शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

सांगोला विधानसभा मतदारसंघ; पक्षाने लादलेला उमेदवार आम्हास मान्य नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2019 12:36 IST

गणपतराव देशमुख यांनीच निवडणूक लढविण्याची निष्ठावंत कार्यकर्त्यांची मागणी

ठळक मुद्देसांगोला विधानसभा मतदारसंघातून आ. गणपतराव देशमुख यांचा राजकीय वारसदार म्हणून भाऊसाहेब रुपनर यांच्या नावाची घोषणाकार्यकर्त्यांनी एवढ्यावरच न थांबता थेट आ. देशमुख यांच्या निवासस्थानी जाऊन एकदा आम्ही सांगतो म्हणून तुम्हीच उभे राहावे, अशी विनंती करून त्यांनी गळ घातली

सांगोला : ज्यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे, त्यांनी ती परत करावी व आ. गणपतराव देशमुख यांनीच पुन्हा निवडणूक लढवावी़ कार्यकर्ते त्यांना मताधिक्क्याने निवडून देतील, असा निर्धार शेकापच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मेळाव्याप्रसंगी सर्वानुमते करण्यात आला. जर त्यांनी उमेदवारी परत नाही केली तर होणाºया दुष्परिणामाला सामोरे जावे लागेल, असा इशाराही मेळाव्यात कार्यकर्त्यांकडून देण्यात आला. कार्यकर्त्यांनी एवढ्यावरच न थांबता थेट आ. देशमुख यांच्या निवासस्थानी जाऊन एकदा आम्ही सांगतो म्हणून तुम्हीच उभे राहावे, अशी विनंती करून त्यांनी गळ घातली.

सांगोला विधानसभा मतदारसंघातून आ. गणपतराव देशमुख यांचा राजकीय वारसदार म्हणून भाऊसाहेब रुपनर यांच्या नावाची घोषणा रविवारी झालेल्या पत्रकार परिषदेत शेकापचे राज्य चिटणीस आ. जयंत पाटील व आ. गणपतराव देशमुख यांनी केली़ तेव्हा पक्षाने लादलेला उमेदवार आम्हास मान्य नाही असाही सूर आळवला होता. 

दरम्यान, तालुक्यातील पुरोगामी युवक संघटना व आ. गणपतराव देशमुख निष्ठावंत कार्यकर्त्यांनी रविवारीच सोशल मीडियावर संभाव्य उमेदवाराविषयी नाराजी व्यक्त करत या कार्यकर्त्यांनी पुन्हा सोमवारी मेळावा घेतला.  या मेळाव्यास इच्छुक उमेदवारांपैकी माजी झेडपी सदस्य बाबासाहेब करांडे, अ‍ॅड. सचिन देशमुख व चंद्रकांत देशमुख यांच्यासह माजी नगराध्यक्ष मारुती बनकर, बाळासाहेब पाटील, शिवाजी बनकर, बाळासाहेब एरंडे, अ‍ॅड. मारुती ढाळे, अ‍ॅड. धनंजय मेटकरी, अजित गावडे, अनिल शिंदे, चंद्रकांत सरतापे, अंकुश येडगे, दीपक रुपनर, पुरोगामी युवक संघटनेचे तालुकाध्यक्ष दीपक गोडसे, अशपाक शेख, सर्जेराव वाघ, संजय शिंगाडेसह निष्ठावंत कार्यकर्ते उपस्थित होते.

दबावतंत्र नसून नेतृत्वावर विश्वास- निष्ठावंतांचे हे दबावतंत्र नसून विद्यमान नेतृत्व कायम रहावे, यासाठी कार्यकर्त्यांनी मेळावा घेतला आहे. ज्यांना आ. देशमुख यांचा वारसदार म्हणून निवडला आहे ते शेकापचे किती पिढ्यांचे कार्यकर्ते आहेत, असा सवाल उपस्थित करून आबासाहेबांनी कार्यकर्त्यांना वाºयावर सोडायला नको होते. निष्ठा दाखवण्याची हीच वेळ आहे, आबा नसतील तर मतदानाला येणार नाही, वारसदार नेमण्यापेक्षा त्यांनीच निवडणूक लढवावी, अशी एकमुखी मागणी कार्यकर्त्यांनी केली़ केवळ पैशासाठी त्यांना उमेदवारी दिली आहे असा आरोप करीत त्यांनी स्वत: होऊन उमेदवारी परत नाही केली तर निष्ठावंत कार्यकर्ते निवडणुकीत काय करायचे ते ठरवतील. होणाºया दुष्परिणामाला ते स्वत: जबाबदार राहतील, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला़

टॅग्स :SolapurसोलापूरGanpatrao Deshmukhगणपतराव देशमुखvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूकsangole-acसांगोल