉर्ड
11
मुंबईत रस्त्यावरील चायनीज स्टॉल्सवर बंदी, विशेष पथकांची नियुक्ती; उद्यापासून तपासणी
12
गौतम गंभीरचा 'माणूस' टीम इंडियाचा फिल्डींग कोच होणार, रवी शास्त्रींनी या नावावर मारलेली फुली
13
Air India च्या विमानात मोठी चूक; प्रवाशाच्या अन्नात आढळला ब्लेडचा तुकडा...
14
सर्वात महाग शहर! १ BHK चं भाडं ४ लाख, हेअरकट ५०००; घरकाम करणाऱ्याला ५० हजार पगार
15
T20 वर्ल्ड कप सुरु असताना गौतम गंभीरने घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट
16
टीम इंडियासमोरील तिसरा प्रतिस्पर्धी निश्चित झाला, पाहा Super 8 सामन्याचं अपडेट वेळापत्रक 
17
"बाथरुममध्ये जाऊन संभाषण, ६५० मतांचा फरक अन्..."; रिटर्निंग ऑफिसरवर अनिल परबांचे गंभीर आरोप
18
भाजपने सुरू केली विधानसभेची तयारी; महाराष्ट्रासह या चार राज्यांत प्रभारी आणि सहप्रभारी नेमले
19
रिझर्व्ह बँकेनं 'या' बँकेचा लायसन्स केला रद्द; सेंट्रल बँक ऑफ इंडियालाही १.४५ कोटींचा दंड
20
मध्यरात्री गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी युवक घरी पोहचला; किचनमध्ये आढळला दोघांचा मृतदेह

Solapur Politics; भक्तांचा आग्रह, ‘तुम्ही निवडणुकीत उतरा’,महाराज म्हणाले, ‘विचार करून निर्णय घेतो’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2019 1:02 PM

सोलापूर : भक्तांनी डॉ. जयसिद्धेश्वर महाराज यांना आग्रह केला, महाराज राजकारण स्वच्छ होण्यासाठी देशाची गरज म्हणून तुम्ही लोकसभेला उभे ...

ठळक मुद्देलोकसभा निवडणुकीसंदर्भात भक्तांचा कानोसा घेण्यासाठी शेळगी येथील शिवदासमय मंगल कार्यालयात बैठक गुरूबंधू व मालक यांच्याशी चर्चा करून निर्णय घ्यायला मला वेळ द्या - डॉ. जयसिद्धेश्वर महाराज

सोलापूर : भक्तांनी डॉ. जयसिद्धेश्वर महाराज यांना आग्रह केला, महाराज राजकारण स्वच्छ होण्यासाठी देशाची गरज म्हणून तुम्ही लोकसभेला उभे राहा. त्यावर डॉ. जयसिद्धेश्वर महाराज म्हणाले, भक्तांचा आग्रह मला मान्य आहे, पण गुरूबंधू व मालक यांच्याशी चर्चा करून निर्णय घ्यायला मला वेळ द्या. 

लोकसभा निवडणुकीसंदर्भात भक्तांचा कानोसा घेण्यासाठी रविवारी सायंकाळी शेळगी येथील शिवदासमय मंगल कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला भक्तांबरोबरच पालकमंत्री विजयकुमार देशमुख, माजी आमदार नरसिंग मेंगजी, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख पुरूषोत्तम बरडे, महापालिकेचे सभागृहनेते संजय कोळी, नगरसेवक विनायक वीटकर, शिवानंद पाटील, अमर पुदाले आदी उपस्थित होते.

सुरूवातीला पालकमंत्री देशमुख यांनी बैठक आयोजनामागचा हेतू विशद केला. लोकसभा निवडणूक आता केव्हाही जाहीर होऊ शकते. गेले आठवडाभर सोलापूर लोकसभेसाठी कोण याची चर्चा सुरू आहे. मंगळवारी महास्वामींची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घडवून दिली. त्यांच्यात काय चर्चा झाली हे माहीत नाही. पण त्यानंतर महास्वामींनी गुरूबंधू व सहकाºयांची चर्चा करून निर्णय देतो असे सांगितले आहे. त्या पार्श्वभूमीवर भक्तांचा कानोसा घेण्यासाठी ही बैठक आयोजित केल्याचे सांगितले. 

यावेळी बोलताना बसवराज ईश्वरकट्टी यांनी देशावर येणारी संकटे पाहता महास्वामींनी सुदर्शन चक्र उचलण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. जंगम समाजाचे अध्यक्ष राजशेखर कंदलगावकर, शरणबसप्पा केंगनाळकर, अक्कलकोटचे एम. बी. पाटील यांनी योगी आदित्यनाथ मुख्यमंत्री होऊ शकतात तर महास्वामींनी का निवडणूक लढवू नये असे मत मांडले. सभागृहनेते कोळी, नगरसेवक वीटकर, माजी नगरसेवक अनंत जाधव, बिज्जू प्रधाने यांनी मते मांडली. शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख बरडे यांनी भक्तांचा आग्रह असल्याने महाराजांनी नाराज करू नये असे सांगितले. 

महाराजांनी राजकारणात पडू नये- गलिच्छ राजकारणात महाराजांनी पडू नये असे मत गौरव जक्कापुरे यांनी मांडले. डॉ. शिवाचार्य महाराज यांचे ष. ब्र. हे पद खूप मोठे आहे, त्याची खासदारकीशी तुलना होऊ शकत नाही. यावर अक्कलकोटचे धानय्या स्वामी म्हणाले, धर्मशास्त्रात सन्याशाला योग्यवेळी कोणता रोल करावा याबाबत मार्गदर्शन केलेले आहे. महास्वामींसारखे तपस्वी राजकारणात उतरले तर सामान्य लोकांचे कल्याण आहे.

खासदार चांगले पण संपर्क कमी- सोलापूरचे सध्याचे खासदार चांगले आहेत पण त्यांचा जनसंपर्क कमी आहे. त्यामुळे खासदार बदलण्याची चर्चा मार्च २0१८ पासून सुरू झाल्याचे माजी आमदार नरसिंग मेंगजी यांनी सांगितले. महास्वामींनी लोकसभा लढविली तर राजकारण स्वच्छ होईल. त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाल्यापासून विरोधकांचे टेन्शन वाढले आहे. त्यावर डॉ. जयसिद्धेश्वर महाराज यांनी सर्व समाजाच्या प्रतिनिधींनी व्यक्त केलेल्या मताला सहमती देत, मला यावर निर्णय घेण्यास काही दिवस आणि वेळ द्या. माझ्या गुरूबंधूशी यावर चर्चा करेन. कोणाच्याही बाबतीत नकारात्मक चर्चा करू नका असा संदेश त्यांनी यावेळी दिला.

‘लोकमत’च्या झेरॉक्स प्रती- या बैठकीत लोकमतच्या हॅलो सोलापूरमध्ये ८ फेब्रुवारी रोजी भाजपच्या उमेदवारासंदर्भात आलेल्या  वृत्ताच्या छायांकित प्रती वाटण्यात आल्या. त्यामध्ये डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांचे नाव चर्चेत असे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यामुळे या बैठकीत हा विषय चर्चेचा ठरला. अनेकांनी हे कात्रण वाचून जवळ ठेवले. 

टॅग्स :Solapurसोलापूरlok sabhaलोकसभाElectionनिवडणूकVijaykumar Deshmukhविजयकुमार देशमुखBJPभाजपाPoliticsराजकारण