शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
2
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
3
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
4
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
5
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
6
विधान परिषदेच्या निवडणुकीची नवी तारीख जाहीर; शिक्षक, पदवीधर मतदारसंघांसाठी या दिवशी मतदान
7
"सांगली जिल्हाप्रमुखाचं विधान उबाठाला मार्ग दाखवणारं, जर..."; संजय शिरसाटांचा निशाणा
8
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
10
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
11
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग
12
कडक उन्हातून घरी आल्यावर किती वेळानंतर पाणी प्यावं?; जाणून घ्या हेल्थ एक्सपर्टचा सल्ला
13
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
14
IPL 2024: दिनेश कार्तिक पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका स्टार खेळाडूचे निवृत्तीचे संकेत
15
Rituals: मंदिरात घंटा का बांधतात? नवस फेडण्यासाठीही घंटेचा वापर का केला जातो ते जाणून घ्या!
16
प्रिटी वुमन! प्रिती झिंटानेही Cannes मध्ये लावली हजेरी, व्हाईट आऊटफिटमध्ये दिसली परी!
17
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
18
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
19
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
20
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर

सोलापूर जिल्ह्यात वाळूअभावी ‘विकास वेडा’ होण्याची चिन्हे!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 12:31 PM

शासकीय कंत्राटदार झाले हतबल,  पुढील दोन वर्षांत हवी ६ लाख ब्रास वाळू

ठळक मुद्देमार्चअखेर आला तरी जिल्ह्यात वाळूचे लिलाव झालेले नाहीत२०१९ पर्यंत होणाºया विकासकामांसाठी ६ लाख ब्रास इतकी वाळू लागेलशासन स्तरावर  वाळू उपशाचे धोरणच निश्चित होत नाही

राकेश कदमसोलापूर : जिल्ह्यात २०१९ पर्यंत होणाºया विकासकामांसाठी ६ लाख ब्रास इतकी वाळू लागेल, अशी मागणी राष्ट्रीय महामार्ग, सार्वजनिक बांधकाम, एनटीपीसी, लघु पाटबंधारे, महापालिका, रेल्वे आणि जिल्हा परिषद आदी शासकीय यंत्रणांनी जिल्हा गौण खनिज कार्यालयाकडे नोंदवली आहे. शासन स्तरावर  वाळू उपशाचे धोरणच निश्चित होत नाही. दुसरीकडे शासकीय ‘वसूलदारांमुळे’ वाळूचे दर   गगनाला भिडत आहेत. यामुळे जिल्ह्यातही ‘विकास वेडा झालाय’ म्हणण्याची चिन्हे दिसू लागली  आहेत. 

मार्चअखेर आला तरी जिल्ह्यात वाळूचे लिलाव झालेले नाहीत. खासगी बांधकामांबरोबरच शासकीय यंत्रणांवरही याचा परिणाम झाला आहे. राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून लवकरच सोलापूर-कोल्हापूर चौपदरीकरणासह पालखी मार्गांच्या चौपदरीकरणाची कामे सुरू होणार आहेत. हे रस्ते काँक्रीटचे असतील. 

जूनपर्यंत ही कामे सुरु होतील. वेळेवर वाळू न मिळाल्यास मुदतीत कामे होणार नाहीत. सार्वजनिक बांधकाम, रेल्वेची कामेही रखडली आहेत. पाटबंधारे विभागाच्या कामात क्रॅश सँडचा वापर होत आहे. या कामांच्या दर्जाबद्दलही शंका उपस्थित होत आहे. 

४१ वाळू गटांचा जिल्हास्तरावर होणार निर्णय- जिल्हा प्रशासनाने राज्य पर्यावरण विभागाकडे पूर्वी ५ हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रातील २३ वाळू गटांचे प्रस्ताव पाठविले होते. खाणकाम आराखड्याअभावी राज्यस्तरावर निर्णय लटकला आहे. वाळूची वाढती मागणी लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने भीमा आणि माण नदीपात्रातील ५ हेक्टरच्या आतील ४१ वाळू गटांचे प्रस्ताव तयार केले आहेत. ५ हेक्टरच्या आतील वाळू गटांच्या लिलावाचा निर्णय जिल्हास्तरीय पर्यावरण समिती घेऊ शकते.

शासन निर्णयानुसार यातील अजनसोंड-मुंढेवाडी आणि देगाव-मुंढेवाडी (ता. पंढरपूर) येथील दोन वाळू गटांचा खाणकाम आराखडा तयार करण्यात आला आहे. हा आराखडा भूविज्ञान व खनिकर्म संचालनालयाच्या उपसंचालकांकडे (कोल्हापूर) पाठविण्यात आला आहे. उपसंचालकांनी हा आराखडा मंजूर केल्यास उर्वरित ३९ ठिकाणांचा आराखडा तयार केला जाईल. हा आराखडा पुन्हा जिल्हास्तरीय समितीपुढे ठेवून वाळू लिलाव एप्रिलच्या मध्यावधीत घेण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासन करीत आहे. 

महापालिकेची झाली अडचण- वाळूचे लिलाव नसल्यामुळे व प्रशासनाने चोरट्या वाहतुकीवर प्रभावी कारवाई केल्याने शहरात वाळूची आवक थांबली आहे. त्यामुळे शहरातील बांधकामे तर थांबलीच आहेत. याशिवाय महापालिकेच्या विकासकामावर परिणाम झाला आहे. अमृत योजनेतून सोरेगाव, जुळे सोलापूर, भवानी पाणीगिरणी, पाकणी जलशुद्धीकरण केंद्र येथे फिल्टर बेड व इतर बांधकामाची कामे सुरु आहेत. याशिवाय शहरात पाण्याच्या टाक्या उभारण्यात येत आहेत.

पाणीपुरवठा वितरण सुधारण्याच्या दृष्टीने ही कामे वेळेत पूर्ण होणे आवश्यक आहे. पण वाळूअभावी ही कामे रखडली आहेत. या कामांना वाळू उपलब्ध करण्याबाबत आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांनी महसूल प्रशासनाकडे मागणी केली आहे. याशिवाय विजापूर रोड, जुळे सोलापुरातील ड्रेनेज योजना पूर्ण झाली असून, ड्रेनेजजोड देण्याचे काम सुरु आहे. ही कामे वाळूअभावी ठप्प झाल्याने नागरिकही संतप्त झाले आहेत. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयPoliceपोलिस