शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

बंदलगी बंधारा गेला वाहून; शेतकºयांची ७ कोटींची झाली हानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2019 12:53 IST

सीना नदीवरील बंधाºयाचे बांधकाम रखडले; यंदाही पाणीसाठ्याबाबत साशंकताच

सोलापूर : सीना नदीवरील बंदलगी बंधाºयाची दुरुस्ती रखडल्याने सत्ताधारी भाजपची नेतेमंडळी हवालदिल झाली असून, विरोधक हाच विषय आगामी काळात लावून धरण्याच्या तयारीत आहेत. तीन वर्षे उलटून गेली तरी बंधाºयाची दुरुस्ती न झाल्याने या काळात शेतकºयांचे तब्बल ७ कोटींचे नुकसान झाले आहे.

सन २०१६ मध्ये सीना नदीला आलेल्या महापुरात बंदलगी बंधाºयाचे मोठे नुकसान झाले. तळापासून बंधाºयाचे स्तंभ उखडून वाहून गेले होते. त्याच्या पाहणीसाठी भाजपच्या तत्कालीन खासदारांपासून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दौरे करून सत्ताधाºयांना चांगलेच जेरीला आणले.  

तातडीने दुरुस्तीसाठी शेतकºयांनीही आंदोलनाचा पवित्रा घेतला होता याच मुद्यावर सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना चोहोबाजूंनी घेरण्याचा प्रयत्न झाला. वर्षभरात बंधाºयाची दुरुस्ती होण्याची अपेक्षा शेतकºयांना होती; मात्र तीन वर्षे उलटून गेली तरीही या बंधाºयाचे काम पूर्ण झाले नाही त्यामुळे या पावसाळ्यात तरी पाणीसाठा होईल याबाबत शेतकरी साशंक आहेत.आगामी काळात येणाºया विधानसभा निवडणुकीत या बंधाºयाची दुरुस्ती हाच विरोधकांचा प्रमुख मुद्दा ठरण्याची शक्यता आहे. शेतकरीही या बंधाºयाची दुरुस्ती रखडल्याने अस्वस्थ आहेत.

गेल्या तीन वर्षांत याबाबत जलसंपदा विभाग आणि जिल्हाधिकाºयांचे दरवाजे ठोठावलेल्या शेतकºयांना राजकीय पाठबळ मिळाले नाही; मात्र आता हा मुद्दा सत्ताधाºयांना कोंडीत पकडण्यासाठी विरोधकांना आयते कोलीत मिळाल्याची चर्चा आहे. याबाबत काँग्रेस पक्षातील दुसरी फळी सक्रिय होत आहे. 

स्थानिक शेतकºयांमध्ये धुमसत असलेला असंतोष बाहेर काढण्याचा प्रयत्नही दुसरी फळी करण्याच्या तयारीत आहे.

७६० हेक्टर क्षेत्र सिंचनाविना- बंदलगी बंधारा वाहून गेल्याने या बंधाºयावर अवलंबून असलेल्या शेतकºयाांची मोठी हानी झाली आहे.  बंधाºयामुळे ७६० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येते. सप्टेंबर २०१६ मध्ये आलेल्या पुराने बंधाºयाच्या मध्यभागातील स्तंभ वाहून गेले. त्यामुळे पाणीसाठा होत नाही. हेक्टरी सरासरी २० हजार प्रमाणे गेल्या तीन वर्षांत शेतकºयांचे सात कोटी शेतीचे उत्पन्न नुकसान झाले़ 

तीन वर्षे काम सुरूच- सन १९७६ मध्ये सीना नदीवर बंदलगी येथे हा को.प. बंधारा बांधण्याचे काम सुरु झाले.तीन वर्षात बंधारा पूर्ण झाला आणि १९८० पासून सिंचनासाठी बंधाºयाच्या पाण्याचा उपयोग सुरू झाला. गेल्या तीन वर्षांपासून या बंधाºयाचे काम सुरूच आहे. आजदेखील ते अर्धवट स्थितीत आहे.त्यामुळे यंदातरी बंधाºयात पाणीसाठा होईल का याची चिंता शेतकºयांना लागून राहिली आहे.

बंधाºयाचे काम वेगाने सुरू आहे. संबंधित ठेकेदाराने मध्यंतरी काम थांबवले होते. त्यामुळे विलंब झाला. आता त्याची मुदतही संपली आहे. लेखी ताकीद दिल्याने काम लवकर पूर्ण करण्याची त्यांनी हमी दिली त्यामुळे त्यालाच मुदतवाढ देऊन काम पूर्ण करून घेऊ. येत्या पावसाळ्यात पाणीसाठा होईल अशी स्थिती आहे.- नारायण जोशी,कार्यकारी अभियंता , भीमा विकास विभाग क्र. २ सोलापूर

जानेवारी २०१९ मध्ये बंधाºयाचे काम पूर्ण करण्याची हमी अधिकाºयांनी दिली होती़ पावसाळा तोंडावर आला आहे, तरी काम पूर्ण झाले नाही. लोकप्रतिनिधीचे याकडे लक्ष नाही. आमचा पाठपुरावा सुरूच आहे. आता नव्याने आंदोलन हाती घेण्याशिवाय पर्याय नाही़- कांशीराम गायकवाडमाजी सरपंच, बोळकवठा

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयriverनदीwater shortageपाणीटंचाईwater transportजलवाहतूक