शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

सोलापूर: महामार्ग बनले मृत्यूचे सापळे; वाहनांची गती उठली जीवावर

By appasaheb.patil | Updated: November 12, 2022 13:41 IST

गत काही महिन्यांपासून सोलापूर जिल्ह्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. असा एकही दिवस उगवत नाही की ज्या दिवशी अपघात झाला नाही.

सोलापूर : गत काही महिन्यांपासून सोलापूर जिल्ह्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण वाढत चालले आहे. असा एकही दिवस उगवत नाही की ज्या दिवशी अपघात झाला नाही. एखाद्या अपघातात सारे कुटुंबच नाहीसे झाल्याचे दिसते तेव्हा तेवढ्यापुरती हळहळ व्यक्त केली जाते. नंतर जगाचे, जगण्याचे रहाटगाडगे सुरूच राहते. परंतु अपघातात ज्यांचे प्राण गेले त्यांचे काय? त्यांच्या कुटुंबियांचे काय? असा सवाल आता उपस्थित केला जातोय.

रस्ते दुहेरी, चार पदरी, सहा पदरी, आठ पदरी असे प्रशस्त झाले आहेत. आणखीन काही रस्ते होत आहेत. त्यावरून सुसाट अगदी प्रमाणापेक्षा जास्त वेगाने वाहने चालविली जात आहेत. चांगल्या रस्त्यांमुळे अफाट प्रगती झाली असली तरी कदाचित तीच नेमकी काळरात्र ठरत असावी असे बोलले जात आहे. अपघात केवळ राष्ट्रीय महामार्गावरच होतात असे नाही तर लहान-मोठ्या रस्त्यावरही होतात. रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणा-यांचे प्रमाण अधिक आहे. शिवाय अपघातांमुळे अनेकांना अपंगत्वही आले आहे.

आकडेवारीवर एक नजर...

जानेवारी ते ऑक्टोबर २०२२ पर्यंतएकूण अपघात - ८४५एकूण मयत - ४९२एकूण जखमी - ९३६यामुळे होतात अपघात...

-वाहनचालकांचा हलगर्जीपणा-भरधाव वेग-ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न-नशा करून वाहन चालविणे- नियमांचा भंग करणे

स्पीड लिमिट तोडणाऱ्यांना लाखांचा दंड

महामार्गावर नियमापेक्षा जास्त वेगाने वाहन चालविणार्या वाहनांना दंड केला जातो. यासाठी ग्रामीण पेालिसांकडून महामार्गावर ठिकठिकाणी वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी यांचे पथके तैनात करण्यात आले आहेत.वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे. वेगात वाहने चालवू नये. शक्यतो रात्रीच्या वेळी प्रवास टाळावा, वेगाच्या मर्यादेचे पालन करावे, सीटबेल्टचा वापर करावा. नागरिकांनी अपघातातील जखमींना उपचारासाठी हलविण्यासाठी मदत करावी. वाहने सावकाश चालवा, वाहतूक नियमांचे पालन करा.

-महेश स्वामी,पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा, सोलापूर ग्रामीण.

टॅग्स :Solapurसोलापूर