शहरं
Join us  
Trending Stories
1
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
2
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
3
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
4
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
5
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
6
“उत्तर मुंबईकरांचा मिळणारा प्रतिसाद महायुतीच्या महाविजयाची नांदी”; पीयूष गोयल यांना विश्वास
7
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
8
लॉटरी खेळण्याच्या व्यसनापायी 'त्याने' ऑफिसच्या पैशांवरच मारला डल्ला; असा झाला पर्दाफाश
9
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
10
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
11
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
12
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
13
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
14
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
15
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
16
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
17
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
18
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
19
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
20
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"

मुलांकडून शिकण्यासारखं खूप काही...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 12:20 PM

आॅस्ट्रेलियात आल्यापासून देश, घर, मित्र, नातेवाईक आणि आपल्या माणसापासून हजारो मैल लांबच्या अनोळखी प्रदेशात स्थिरावलेली अनेक भारतीय मुलंमुली भेटली. ...

आॅस्ट्रेलियात आल्यापासून देश, घर, मित्र, नातेवाईक आणि आपल्या माणसापासून हजारो मैल लांबच्या अनोळखी प्रदेशात स्थिरावलेली अनेक भारतीय मुलंमुली भेटली. तीन महिने त्यांच्यासोबत राहिलो. खूप गप्पा झाल्या. त्यांचा जीवनसंघर्ष समजून घेतला. देशभरातील विविध प्रांतातील बहुसांस्कृतिक, बहुभाषिक आणि विविध रूढी, परंपरा, चालीरीती असणाºया आपल्या मुलामुलींचे सहजीवन जवळून पाहिल्यानंतर त्यांच्याविषयीचा आदर द्विगुणित झाला.

या मुलामुलींना आपणच बोट धरून जगणं शिकवलं. शिक्षण दिले. संस्कार दिले. आत्मविश्वास दिला. आज ही मुलं जगाच्या पाठीवर कुठेही गेले तरी स्वबळावर संघर्ष करू शकतात. आज आपले नेमके उलट झाले आहे. आॅस्ट्रेलियातील नियम, शिस्त आणि सार्वजनिक गोष्टींची माहिती आणि सवय नसल्यामुळे आम्हीच त्यांचे बोट धरून चालतोय. त्यांनी दाखविलेले आधुनिक जग पाहून डोळे दिपून गेले. त्यांचा आत्मविश्वास पाहिल्यानंतर ही मुलं केव्हाच आपलं बोट सोडून स्वतंत्र झाल्याची जाणीव झाली. आम्हालाच त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकाव्या लागतात.

जग झपाट्याने बदलतंय. त्यामुळे जागतिक स्पर्धेत उतरल्याशिवाय पर्याय नाही. आपल्याकडे चांगल्या नोकºया कमी, याउलट जगभरात शिक्षण, कौशल्ये, क्षमता असणाºयांना बोलावून संधी मिळते. यामुळेच आपली मुलं देश सोडून आॅस्ट्रेलियात आणि जगभर स्थिरावली. तरीही त्यांच्यामध्ये ‘आमची माती आमची माणसं’ ही भावना अजूनही दिसते. त्यांनी देश सोडल्यामुळे होणाºया टीकेविषयी त्यांचे म्हणणे असे की, आपले सामर्थ्य जगाच्या पाठीवर सिद्ध करण्यासाठी आम्ही निवडलेला सकारात्मक मार्ग आहे.

जागतिकीकरण आणि ‘ग्लोबल व्हिलेज’च्या वातावरणामुळे देशाबाहेरची नोकरी आणि जगण्यासाठी करावा लागणारा आमचा ‘स्ट्रगल’ न पाहता, आमची बाजू न ऐकता एकतर्फी केली जाणारी टीका अयोग्य आहे, अशी त्यांची तक्रार दिसते. नोकरी नाही म्हणून रडत बसण्यापेक्षा देशप्रेम जोपासत त्यांनी स्वत:ला घडविले. सक्षम बनविले. खूप कठीण परिस्थितीला सामोरे जात बदल स्वीकारले, यासाठी त्यांचे कौतुक झाले पाहिजे. वर्तमानात जगणारी, प्रचंड आत्मविश्वास आणि जिंकण्याची जिद्द असणारी आपली ही तरुणाई जगभरात यशस्वी होताना दिसते. 

उलट ही मुलं घरातल्या, बाहेरच्या, सगळ्यांच्या टीकेचे धनी झाले. भारतात होतो तेव्हा आमच्या नोकरीविषयी कुणीच बोलत नव्हते. त्यामुळे जागतिक स्पर्धा आणि देशांतर्गत परिस्थिती पाहता देश सोडण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. आम्ही आनंदाने घरदार, देश सोडून आलो नाही. आईवडिलांनी शिकवून मोठे केले, तरीही बेकार फिरल्यामुळे त्यांच्या चेहºयावरची काळजी दूर करण्यासाठी आम्हाला ही किंमत मोजावी लागली. इतक्या कठोर शब्दात व्यथा मांडणाºया आपल्या मुलांमध्ये दिसलेले सर्वांगीण बदल आमच्यासाठी खूपच नवीन होते. वस्तुस्थिती आणि परिस्थितीचे अचूक आकलन, समाजभान, जबाबदार वृत्ती, कर्तव्यपूर्तीसाठी तत्पर अशा आपल्या मुलांमधील गुणांचे इकडे भरपूर कौतुक होताना पाहिले.

मनापासून समाधान वाटले. त्यांचे राहणीमान उंचावले. जीवनशैली बदलली तरीही आपल्या संस्कृतीतल्या गोष्टींचे जतन करीत उत्तम समतोल राखतात. आपल्या मुलामुलींनी स्वत:ला सिद्ध केल्यामुळे भारतीयांची प्रतिमा उंचावली आहे. सतत कार्यमग्न राहणाºया या मुलांची तडजोडीची, स्पर्धेची, नवख्या माणसाशी देखील जुळवून घेण्याची तयारी पाहून थक्क झालो. ‘गॉसिपिंग’मध्ये वेळ घालविण्यापेक्षा ‘क्रिएटिव्ह’ आणि ‘उत्पादक’ गोष्टी करण्याकडे त्यांचा कल असतो. स्पर्धेत झोकून देऊन जिंकण्याची त्यांची भूमिका महत्त्वाची वाटली. इथल्या काहीच न करता वांझोटी टीका करीत रडत बसणाºयांविषयी त्यांना बिलकूल आस्था वाटत नाही. म्हणून स्वकर्तृत्वावर पुढे जाण्याची जिद्द हेच बलस्थान असलेल्या आपल्या मुलांकडून जे शिकण्यासारखे आहे ते शिकायला काय हरकत आहे.- प्रा. विलास बेत (मेलबॉर्न आॅस्ट्रेलिया) (लेखक परिवर्तनवादी चळवळीचे अभ्यासक आहेत.) 

टॅग्स :SolapurसोलापूरEducationशिक्षणSchoolशाळा