शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूर जिल्हा ; शेतकºयांच्या नावाखाली विमा कंपनीचंच होतंय भलं !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 11:51 IST

जमा झाले ८२ कोटी :  ६३ हजार शेतकºयांना मिळाले ३१.२२ कोटी

ठळक मुद्देविमा कंपनीकडे आजही काही शेतकºयांची प्रकरणे पेंडिंगमागील तीन-चार वर्षांपासून पिकांचा विमा भरण्याकडे शेतकºयांचा कलजिल्ह्यातील दोन लाख २६ हजार ९७० शेतकºयांनी विम्याची रक्कम भरली

अरुण बारसकर  सोलापूर : संपूर्ण जिल्ह्यातून दोन लाख २६ हजार ९७० शेतकºयांनी खरीप पिकांसाठी विम्याची रक्कम भरली असली तरी अवघ्या ६३ हजार २०९ शेतकºयांना पैसे मिळाले आहेत. विमा कंपनीला मिळालेली रक्कम व कंपनीने शेतकºयांना दिलेली नुकसान भरपाईची रक्कम पाहता कंपनीचेच भले होत असल्याचे दिसत आहे.

अतिवृष्टी, कमी पाऊस, गारपीट व अन्य कारणांमुळे पिकांचे नुकसान होते. त्यावेळी पीक विम्याचा चांगलाच आधार शेतकºयांना होतो. काहीअंशी तरी नुकसान भरपाई विमा कंपनीकडून मिळते. सोलापूर जिल्हा हा रब्बी असला तरी खरीप व रब्बी या दोन्ही हंगामांसाठी पीक विम्याची रक्कम भरुन घेतली जाते. 

मागील तीन-चार वर्षांपासून पिकांचा विमा भरण्याकडे शेतकºयांचा कल आहे. विम्याची रक्कम भरणाºया शेतकºयांपैकी काही शेतकºयांना नुकसान भरपाईही मिळते. यामुळे विमा भरण्यासाठी शेतकºयांची संख्याही वाढत आहे. मागील वर्षी खरीप हंगामासाठी सोलापूर जिल्ह्यातील दोन लाख २६ हजार ९७० शेतकºयांनी विम्याची रक्कम भरली होती. यामध्ये कर्जदार ७ हजार ६५९ व बिगर कर्जदार दोन लाख १९ हजार ३११ शेतकºयांचा सहभाग होता. 

शेतकरी, केंद्र शासन व राज्य शासनाने एकूण ८१ कोटी ८४ लाख ८३ हजार रुपये इतकी रक्कम विमा कंपनीकडे जमा केली होती. यापैकी ६३ हजार २०९ शेतकºयांना ३१ कोटी २२ लाख ८ हजार रुपये इतकी रक्कम नुकसान भरपाईपोटी शेतकºयांना मिळाली आहे. 

आठ तालुक्यांना वगळले

  • - बार्शीच्या २६ हजार ९८९, अक्कलकोटच्या १७ हजार ११५ व दक्षिणच्या १९ हजार ७२ अशा एकूण ६३ हजार २०९ शेतकºयांना मिळाली नुकसान भरपाई, परंतु आठ तालुके वगळले.
  • - बार्शीच्या ८५ हजार ३१६, अक्कलकोटच्या २४ हजार ६४३, दक्षिणच्या २८ हजार ८६७, उत्तरच्या ४ हजार २४५, मोहोळच्या १ हजार ६८६, पंढरपूरच्या ७३, मंगळवेढ्याच्या ५३ हजार ७४६, सांगोल्याच्या १० हजार ९८३, माळशिरसच्या ५११, माढ्याच्या ११ हजार ७३० व करमाळ्याचे ५ हजार १७० अशा दोन लाख २६ हजार ९७० शेतकºयांनी विम्याची रक्कम भरली होती.
  • - कर्जदार ४ हजार ४०५ व बिगर कर्जदार एक लाख ५९ हजार  ३५६ अशा विमा भरणाºया एक लाख ६३ हजार ७६१ शेतकºयांना नुकसान भरपाई मिळाली नाही.
  • - शेतकºयांनी १० कोटी २० लाख व केंद्र तसेच राज्य शासनाने विमा कंपनीकडे ८१ कोटी ८४ लाख ८३ हजार रुपये विमा कंपनीकडे जमा केले होते. प्रत्यक्षात ३१ कोटी २२ लाख ८ हजार रुपये नुकसान भरपाईपोटी शेतकºयांना दिल्याने जमा झालेल्यापैकी ५० कोटी ६२ लाख ७५ हजार रुपये कंपनीकडे शिल्लक आहेत.

मागील तीन वर्षांच्या उत्पन्नाच्या आधारावर पिकांचे उंबरठा नुकसान ठरवले जाते. यामुळे सर्वच पिकांना नुकसान भरपाई मिळेल असे नाही. विमा कंपनीकडे आजही काही शेतकºयांची प्रकरणे पेंडिंग आहेत.- बसवराज बिराजदार,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 

 एकाच तालुक्यातील एका मंडलातील शेतकºयांना नुकसान भरपाई मिळते, मात्र शेजारच्या मंडलातील शेतकरी पैसे भरुनही नुकसान भरपाईपासून वंचित ठेवला जातो. पीक कापणी प्रयोग कागदावरच असतात.- प्रभाकर देशमुख,अध्यक्ष, जनहित शेतकरी संघटना 

टॅग्स :SolapurसोलापूरagricultureशेतीFarmerशेतकरीSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय