शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

इंटरनेटच्या दुनियेतील सामाजिक आव्हाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 12:19 PM

जागतिकीकरणाच्या वेगवान प्रवाहासोबत डिजिटलायझेशनचे वारे वेगाने आपल्या सभोवताली घोंगावू लागले. याचा परिणाम समाज, व्यवहार आणि अनेक सामाजिक संदर्भ बदलण्यात ...

ठळक मुद्देअमेरिकेत हेच प्रमाण ३०० मिनिटांपर्यंत आढळून आले आहे.इंटरनेटचा ४० टक्के वापर सोशल मीडियासाठी केला जातोप्रादेशिक भाषेत इंटरनेटचा वापर करण्यावर उपभोक्त्यांचा कल

जागतिकीकरणाच्या वेगवान प्रवाहासोबत डिजिटलायझेशनचे वारे वेगाने आपल्या सभोवताली घोंगावू लागले. याचा परिणाम समाज, व्यवहार आणि अनेक सामाजिक संदर्भ बदलण्यात झाला. इंटरनेटच्या माध्यमातून जगातील अनेक राष्ट्रे एकमेकांशी जोडली गेली, संदेशवहनामध्ये आमूलाग्र बदल झाले. कुठलाही समाज अथवा समुदाय जीवन सुखकर करण्यासाठी विविध साधनांची निर्मिती व स्वीकार करतो. तथापि, हीच साधने समाजाची ओळख नव्याने लिहितात. कोणे एकेकाळी पोस्टमनची आतूरतेने वाट पाहणारा समाज वायरलेस उपकरणाचा नकळत उपभोक्ता झाला. इतकेच नव्हे तर इंटरनेट मानवी जीवनातील खासगी आणि व्यावसायिक अशा प्रत्येक कृतीचा अविभाज्य भाग झाले. 

भारताची लोकसंख्या जागतिक लोकसंख्येच्या तुलनेत खूप वरच्या स्थानी आहे. सध्या इंटरनेटचा वापर करण्याºया ग्राहकांची भारतातील संख्या अंदाजे ५०० मिलियनच्या घरात पोहोचली आहे. ‘इंटरनेट आणि मोबाइल असोसिएशन आॅफ इंडिया’ या संघटनेकडून नुकताच एक अहवाल प्रकाशित करण्यात आला. या अहवालानुसार डिसेंबर २०१७ मध्ये भारतात ४८१ मिलियन भारतीय इंटरनेटचे उपभोक्ते होते.

२०१६ च्या तुलनेत ही संख्या ११.३४ टक्क्यांनी वाढली. जागतिक लोकसंख्येच्या तुलनेत चीनपाठोपाठ भारत देश इंटरनेटच्या माध्यमातून दुसरी सर्वात मोठी आॅनलाइन बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. या अहवालातील निष्कर्षानुसार २०२१ सालापर्यंत भारतातील इंटरनेटचा वापर करणारी लोकसंख्या अंदाजे ६३५.८ मिलियनच्या घरात असेल. तथापि, स्त्री-पुरुषांमधील समतेची दरी आणि त्याचे वास्तव इंटरनेटच्या वापरात देखील भारतात दिसून येते. सर्वेक्षणानुसार जवळपास २९ टक्के महिला इंटरनेटचा वापर करतात तर ७१ टक्के भारतीय पुरुष इंटरनेटचा वापर करतात.

यावरून दोघांमधील तफावत ठळकपणे दिसून येते. भारतात २०२० साली जवळपास ४० टक्के महिला तर ६० टक्के पुरुष इंटरनेटचा वापर करतील, असा अंदाज मांडला गेला आहे. इंटरनेटच्या माध्यमातून स्त्री-पुरुष दरी ठळकपणे अधोरेखित होत असतानाच दुसरी मोठी दरी नजरेआड करता येत नाही. भारतात शहरी भागात साधारणत: ६८-६९ टक्के लोक इंटरनेटचा वापर करतात तर ग्रामीण भागात फक्त २३-२५ टक्के लोकांच्या वापरात इंटरनेट आहे. डिजिटलायझेशनच्या मोहिमेपुढील हे फार मोठे आव्हान मानले गेले आहे. कारण, भारतातील ग्रामीण लोकसंख्येचे प्रमाण शहरी लोकसंख्येच्या मानाने खूप मोठे आहे. असे असताना देशातील अधिकाधिक लोकसंख्या इंटरनेटच्या कक्षेत नसणे, यामुळे अनेक पातळीवर पीछेहाट नाकारता येत नाही. 

