शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
13
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
14
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
15
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
16
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
17
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
18
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
19
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
20
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर

सोलापूर जिल्हा बँकेचा कर्ज वाटपाचा धडाका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2018 12:23 PM

खरिपासाठी १६१ कोटींचे कर्ज : मागील वर्षापेक्षा ५२ कोटींचे अधिक वाटप 

ठळक मुद्देकर्जमाफीतील शेतकºयांना हवंय कर्ज  सांगोला तालुक्याची वसुली ८० टक्के २८ कोटी ७२ लाख ८० हजार रुपये खरीप हंगामासाठी कर्ज दिले

सोलापूर : जिल्हा मध्यवर्ती बँकेने कर्ज वाटपाचा धडाका लावला असून, सोमवारपर्यंत २१ हजार ७९५ शेतकºयांना १६० कोटी ९७ लाख ७१ हजार रुपये खरीप हंगामासाठी वाटप केले आहे. मागील वर्षापेक्षा यावर्षी ५१ कोटी ९३ लाख ९२ हजार रुपये अधिक कर्ज वाटप केले आहे.

सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून शेतकºयांना कर्ज मिळत नाही, अशी ओरड करुन जिल्ह्यातील शेतकरी थकले होते. बँकेचे प्रशासन व पदाधिकारी पैसे नसल्याचे कारण सांगत होते. एकीकडे थकबाकी वसुली होत नव्हती व दुसरीकडे नव्याने कर्जही मिळत नव्हते. पर्यायाने शेतकरी जिल्हा बँकेऐवजी अन्य बँकांकडून आपली आर्थिक गरज भागवत आहे. ३० मे रोजी प्रशासक म्हणून जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांनी पदभार घेतल्यानंतर शेतकºयांना कर्ज वाटप करण्यावर भर दिला जात आहे. ९ जुलैपर्यंत जिल्हाभरात १६० कोटी ९७ लाख ७१ हजार रुपये पीक कर्ज २१ हजार ७९५ शेतकºयांना वाटप केले आहे. मेअखेरला अवघे ४८ कोटी ७२ लाख ६० हजार रुपये कर्ज वाटप झाले होते. 

मागील सव्वा महिन्यात कर्ज वाटपाची आकडेवारी १६१ कोटींवर गेली आहे. मागील वर्षापेक्षा यावर्षी ५१ कोटी ९४ लाख रुपये अधिक कर्ज वाटप केले आहे. शेतकºयांची संख्याही वाढली असून, मेअखेरला ४ हजार ९२९ शेतकºयांना कर्ज वाटले होते. ते सोमवार, दिनांक ९ जुलैपर्यंत २१ हजार ७९५ इतके झाले आहे. महिनाभरात १६ हजार ८६६ शेतकºयांना बँक कर्ज वाटू शकली. 

कर्जमाफीतील शेतकºयांना हवंय कर्ज 

  • - प्रशासकाच्या सव्वा महिन्याच्या कालावधीत झाले १६ हजार ८६६ शेतकºयांना ११२ कोटी २५ लाख ११ हजार रुपये पीक कर्ज वाटप़
  • - खरीप हंगामासाठी जिल्हा बँकेला २८४ कोटी ७९ लाख रुपये कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असून, आतापर्यंत १६० कोटी ९८ लाख रुपये म्हणजे ५६.५२ टक्के कर्ज वाटप केले आहे.
  • - संपूर्ण कर्जमाफी झालेल्यांपैकी ४ हजार १०० शेतकºयांनी ४५ कोटी ४० लाख, एकरकमी परतफेड योजनेतील ५ हजार १३० शेतकºयांनी ५२ कोटी ३३ लाख, प्रोत्साहनचा फायदा मिळालेल्यांपैकी ३० हजार शेतकºयांनी २८५ कोटी असे एकूण ३९ हजार २३० शेतकºयांनी ३८२ कोटी ७२ लाख ६० हजार रुपयांची नव्याने कर्ज मागणी केली आहे. 
  •  

कर्जमाफीतील शेतकºयांशिवाय..- एकरकमी परतफेड केलेल्यांपैकी ३ हजार ५८ शेतकºयांना २७ कोटी ७४ लाख, प्रोत्साहनचा लाभ घेतलेल्यांपैकी १५ हजार ५२१ शेतकºयांना १०४ कोटी ५० लाख ८७ हजार रुपये असे कर्जमाफीतील १८ हजार ५७९ शेतकºयांना १३२ कोटी २४ लाख ९१ हजार रुपये पीक कर्ज वाटप केले आहे. याशिवाय ३२१६ शेतकºयांना २८ कोटी ७२ लाख ८० हजार रुपये खरीप हंगामासाठी कर्ज दिले आहे. एकूणच जिल्ह्याची वसुली म्हणावी तितकी नाही. सांगोला तालुक्याची वसुली ८० टक्के असली तरी अन्य तालुके मागेच आहेत. वसुलीशिवाय कर्ज वाटप अशक्य आहे. यासाठीच बैठकांतून सूचना दिल्या जात आहेत.-अविनाश देशमुखप्रशासक, जिल्हा बँक

टॅग्स :SolapurसोलापूरBanking Sectorबँकिंग क्षेत्रFarmerशेतकरीgovernment schemeसरकारी योजना