शहरं
Join us  
Trending Stories
1
EXIT POLL मध्ये ठाकरे बंधूंना धक्का, संजय राऊतांचा खळबळजनक दावा; 'त्या' बैठकीत काय शिजलं?
2
BMC Election 2026: ३ सर्व्हे ३ अंदाज...मुंबईत भाजपाच सर्वात मोठा पक्ष?; महायुतीची सत्ता येण्याचा EXIT POLL
3
'निवडणूक मतदान प्रक्रियेत क्रांतिकारी बदल झाले पाहिजेत'; सुधीर मुनगंटीवार यांनी स्पष्टच सांगितलं
4
Maharashtra BMC Exit Poll Result 2026 LIVE: पिंपरी चिंचवडमध्ये भाजपाची सत्ता, अजित पवार विरोधी बाकावर
5
TMC Election 2026 Exit Poll: ठाण्यात शिंदेसेना मारणार मुंसडी! उद्धवसेना, भाजपाला किती जागा मिळणार?
6
iPhone: आणखी स्वस्त झाला आयफोन; रिपब्लिक सेलआधीच मोठा धमाका! कुठं मिळतोय इतका स्वस्त?
7
उद्धव ठाकरेंनी आक्षेप घेताच निवडणूक अधिकाऱ्यांनी 'तो' निर्णय तात्काळ मागे घेतला, काय घडलं?
8
महाराष्ट्रातील 29 महापालिकांमध्ये कुठे, किती टक्के मतदान? मुंबईच्या निकालांकडे सर्वांचे लक्ष
9
"आशिष शेलारजी, आपण राज्याचे मंत्री आहात की निवडणूक आयोगाचे वकील?", काँग्रेसकडून प्रश्नांचा भडिमार, कोणत्या मुद्द्यांवर बोट?
10
 10 Minute Delivery: १० मिनिटांत डिलिव्हरी बंद, पण 'इन्सेंटिव्ह'साठी जीवघेणी शर्यत सुरूच! 
11
मतदान सुरू असतानाच जळगाव शहरात गोळीबार; प्रकरण काय, पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती
12
भयंकर, अटल आणि असह्य; लष्कराने 'ऑपरेशन सिंदूर'चा नवीन व्हिडीओ आला समोर, पाकिस्तानचा विध्वंस
13
Vijay Hazare Trophy 1st Semi Final : करुण नायरची कडक खेळी; पण Ex समोर शतकी डाव फसला अन्... (VIDEO)
14
दोन मुलांचा बाप अन् ६ वर्ष लहान... फुटबॉलच्या मैदानातील 'गोलमेकर'ला डेट करतेय नोरा फतेही!
15
ऑपरेशन सिंदूरचा धसका! २२ मिनिटांत ९ तळ उद्ध्वस्त; हाफिज रऊफने मान्य केली भारतीय सैन्याची ताकद
16
कंटेनरची Air India च्या विमानाला जोरदार धडक; दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला
17
"नवी मुंबईत बाहेरून लोक आणून..."; शिंदेसेनेचे खासदार नरेश म्हस्केंचा भाजपावर गंभीर आरोप
18
धक्कादायक! दिल्लीत ५ दिवसांत दुसरी मोठी सायबर फसवणूक; 'डिजिटल अरेस्ट' करुन महिलेची ७ कोटी रुपयांना फसवणूक
19
Anil Parab: "ही शाई नाही, मार्कर आहे!" अनिल परबांचा महापालिका निवडणुकीत मोठ्या गडबडीचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवारांनी आंबेडकर चळवळीची एक पिढी बरबाद केली; आनंदराज आंबेडकर यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2019 20:26 IST

काही लोक स्वत:ला देवाच्या पातळीवर घेऊन जात आहेत. स्वत:ला देव समजत आहेत. परंतु स्वत:ला देव समजणारे लोक जेलमध्ये बसले आहेत. देव समजणाºया जयसिद्धेश्वर यांना मानसोपचाराची गरज आहे.