एकीकडे लिंग आधारित इंटरनेट वापर दरी, शहरी-ग्रामीण दरी असे चित्र असताना वयोगटानुसार इंटरनेटचा होणारा वापर भुवया उंचवायला लावतो व अनेक आव्हानांची जाणीव करून देतो. सर्वेक्षणानुसार इंटरनेट उपभोक्त्यांच्या लोकसंख्येच्या ३३ टक्क्यांपेक्षा जास्त लोकसंख्या महाविद्यालयीन तरुण विद्यार्थी आणि शाळकरी विद्यार्थी असून, ते इंटरनेटचा वापर एवढ्या मोठ्या प्रमाणात करतात. त्या खालोखाल २६ टक्के युवक इंटरनेट वापरतात. म्हणजे भारतातील तरुणाईचे सर्वात आवडते आणि अप्रूप मनोरंजनाचे (?) साधन कुठले हे वेगळेपणाने सांगण्याची आवश्यकता भासत नाही. 

भारतातील इंटरनेटच्या वापराबाबत अनेक निष्कर्ष उत्सुकता वाढवितात. कारण, इंटरनेटकडे माहितीचे मायाजाल म्हणून पाहणारा मोठा वर्ग समाजात आहे. ज्ञानाचे स्रोत म्हणून सर्च इंजिनची अहोरात्र मदत घेतली जात असताना आश्चर्यकारकपणे इंटरनेटच्या एकूण उपयोगापैकी सर्वाधिक उपयोग म्हणजेच ४० टक्के वापर सोशल मीडिया, ३० टक्के मनोरंजन आणि राहिलेला ३० टक्के वापर इतर सर्व कार्यांसाठी केला जातो. असे आढळून आले आहे की, भारतात सर्वसाधारणपणे प्रतिदिन २०० मिनिटे व्यक्तीची इंटरनेटच्या संपर्कात जातात.

अमेरिकेत हेच प्रमाण ३०० मिनिटांपर्यंत आढळून आले आहे. इंटरनेटचा ४० टक्के वापर सोशल मीडियासाठी केला जातो. यावरून भारतीयांचे सोशल मीडियावरील प्रेम आणि त्याबाबतची जागरुकता अधोरेखित होते. केवळ एवढेच नाही तर अलीकडील काळात इंटरनेटवर इंग्रजी भाषेतून माहितीचा शोध घेण्यापेक्षा प्रादेशिक भाषेत इंटरनेटचा वापर करण्यावर उपभोक्त्यांचा कल असल्याचे गुगलसारख्या मोठ्या कंपनीने देखील मान्य केले आणि अधिकाधिक माहिती प्रादेशिक भाषेतून उपलब्ध करण्यासाठी यंत्रणा कामास लागली. 

मात्र, महाविद्यालयीन तरुण आणि शाळकरी मुले इंटरनेट अधिकाधिक वापरणे आणि एकूण वापरात मनोरंजनासाठी इंटरनेटचा अधिक वापर असणे अशा निरीक्षणातून भविष्यकाळातील पालकत्वाची आव्हाने आणि त्याची व्याप्ती व गुंतागुंत वाढणार असल्याचे सूतोवाच होते. विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या जादूई दुनियेत केवळ सोशल मीडिया व मनोरंजन इथपर्यंत मर्यादित न राहता इंटरनेटचा विधायक उपयोग कसा करता येईल. त्याचसोबत भविष्यकाळात विज्ञानाधारित सुसंस्कारित पिढी उज्ज्वल भारताच्या निर्मितीसाठी करणे हे आव्हान सक्षमपणे झेपल्यास इंटरनेटचा उपयोग नवसमाज निर्मितीसाठी होईल, असे म्हणता येईल.- डॉ. दीपक ननवरे(लेखक दयानंद वाणिज्य महाविद्यालयात सहयोगी प्राध्यापक आहेत.) 

टॅग्स :SolapurसोलापूरInternetइंटरनेट