शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 07:51 IST

सोलापुरातून मुंबई व पुणे येथे जाणाऱ्या प्रवाशांना वेटिंग राहणार नाही.

सोलापूर : सोलापूर-मुंबई सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस ही १६ ऐवजी २० डब्यांची होणार आहे. चार डबे वाढणार असल्याने ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार असून, ही सेवा २८ ऑगस्ट २०२५ पासून सुरू होणार आहे. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयामुळे सोलापुरातून मुंबई व पुणे येथे जाणाऱ्या प्रवाशांना वेटिंग राहणार नाही.

सोलापूर-मुंबई सीएसएमटी वंदे भारत एक्सप्रेस (२२२२६) ही १० फेब्रुवारी २०२३ रोजी चालू झाली. दिवसेंदिवस या गाडीला प्रवाशांचा प्रतिसाद वाढत चालला आहे. ही गाडी आता मुंबईतून पुढे नाशिकरोड, मनमाड, संभाजीनगर, जालना, नांदेड येथे जाणार आहे. नांदेडवरून येणारी वंदे भारत ती मुंबईतून पुढे सोलापूरला येणार आहे. त्यामुळे शहरांचा विचार करून रेल्वे प्रशासनाने सोलापूर-मुंबई सीएसएमटी वंदे भारत एक्स्प्रेसला चार डबे जोडण्याचा निर्णय घेतला आहे. सीएसएमटी मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस (२२२२५) ही २८ ऑगस्ट; तर सोलापूर-सीएसएमटी मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस (क्र. २२२२६) ही २९ ऑगस्ट पासून सुरू होणार आहे.

सुधारित कोच रचना २० कोचमध्ये २ एक्झिक्युटिव्ह चेअर कारमध्ये ५२ आसनक्षमता आहे, तर १६ चेअर कारमध्ये ७८ आसनक्षमता आहे. लोको पायलट आणि गार्ड केबिनच्या शेजारी असलेल्या २ चेअर कारमध्ये ४४ आसनक्षमता आहे. रेल्वेची एकूण आसनक्षमता १ हजार ४४० झाली आहे.

प्रशासनाने देशाच्या प्रतिष्ठित वंदे भारत एक्स्प्रेसमध्ये दिलेल्या नवीन सुविधेचा जास्तीत जास्त प्रवाशांनी लाभ घ्यावा. आपला रेल्वेचा प्रवास सुकर करावा. योगेश पाटील, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक

सोलापुरातून मुंबई, पुणे येथे जाणाऱ्या प्रवाशांना सिद्धेश्वर एक्स्प्रेस व हुतात्मा एक्स्प्रेसमध्ये वेटिंग करावे लागत होते. शिवाय कामानिमित्त निघालेल्या प्रवाशांना खात्रीचे तिकीट मिळेल. संजय पाटील, अध्यक्ष, प्रवासी सेवा संघ 

टॅग्स :Vande Bharat Expressवंदे भारत एक्सप्रेसSolapurसोलापूर