शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

शरद पवारांनी आंबेडकर चळवळीची एक पिढी बरबाद केली; आनंदराज आंबेडकर यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 20:26 IST

काही लोक स्वत:ला देवाच्या पातळीवर घेऊन जात आहेत. स्वत:ला देव समजत आहेत. परंतु स्वत:ला देव समजणारे लोक जेलमध्ये बसले आहेत. देव समजणाºया जयसिद्धेश्वर यांना मानसोपचाराची गरज आहे.

ठळक मुद्देसोलापूर लोकसभा निवडणुकीत बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचारार्थ त्यांचे बंधू आनंदराज आंबेडकर हे पंढरपुरातनिवडणुकीच्या निकालानंतर छोट्या पक्षांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे मत आनंदराज आंबेडकर यांनी व्यक्त केले.

पंढरपूर : शरद पवार यांनी चुकीच्या नेत्याला पुढे आणून आंबेडकर चळवळीची एक पिढी बरबाद केली. त्यामुळे चळवळ मागे पडली आणि ‘तो’ नेताही पवारांच्या आता जवळ नाही. तसेच सोलापूर येथील पवारांची सभा ही केविलवाणी झाली. ज्या सेनापतींनी रिंगणातून पळ काढला त्याबद्दल काय बोलणार?  अशी टीका आनंदराज आंबेडकर यांनी शरद पवार यांच्यावर केली.

सोलापूर लोकसभा निवडणुकीत बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचारार्थ त्यांचे बंधू आनंदराज आंबेडकर हे पंढरपुरात आले होते, तेव्हा त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

जयसिद्धेश्वर यांच्यावर टीका करताना आंबेडकर म्हणाले, काही लोक स्वत:ला देवाच्या पातळीवर घेऊन जात आहेत. स्वत:ला देव समजत आहेत. परंतु स्वत:ला देव समजणारे लोक जेलमध्ये बसले आहेत. तसेच देव समजणाºया जयसिद्धेश्वर यांना मानसोपचाराची गरज आहे, असे सांगितले.

उत्तर प्रदेशामध्ये भाजपला विरोध म्हणून सपा आणि बसपा एकत्र आले. यामध्ये काँग्रेसने पण सामील होणार असे वाटले. मात्र यापासून वेगळे राहून सर्व जागांवर उमेदवार उभे केले. याचा फायदा निवडणुकीत भाजपला होणार आहे़ यावरून काँग्रेसच भाजपची ‘ए’ टीम आहे, अशी टीका त्यांनी केली.

तसेच काँग्रेसचा जाहीरनामा हा निवडणुकीचा जुमला आहे, अशी टीका त्यांनी केली. राज्यात या निवडणुकीत चमत्कार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

यंदाची निवडणूक ही घराणेशाही, धार्मिकता याविरुद्ध आहे. निवडणुकीच्या निकालानंतर छोट्या पक्षांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे मत आनंदराज आंबेडकर यांनी व्यक्त केले.

सोलापूरचा पाणी प्रश्न शिंदे सोडवू शकले नाहीत सुशीलकुमार शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री, राज्यातील विविध खात्यांचे मंत्री, केंद्रात मंत्री पद उपभोगले.  मात्र सोलापूरच्या जनतेचा जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न सोडवू शकले नाहीत. एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या शहरात आठ दिवसांतून एकदा पाणी येते हे दुर्दैव आहे, अशीही टीका यावेळी आनंदराज आंबेडकर यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्यावर केली.

काँग्रेसच भाजपची ‘ए’ टीम - उत्तर प्रदेशामध्ये काँग्रेसने सपा आणि बसपा बरोबर आघाडी न करता सर्व ठिकाणी उमेदवार उभे केले. यामुळे उलट याचा फायदा भाजपलाच होणार आहे़ त्यामुळे काँग्रेसचे नेते जर वंचित आघाडीला भाजपची ‘बी’ टीम म्हणत असतील तर काँग्रेसच खºया अर्थाने भाजपची ‘ए’ टीम आहे, अशी  टीकाही आनंदराज आंबेडकर यांनी बोलताना शेवटी केली़

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsolapur-pcसोलापूरmadha-pcमाढाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर