शहरं
Join us  
Trending Stories
1
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
2
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
3
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
4
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
5
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
6
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
7
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
8
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
9
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
10
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
11
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
12
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
13
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
14
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
15
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
16
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
17
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
18
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
19
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
20
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन

दुर्मिळ योगायोग; वडिलांनी दहावीची तर मुलाने दिली बारावीची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 11:46 IST

माळशिरस येथील मारूती सरगर यांचा २० वर्षांनंतर शालेय जीवनात प्रवेश

ठळक मुद्देशालेय शिक्षणाला वय नसतं माणूस आयुष्यात कधीही शिकू शकतो भटक्या विमुक्त नंदीवाले समाजातील पिता-पुत्रांनी  समाजापुढे आदर्श ठेवलापिता-पुत्र एकाचवेळी परीक्षा देण्याचा हा दुर्मिळ योगायोग

एल. डी. वाघमोडे 

माळशिरस : आर. आर. आबा आता तरी थांबा... या चित्रपटातील कथेप्रमाणे माळशिरस येथील नंदीवाले समाजातील तरुणाने २० वर्षांनंतर पुन्हा शालेय जीवनात प्रवेश करून पदवीधर होण्याचा मानस व्यक्त केला. यावेळी त्यांनी दहावीची परीक्षा दिली तर त्यांच्या मुलाने बारावीची परीक्षा दिली आहे. 

पिता-पुत्र एकाचवेळी परीक्षा देण्याचा हा दुर्मिळ योगायोग आहे. मात्र, शालेय शिक्षणाला वय नसतं माणूस आयुष्यात कधीही शिकू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणून मारुती व्यंकोजी सरगर  व त्यांचा मुलगा संग्राम मारुती सरगर या भटक्या विमुक्त नंदीवाले समाजातील पिता-पुत्रांनी  समाजापुढे आदर्श ठेवला आहे. 

अशिक्षित समाजात वावर असल्यामुळे शिक्षणाचा गंध कुटुंबाला कधी लागला नव्हता. आई-वडिलांनी भिक्षा मागून मारुती सरगर यांचे दहावीपर्यंत शिक्षण केले; मात्र २००० साली  दहावीच्या वर्गात नापास झाल्यानंतर त्यांचं लग्नही उरकून टाकण्यात आलं. भविष्यात व्यापार, कामधंदा त्यामुळे शिक्षण तिथेच थांबलं. 

पुढे नंदीवाले भटक्या विमुक्त जाती-जमातींमध्ये त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला. मागास चालीरिती, हालअपेष्टा या सर्वांचे मूळ कारण शिक्षण असल्यामुळे त्यांनी स्वत:  उच्चशिक्षित होण्याचा संकल्प करीत छत्रपती विद्यालय वडाचीवाडी या शाळेतून दहावीसाठी प्रवेश घेत ते परीक्षा देत आहेत.

पुढे पदवीधर पर्यंत शिक्षण घेण्याचा त्यांचा मानस आहे. शिक्षणाची दूरदृष्टी ठेवणाºया सरगर यांनी स्वत:च्या चारही मुलांना उच्च शिक्षण देण्याचा मानस व्यक्त केला.

शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज- शिक्षण हे वाघिणीचे दूध मानले जाते. अनेक विचारवंतांनी शिक्षणासाठी स्वत:चे जीवन समर्पित केले; मात्र शिक्षणाच्या बाबतीत आजही अनेक समाजात मागासलेपणा दिसतो. शिवाय शिक्षण सुरू असताना या गोष्टीचे महत्त्व तरुणांना वाटत नसल्यामुळेही अनेक जण या वाटेवरून परत फिरतात. भटकंती करणारे ऊस तोडणी, वीटभट्टी अशा अनेक पद्धतीचे काम करणाºया कुटुंबात शिक्षणाला थारा नाही; मात्र या गोष्टीचे महत्त्व अनेकांना उशिरा कळते. शिक्षणात यश अपयशानं खचून जाणारे अनेक विद्यार्थी वेगळा मार्गही निवडतात. वयाचा विचार न करता ध्येयाने झपाटलेले अनेक जण पुन्हा शिक्षणाची कास धरताना दिसतात. त्यामुळे समाजाचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे आवश्यक आहे.

मी आयुष्यात गरिबीचे चटके घेत शिक्षण घेतले; मात्र समाजात कोणी दिशादर्शक नसल्यामुळे शिक्षण घेणे सोडून दिले. पुढे व्यापारात पैसा कमावला; मात्र शिक्षण कमी असल्याची सल मनात कायम राहिली होती. त्यामुळे मी अनेकांना शिक्षणासाठी आग्रह करतो. त्याबरोबर  स्वत:ही उच्चशिक्षित होण्याचा संकल्प केला असून, मी सध्या दहावीची परीक्षा देत आहे. - मारूती सरगर

टॅग्स :Solapurसोलापूरssc examदहावीEducationशिक्षणSchoolशाळाmalshiras-acमाळशिरस