ठळक मुद्देसोलापूर लोकसभा निवडणुकीत बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचारार्थ त्यांचे बंधू आनंदराज आंबेडकर हे पंढरपुरातनिवडणुकीच्या निकालानंतर छोट्या पक्षांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे मत आनंदराज आंबेडकर यांनी व्यक्त केले.

पंढरपूर : शरद पवार यांनी चुकीच्या नेत्याला पुढे आणून आंबेडकर चळवळीची एक पिढी बरबाद केली. त्यामुळे चळवळ मागे पडली आणि ‘तो’ नेताही पवारांच्या आता जवळ नाही. तसेच सोलापूर येथील पवारांची सभा ही केविलवाणी झाली. ज्या सेनापतींनी रिंगणातून पळ काढला त्याबद्दल काय बोलणार?  अशी टीका आनंदराज आंबेडकर यांनी शरद पवार यांच्यावर केली.

सोलापूर लोकसभा निवडणुकीत बहुजन वंचित आघाडीचे उमेदवार अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचारार्थ त्यांचे बंधू आनंदराज आंबेडकर हे पंढरपुरात आले होते, तेव्हा त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

जयसिद्धेश्वर यांच्यावर टीका करताना आंबेडकर म्हणाले, काही लोक स्वत:ला देवाच्या पातळीवर घेऊन जात आहेत. स्वत:ला देव समजत आहेत. परंतु स्वत:ला देव समजणारे लोक जेलमध्ये बसले आहेत. तसेच देव समजणाºया जयसिद्धेश्वर यांना मानसोपचाराची गरज आहे, असे सांगितले.

उत्तर प्रदेशामध्ये भाजपला विरोध म्हणून सपा आणि बसपा एकत्र आले. यामध्ये काँग्रेसने पण सामील होणार असे वाटले. मात्र यापासून वेगळे राहून सर्व जागांवर उमेदवार उभे केले. याचा फायदा निवडणुकीत भाजपला होणार आहे़ यावरून काँग्रेसच भाजपची ‘ए’ टीम आहे, अशी टीका त्यांनी केली.

तसेच काँग्रेसचा जाहीरनामा हा निवडणुकीचा जुमला आहे, अशी टीका त्यांनी केली. राज्यात या निवडणुकीत चमत्कार होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 

यंदाची निवडणूक ही घराणेशाही, धार्मिकता याविरुद्ध आहे. निवडणुकीच्या निकालानंतर छोट्या पक्षांची भूमिका निर्णायक ठरणार असल्याचे मत आनंदराज आंबेडकर यांनी व्यक्त केले.

सोलापूरचा पाणी प्रश्न शिंदे सोडवू शकले नाहीत सुशीलकुमार शिंदे यांनी राज्याचे मुख्यमंत्री, राज्यातील विविध खात्यांचे मंत्री, केंद्रात मंत्री पद उपभोगले.  मात्र सोलापूरच्या जनतेचा जिव्हाळ्याचा पाणीप्रश्न सोडवू शकले नाहीत. एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या शहरात आठ दिवसांतून एकदा पाणी येते हे दुर्दैव आहे, अशीही टीका यावेळी आनंदराज आंबेडकर यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्यावर केली.

काँग्रेसच भाजपची ‘ए’ टीम - उत्तर प्रदेशामध्ये काँग्रेसने सपा आणि बसपा बरोबर आघाडी न करता सर्व ठिकाणी उमेदवार उभे केले. यामुळे उलट याचा फायदा भाजपलाच होणार आहे़ त्यामुळे काँग्रेसचे नेते जर वंचित आघाडीला भाजपची ‘बी’ टीम म्हणत असतील तर काँग्रेसच खºया अर्थाने भाजपची ‘ए’ टीम आहे, अशी  टीकाही आनंदराज आंबेडकर यांनी बोलताना शेवटी केली़

टॅग्स :SolapurसोलापूरLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकsolapur-pcसोलापूरmadha-pcमाढाPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकर