शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : काटावर पास झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

दुर्मिळ योगायोग; वडिलांनी दहावीची तर मुलाने दिली बारावीची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 11:46 IST

माळशिरस येथील मारूती सरगर यांचा २० वर्षांनंतर शालेय जीवनात प्रवेश

ठळक मुद्देशालेय शिक्षणाला वय नसतं माणूस आयुष्यात कधीही शिकू शकतो भटक्या विमुक्त नंदीवाले समाजातील पिता-पुत्रांनी  समाजापुढे आदर्श ठेवलापिता-पुत्र एकाचवेळी परीक्षा देण्याचा हा दुर्मिळ योगायोग

एल. डी. वाघमोडे 

माळशिरस : आर. आर. आबा आता तरी थांबा... या चित्रपटातील कथेप्रमाणे माळशिरस येथील नंदीवाले समाजातील तरुणाने २० वर्षांनंतर पुन्हा शालेय जीवनात प्रवेश करून पदवीधर होण्याचा मानस व्यक्त केला. यावेळी त्यांनी दहावीची परीक्षा दिली तर त्यांच्या मुलाने बारावीची परीक्षा दिली आहे. 

पिता-पुत्र एकाचवेळी परीक्षा देण्याचा हा दुर्मिळ योगायोग आहे. मात्र, शालेय शिक्षणाला वय नसतं माणूस आयुष्यात कधीही शिकू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणून मारुती व्यंकोजी सरगर  व त्यांचा मुलगा संग्राम मारुती सरगर या भटक्या विमुक्त नंदीवाले समाजातील पिता-पुत्रांनी  समाजापुढे आदर्श ठेवला आहे. 

अशिक्षित समाजात वावर असल्यामुळे शिक्षणाचा गंध कुटुंबाला कधी लागला नव्हता. आई-वडिलांनी भिक्षा मागून मारुती सरगर यांचे दहावीपर्यंत शिक्षण केले; मात्र २००० साली  दहावीच्या वर्गात नापास झाल्यानंतर त्यांचं लग्नही उरकून टाकण्यात आलं. भविष्यात व्यापार, कामधंदा त्यामुळे शिक्षण तिथेच थांबलं. 

पुढे नंदीवाले भटक्या विमुक्त जाती-जमातींमध्ये त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला. मागास चालीरिती, हालअपेष्टा या सर्वांचे मूळ कारण शिक्षण असल्यामुळे त्यांनी स्वत:  उच्चशिक्षित होण्याचा संकल्प करीत छत्रपती विद्यालय वडाचीवाडी या शाळेतून दहावीसाठी प्रवेश घेत ते परीक्षा देत आहेत.

पुढे पदवीधर पर्यंत शिक्षण घेण्याचा त्यांचा मानस आहे. शिक्षणाची दूरदृष्टी ठेवणाºया सरगर यांनी स्वत:च्या चारही मुलांना उच्च शिक्षण देण्याचा मानस व्यक्त केला.

शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज- शिक्षण हे वाघिणीचे दूध मानले जाते. अनेक विचारवंतांनी शिक्षणासाठी स्वत:चे जीवन समर्पित केले; मात्र शिक्षणाच्या बाबतीत आजही अनेक समाजात मागासलेपणा दिसतो. शिवाय शिक्षण सुरू असताना या गोष्टीचे महत्त्व तरुणांना वाटत नसल्यामुळेही अनेक जण या वाटेवरून परत फिरतात. भटकंती करणारे ऊस तोडणी, वीटभट्टी अशा अनेक पद्धतीचे काम करणाºया कुटुंबात शिक्षणाला थारा नाही; मात्र या गोष्टीचे महत्त्व अनेकांना उशिरा कळते. शिक्षणात यश अपयशानं खचून जाणारे अनेक विद्यार्थी वेगळा मार्गही निवडतात. वयाचा विचार न करता ध्येयाने झपाटलेले अनेक जण पुन्हा शिक्षणाची कास धरताना दिसतात. त्यामुळे समाजाचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे आवश्यक आहे.

मी आयुष्यात गरिबीचे चटके घेत शिक्षण घेतले; मात्र समाजात कोणी दिशादर्शक नसल्यामुळे शिक्षण घेणे सोडून दिले. पुढे व्यापारात पैसा कमावला; मात्र शिक्षण कमी असल्याची सल मनात कायम राहिली होती. त्यामुळे मी अनेकांना शिक्षणासाठी आग्रह करतो. त्याबरोबर  स्वत:ही उच्चशिक्षित होण्याचा संकल्प केला असून, मी सध्या दहावीची परीक्षा देत आहे. - मारूती सरगर

टॅग्स :Solapurसोलापूरssc examदहावीEducationशिक्षणSchoolशाळाmalshiras-acमाळशिरस