शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

... म्हणून किसान रेल्वे बंद, रेल्वे अधिकाऱ्याने दिलेलं कारण ऐकून शेतकरीही अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 12:04 IST

सोलापूर/सांगोला - उन्हामुळे किसान रेल्वे एका जागेवर जास्तवेळ थांबल्यास शेतीमाल खराब होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे, मध्य रेल्वेने ...

सोलापूर/सांगोला - उन्हामुळे किसान रेल्वे एका जागेवर जास्तवेळ थांबल्यास शेतीमाल खराब होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे, मध्य रेल्वेने तात्पुरत्या स्वरुपात किसान रेल्वे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या किसान रेल्वेला प्रतिसाद मिळत असतानाही अचानक बंद केल्यामुळे शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.

सांगोला तालुक्यातील डाळिंबासह इतर फळे, भाजीपाल्यास परराज्यातील बाजारपेठ उपलब्ध व्हावी, उत्पादक शेतकऱ्यांना कमी खर्चात अधिकचे उत्पन्न मिळावे यासाठी २१ ऑगस्ट २०२० रोजी सांगोला येथून पहिली किसान रेल्वे सुरू झाली. कोरोनाकाळात सांगोला रेल्वे स्टेशन मध्य रेल्वेचे उत्पन्नाचे स्त्रोत बनले होते. एकूण तीन किसान रेल्वेगाड्या सुटत होत्या. त्यामुळे शेतकऱ्यांचा डाळिंब, द्राक्ष, पपई, पेरू, सीताफळ, चिकू, शिमला मिरची, टोमॅटो, हिरवी मिरची, शेवगा, आले, लिंबू असा शेतीमाल देशातील विविध राज्यांमध्ये कमी खर्चात वाहतूक होऊन सुरक्षित पोहोच होत होता. केवळ सांगोला नव्हे तर आटपाडी, कवठेमंकाळ, जत, मंगळवेढा, कर्नाटकातील विजापूर येथील शेतकऱ्यांचा शेतीमाल परराज्यातील बाजारपेठेत वेळेत पोहोचवला जात होता. किसान रेल्वे चालू झाल्यापासून सांगोला रेल्वे स्टेशन येथून सुमारे ७९ हजार टन शेतीमालाच्या वाहतुकीतून रेल्वेला सुमारे ३२ कोटी रुपयाचा फायदा झाला आहे. आता किसान रेल्वे बंद झाल्यामुळे मोठा फटका बसला आहे.

..अन्यथा रेल रोको आंदोलन

वाढत्या डिझेल दरवाढीमुळे ट्रान्सपोर्ट वाहतुकीचा खर्च शेतकऱ्यांना न परवडणारा आहे. बंद केलेली किसान रेल्वे तत्काळ पूर्ववत सुरू करावी, अन्यथा शेतकऱ्यांच्या वतीने सांगोला रेल्वे स्टेशनवर रेल रोको आंदोलन करावे लागेल, असा इशारा अनिल विभुते यांनी दिला आहे. यावेळी प्रकाश वऱ्हाडे, महेश बंडगर, अभिजित गायकवाड, विकास वऱ्हाडे आदी शेतकरी उपस्थित होते.

किसान रेल्वे ३० एप्रिलपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात बंद केली आहे. ज्या रेल्वेलाइनवरून किसान रेल्वे जाते त्याच लाइनवरून मालगाडीतून कोळशाची वाहतूक केली जाते. उन्हाळ्यामुळे किसान रेल्वे एका जागेवर जास्त वेळ थांबवल्यास शेतीमाल खराब होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे मध्य रेल्वेने तात्पुरत्या स्वरूपात किसान रेल्वे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

- एस. एन. सिंग, स्टेशनमास्तर, सांगोला

टॅग्स :railwayरेल्वेFarmerशेतकरीSolapurसोलापूर