शहरं
Join us  
Trending Stories
1
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
2
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
5
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
6
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
7
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
8
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
9
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
10
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
11
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
12
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
13
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
14
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

सोलापूर जिल्हा ; शेतकºयांच्या नावाखाली विमा कंपनीचंच होतंय भलं !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 07, 2018 11:50 AM

जमा झाले ८२ कोटी :  ६३ हजार शेतकºयांना मिळाले ३१.२२ कोटी

ठळक मुद्देविमा कंपनीकडे आजही काही शेतकºयांची प्रकरणे पेंडिंगमागील तीन-चार वर्षांपासून पिकांचा विमा भरण्याकडे शेतकºयांचा कलजिल्ह्यातील दोन लाख २६ हजार ९७० शेतकºयांनी विम्याची रक्कम भरली

अरुण बारसकर  सोलापूर : संपूर्ण जिल्ह्यातून दोन लाख २६ हजार ९७० शेतकºयांनी खरीप पिकांसाठी विम्याची रक्कम भरली असली तरी अवघ्या ६३ हजार २०९ शेतकºयांना पैसे मिळाले आहेत. विमा कंपनीला मिळालेली रक्कम व कंपनीने शेतकºयांना दिलेली नुकसान भरपाईची रक्कम पाहता कंपनीचेच भले होत असल्याचे दिसत आहे.

अतिवृष्टी, कमी पाऊस, गारपीट व अन्य कारणांमुळे पिकांचे नुकसान होते. त्यावेळी पीक विम्याचा चांगलाच आधार शेतकºयांना होतो. काहीअंशी तरी नुकसान भरपाई विमा कंपनीकडून मिळते. सोलापूर जिल्हा हा रब्बी असला तरी खरीप व रब्बी या दोन्ही हंगामांसाठी पीक विम्याची रक्कम भरुन घेतली जाते. 

मागील तीन-चार वर्षांपासून पिकांचा विमा भरण्याकडे शेतकºयांचा कल आहे. विम्याची रक्कम भरणाºया शेतकºयांपैकी काही शेतकºयांना नुकसान भरपाईही मिळते. यामुळे विमा भरण्यासाठी शेतकºयांची संख्याही वाढत आहे. मागील वर्षी खरीप हंगामासाठी सोलापूर जिल्ह्यातील दोन लाख २६ हजार ९७० शेतकºयांनी विम्याची रक्कम भरली होती. यामध्ये कर्जदार ७ हजार ६५९ व बिगर कर्जदार दोन लाख १९ हजार ३११ शेतकºयांचा सहभाग होता. 

शेतकरी, केंद्र शासन व राज्य शासनाने एकूण ८१ कोटी ८४ लाख ८३ हजार रुपये इतकी रक्कम विमा कंपनीकडे जमा केली होती. यापैकी ६३ हजार २०९ शेतकºयांना ३१ कोटी २२ लाख ८ हजार रुपये इतकी रक्कम नुकसान भरपाईपोटी शेतकºयांना मिळाली आहे. 

आठ तालुक्यांना वगळले

  • - बार्शीच्या २६ हजार ९८९, अक्कलकोटच्या १७ हजार ११५ व दक्षिणच्या १९ हजार ७२ अशा एकूण ६३ हजार २०९ शेतकºयांना मिळाली नुकसान भरपाई, परंतु आठ तालुके वगळले.
  • - बार्शीच्या ८५ हजार ३१६, अक्कलकोटच्या २४ हजार ६४३, दक्षिणच्या २८ हजार ८६७, उत्तरच्या ४ हजार २४५, मोहोळच्या १ हजार ६८६, पंढरपूरच्या ७३, मंगळवेढ्याच्या ५३ हजार ७४६, सांगोल्याच्या १० हजार ९८३, माळशिरसच्या ५११, माढ्याच्या ११ हजार ७३० व करमाळ्याचे ५ हजार १७० अशा दोन लाख २६ हजार ९७० शेतकºयांनी विम्याची रक्कम भरली होती.
  • - कर्जदार ४ हजार ४०५ व बिगर कर्जदार एक लाख ५९ हजार  ३५६ अशा विमा भरणाºया एक लाख ६३ हजार ७६१ शेतकºयांना नुकसान भरपाई मिळाली नाही.
  • - शेतकºयांनी १० कोटी २० लाख व केंद्र तसेच राज्य शासनाने विमा कंपनीकडे ८१ कोटी ८४ लाख ८३ हजार रुपये विमा कंपनीकडे जमा केले होते. प्रत्यक्षात ३१ कोटी २२ लाख ८ हजार रुपये नुकसान भरपाईपोटी शेतकºयांना दिल्याने जमा झालेल्यापैकी ५० कोटी ६२ लाख ७५ हजार रुपये कंपनीकडे शिल्लक आहेत.

मागील तीन वर्षांच्या उत्पन्नाच्या आधारावर पिकांचे उंबरठा नुकसान ठरवले जाते. यामुळे सर्वच पिकांना नुकसान भरपाई मिळेल असे नाही. विमा कंपनीकडे आजही काही शेतकºयांची प्रकरणे पेंडिंग आहेत.- बसवराज बिराजदार,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 

 एकाच तालुक्यातील एका मंडलातील शेतकºयांना नुकसान भरपाई मिळते, मात्र शेजारच्या मंडलातील शेतकरी पैसे भरुनही नुकसान भरपाईपासून वंचित ठेवला जातो. पीक कापणी प्रयोग कागदावरच असतात.- प्रभाकर देशमुख,अध्यक्ष, जनहित शेतकरी संघटना 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय