शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
3
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
4
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
5
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
6
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
7
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
8
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
9
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
10
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
11
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
12
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
13
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
14
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
15
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
16
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
17
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
18
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
19
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
20
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात

गुरुनानकांच्या विचारांचे स्मरण अन् जयजयकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 10:37 AM

प्रकाशपर्व;  गुरुनानक दरबार, गुरुद्वारामध्ये कीर्तन, प्रवचन; सिंधी वसाहत उजळून निघाली

ठळक मुद्देसिंधी समाजाची वसाहत म्हणून ओळखल्या जाणाºया गुरुनानक नगरातील गुरुनानक दरबारही प्रकाशाने उजळून निघालागेल्या ७० वर्षांपासून गुरुनानकांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी होत असल्याचे सेवादारी गागनदास कुकरेजा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. केवळ प्रकाश पर्वच नव्हे तर वर्षातील ३६५ दिवस भजन, कीर्तनानंतर लंगरचा कार्यक्रम चाललेला असतो

सोलापूर : शीख धर्मीयांचे पहिले धर्मगुरु गुरुनानक यांच्या विचारांचे स्मरण अन् त्यांच्या जयजयकाराने गुरुनानक नगरातील गुरुनानक दरबार आणि अंत्रोळीकर नगरातील गुरुद्वारा लख-लख प्रकाशाने उजळून निघाला आहे. गुरुनानकांचा प्रकाशपर्व (जयंती) उद्या (मंगळवारी) साजरा होत असून, सिंधी समाज यानिमित्ताने एकवटला आहे. गुरुनानकांच्या प्रकाशपर्वानिमित्त दोन्ही ठिकाणी विद्युतरोषणाई करण्यात आली आहे. 

‘वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतिह’, हा संदेश घेऊन गुरुद्वारामध्ये ३० आॅक्टोबरपासून सकाळी ६ ते ८ आणि सायंकाळी ७ ते रात्री ९  पर्यंत सत्संग सुरु आहे. उद्या (मंगळवारी) जयंतीचे औचित्य साधून सकाळी ६ ते ८ या वेळेत रागी भाई प्रितपाल सिंघजी यांचे कीर्तन तर रात्री १० ते १२ पर्यंत वीर मनिंदरपाल सिंघजी यांचे प्रवचन आयोजित करण्यात आले आहे. सकाळी १० ते दुपारी १ पर्यंत श्री गुरु ग्रंथ साहिब पाठची समाप्ती होणार असल्याचे गुरुद्वाराचे मुख्य सेवादार रमेशसिंग यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. गुरुद्वारामध्ये येणाºया भाविकांना लंगरची (महाप्रसाद) व्यवस्था करण्यात आली आहे.

गुरुद्वारामधील धार्मिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रवींद्रसिंग यांच्या नेतृत्वाखाली कपिल नानकानी, अमर सचदेव, मंगेश कटारिया, पवन लुल्ला, वासुदेव सचदेव, लवेज पहुजा, रोशन मुरजानी, रोहिन हेमनानी, विनोद नानकानी, प्रेम नानकानी, महेश भिकचंदानी, बलकारसिंग, बसंतसिंग बोमर आदी सिंधी बांधव परिश्रम घेत आहेत. 

गुरुनानक नगरातही गुरुनानकांचा प्रकाशपर्व- सिंधी समाजाची वसाहत म्हणून ओळखल्या जाणाºया गुरुनानक नगरातील गुरुनानक दरबारही प्रकाशाने उजळून निघाला आहे. गेल्या ७० वर्षांपासून गुरुनानकांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी होत असल्याचे सेवादारी गागनदास कुकरेजा यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. केवळ प्रकाश पर्वच नव्हे तर वर्षातील ३६५ दिवस भजन, कीर्तनानंतर लंगरचा कार्यक्रम चाललेला असतो. गुरुनानक दरबारातील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेश धनवानी, सुनील कुकरेजा, गिरीश कुकरेजा, हरीश नानकानी, इंद्रलाल होतवानी, किशोर होतवानी, लक्ष्मण होतवानी, शंकर होतवानी, पूनम गुदलानी, विशनदास माखिजा, मनोहरलाल तलरेजा आदी परिश्रम घेत आहेत.

एखादा माणूस कुठल्याही जाती-धर्मातील असो, त्याला कुठलेही संकट आले तर तो गुरुनानक दरबारात येऊन गुरुनानकांसमोर नतमस्तक झाला तर त्याचे सर्वच दु:ख, संकट दूर होतात. गुरुनानकांना विष्णू-राम-कृष्णाचे अवतार मानले जाते. सर्वच जाती-धर्मांमध्ये एकता नांदो, हीच गुरुनानकांकडे प्रार्थना.-गागनदास कुकरेजा, सेवादारी- गुरुनानक दरबार.

टॅग्स :SolapurसोलापूरGuru Purnimaगुरु पौर्णिमा