शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
2
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
3
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
4
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
5
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
6
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
7
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
8
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
9
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
10
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
11
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
12
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
13
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
14
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
15
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
16
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर
17
Mumbai Pune Mumbai 4: स्वप्नील-मुक्ताची जोडी पुन्हा एकत्र, 'मुंबई पुणे मुंबई ४'ची घोषणा, बघा व्हिडीओ
18
श्रेयस अय्यरला झालेली दुखापत किती गंभीर, आता कशी आहे प्रकृती? बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती
19
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
20
Mid-Size SUV: २० लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये घरी आणा 'या' ५ जबरदस्त मिड- साइज एसयूव्ही कार!

टीका करताना भान ठेवून बोलायला हवं ; शिवराज पाटील-चाकुरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2019 10:29 IST

आंबेडकरांच्या नातवाने राज्य घटनेचा खून केला - सुशीलकुमार शिंदे

ठळक मुद्देकाँग्रेस - राष्ट्रवादीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचाराचा प्रारंभदक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर येथील सोमेश्वर आणि बनसिद्धेश्वर मंदिराच्या प्रांगणात हा शुभारंभ करण्यात आलादेशात ७० वर्षे काहीच झाले नाही असे म्हणणे देशातील जनतेची दिशाभूल करण्यासारखे आहे - चाकूरकर

सोलापूर : डॉक्टर इमारत बांधू शकत नाही, गायक रोगी बरा करू शकत नाही, तसे राजकारणाचा आणि प्रशासनाचा अनुभव नसणारा लोकप्रतिनिधी निवडून देण्याचा काय उपयोग? असा सवाल करीत माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील-चाकूरकर यांनी भाजपच्या उमेदवाराला अप्रत्यक्ष लक्ष्य केले. टीका करताना भान ठेवून बोलायला हवं, असा इशारा त्यांनी सत्ताधाºयांना दिला. 

काँग्रेस - राष्ट्रवादीचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रचाराचा प्रारंभ करताना चाकूरकर बोलत होते़ दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तूर येथील सोमेश्वर आणि बनसिद्धेश्वर मंदिराच्या प्रांगणात हा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी बोलताना चाकूरकर यांनी सत्ताधारी भाजप नेत्यांच्या वक्तव्यांचा समाचार घेतला.  देशात ७० वर्षे काहीच झाले नाही असे म्हणणे देशातील जनतेची दिशाभूल करण्यासारखे आहे़  गेल्या साडेचार वर्षांत भाजप सरकारने नेमके काय केले? याचा शोध घ्यावा लागेल़ आरोप करणे खूप सोपे असते़ काम करणे महाकठीण, याचा प्रत्यय केंद्रातल्या सरकारला येत असावा़ आश्वासनं देणं सोपं, पण ती पाळताना किती कसरत करावी लागते याचा अनुभव आम्हाला आहे़ सरकारने दिलेली आश्वासने पाळली नाहीत, असा आरोप त्यांनी केला.

हल्ली गांधी-नेहरु घराण्यावर सत्ताधारी पक्षाची मंडळी तोंडसुख घेत आहेत, असे सांगताना चाकूरकर म्हणाले, नेहरू यांच्याविषयी अपशब्द वापरणं हे नेहरुंवर नव्हे तर देशावर अन्याय करणारं ठरेल.  शेतकरी, शेतमजूर हा या देशाचा कणा़ तोच आता खिळखिळा बनत चालला आहे़ त्याला जबाबदार कोण? असा सवालही चाकूरकरांनी केला.

वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्या उमेदवारीविषयी बोलताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले, ते माझे चांगले मित्र आहेत़ बाबासाहेबांनी घटना लिहिताना सर्वधर्मसमभाव हा या देशाचा पाया असल्याचे नमूद केले़ पण आमचे मित्र जातीयवादी शक्तीबरोबर गेले, याचे मला खरे दु:ख  आहे़ एमआयएमसारख्या जातीयवादी शक्तींनी हा देश खिळखिळा केला़ त्यांची सोबत करायला नको होती.

उत्तर सोलापूर आणि दक्षिण सोलापूर तालुक्यात झालेल्या कार्यक्रमावेळी आ़ सिद्धाराम म्हेत्रे, आमदार प्रणिती शिंदे, आ़ रामहरी रुपनवर, माजी आमदार दिलीप माने, विश्वनाथ चाकोते, उज्ज्वलाताई शिंदे,  जि. प. माजी अध्यक्ष बळीराम साठे, बाळासाहेब शेळके, राजशेखर शिवदारे, चेतन नरोटे मार्डीचे सरपंच अविनाश मार्तंडे, राकाँचे जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र हजारे, गणेश पाटील, बाजार समितीचे संचालक जितेंद्र साठे, उत्तर सोलापूर तालुका राष्टÑवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रल्हाद काशिद यांची उपस्थिती होती़

आंबेडकरांच्या नातवाने राज्य घटनेचा खून केला- एमआयएमसारख्या धर्मांध पक्षासोबत आघाडी करून डॉ. बाबासाहेबांच्या नातवाने राज्यघटनेचा खून केला असून, भाजपा हा नरेंद्र मोदीसारख्या हुकूमशहाचा पक्ष असल्याची टीका काँग्रेसचे सोलापूर लोकसभेचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी मार्डी येथे केली. - देशवासीयांनी गेल्या निवडणुकीत मोठ्या अपेक्षेने भाजपला सत्ता दिली; मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच वर्षांत आपल्या देशातील लोकशाही पूर्णपणे गुंडाळून ठेवली, हे जनतेच्याही आता व्यवस्थित लक्षात आले आहे, अशी टीकाही शिंदे यांनी भाजपवर केली.

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsolapur-pcसोलापूरShivraj Patil Chakurkarशिवराज पाटील चाकूरकरSushilkumar Shindeसुशीलकुमार शिंदेBJPभाजपाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस