शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
2
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
3
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
4
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
5
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
6
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
7
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
8
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
9
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
10
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
11
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
12
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
13
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
14
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
15
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
16
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
17
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
18
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
19
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
20
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते

सांगोला विधानसभा मतदारसंघ; पक्षाने लादलेला उमेदवार आम्हास मान्य नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 12:36 IST

गणपतराव देशमुख यांनीच निवडणूक लढविण्याची निष्ठावंत कार्यकर्त्यांची मागणी

ठळक मुद्देसांगोला विधानसभा मतदारसंघातून आ. गणपतराव देशमुख यांचा राजकीय वारसदार म्हणून भाऊसाहेब रुपनर यांच्या नावाची घोषणाकार्यकर्त्यांनी एवढ्यावरच न थांबता थेट आ. देशमुख यांच्या निवासस्थानी जाऊन एकदा आम्ही सांगतो म्हणून तुम्हीच उभे राहावे, अशी विनंती करून त्यांनी गळ घातली

सांगोला : ज्यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे, त्यांनी ती परत करावी व आ. गणपतराव देशमुख यांनीच पुन्हा निवडणूक लढवावी़ कार्यकर्ते त्यांना मताधिक्क्याने निवडून देतील, असा निर्धार शेकापच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मेळाव्याप्रसंगी सर्वानुमते करण्यात आला. जर त्यांनी उमेदवारी परत नाही केली तर होणाºया दुष्परिणामाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही मेळाव्यात कार्यकर्त्यांकडून देण्यात आला. कार्यकर्त्यांनी एवढ्यावरच न थांबता थेट आ. देशमुख यांच्या निवासस्थानी जाऊन एकदा आम्ही सांगतो म्हणून तुम्हीच उभे राहावे, अशी विनंती करून त्यांनी गळ घातली.

सांगोला विधानसभा मतदारसंघातून आ. गणपतराव देशमुख यांचा राजकीय वारसदार म्हणून भाऊसाहेब रुपनर यांच्या नावाची घोषणा रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत शेकापचे राज्य चिटणीस आ. जयंत पाटील व आ. गणपतराव देशमुख यांनी केली़ तेव्हा पक्षाने लादलेला उमेदवार आम्हास मान्य नाही असाही सूर आळवला होता. 

दरम्यान, तालुक्यातील पुरोगामी युवक संघटना व आ. गणपतराव देशमुख निष्ठावंत कार्यकर्त्यांनी रविवारीच सोशल मीडियावर संभाव्य उमेदवाराविषयी नाराजी व्यक्त करत या कार्यकर्त्यांनी पुन्हा सोमवारी मेळावा घेतला.  या मेळाव्यास इच्छुक उमेदवारांपैकी माजी झेडपी सदस्य बाबासाहेब करांडे, अ‍ॅड. सचिन देशमुख व चंद्रकांत देशमुख यांच्यासह माजी नगराध्यक्ष मारुती बनकर, बाळासाहेब पाटील, शिवाजी बनकर, बाळासाहेब एरंडे, अ‍ॅड. मारुती ढाळे, अ‍ॅड. धनंजय मेटकरी, अजित गावडे, अनिल शिंदे, चंद्रकांत सरतापे, अंकुश येडगे, दीपक रुपनर, पुरोगामी युवक संघटनेचे तालुकाध्यक्ष दीपक गोडसे, अशपाक शेख, सर्जेराव वाघ, संजय शिंगाडेसह निष्ठावंत कार्यकर्ते उपस्थित होते.

दबावतंत्र नसून नेतृत्वावर विश्वास- निष्ठावंतांचे हे दबावतंत्र नसून विद्यमान नेतृत्व कायम रहावे, यासाठी कार्यकर्त्यांनी मेळावा घेतला आहे. ज्यांना आ. देशमुख यांचा वारसदार म्हणून निवडला आहे ते शेकापचे किती पिढ्यांचे कार्यकर्ते आहेत, असा सवाल उपस्थित करून आबासाहेबांनी कार्यकर्त्यांना वाºयावर सोडायला नको होते. निष्ठा दाखवण्याची हीच वेळ आहे, आबा नसतील तर मतदानाला येणार नाही, वारसदार नेमण्यापेक्षा त्यांनीच निवडणूक लढवावी, अशी एकमुखी मागणी कार्यकर्त्यांनी केली़ केवळ पैशासाठी त्यांना उमेदवारी दिली आहे असा आरोप करीत त्यांनी स्वत: होऊन उमेदवारी परत नाही केली तर निष्ठावंत कार्यकर्ते निवडणुकीत काय करायचे ते ठरवतील. होणाºया दुष्परिणामाला ते स्वत: जबाबदार राहतील, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला़

टॅग्स :SolapurसोलापूरGanpatrao Deshmukhगणपतराव देशमुखvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकsangole-acसांगोल