शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

दुर्मिळ योगायोग; वडिलांनी दहावीची तर मुलाने दिली बारावीची परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 11:46 IST

माळशिरस येथील मारूती सरगर यांचा २० वर्षांनंतर शालेय जीवनात प्रवेश

ठळक मुद्देशालेय शिक्षणाला वय नसतं माणूस आयुष्यात कधीही शिकू शकतो भटक्या विमुक्त नंदीवाले समाजातील पिता-पुत्रांनी  समाजापुढे आदर्श ठेवलापिता-पुत्र एकाचवेळी परीक्षा देण्याचा हा दुर्मिळ योगायोग

एल. डी. वाघमोडे 

माळशिरस : आर. आर. आबा आता तरी थांबा... या चित्रपटातील कथेप्रमाणे माळशिरस येथील नंदीवाले समाजातील तरुणाने २० वर्षांनंतर पुन्हा शालेय जीवनात प्रवेश करून पदवीधर होण्याचा मानस व्यक्त केला. यावेळी त्यांनी दहावीची परीक्षा दिली तर त्यांच्या मुलाने बारावीची परीक्षा दिली आहे. 

पिता-पुत्र एकाचवेळी परीक्षा देण्याचा हा दुर्मिळ योगायोग आहे. मात्र, शालेय शिक्षणाला वय नसतं माणूस आयुष्यात कधीही शिकू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणून मारुती व्यंकोजी सरगर  व त्यांचा मुलगा संग्राम मारुती सरगर या भटक्या विमुक्त नंदीवाले समाजातील पिता-पुत्रांनी  समाजापुढे आदर्श ठेवला आहे. 

अशिक्षित समाजात वावर असल्यामुळे शिक्षणाचा गंध कुटुंबाला कधी लागला नव्हता. आई-वडिलांनी भिक्षा मागून मारुती सरगर यांचे दहावीपर्यंत शिक्षण केले; मात्र २००० साली  दहावीच्या वर्गात नापास झाल्यानंतर त्यांचं लग्नही उरकून टाकण्यात आलं. भविष्यात व्यापार, कामधंदा त्यामुळे शिक्षण तिथेच थांबलं. 

पुढे नंदीवाले भटक्या विमुक्त जाती-जमातींमध्ये त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा केला. मागास चालीरिती, हालअपेष्टा या सर्वांचे मूळ कारण शिक्षण असल्यामुळे त्यांनी स्वत:  उच्चशिक्षित होण्याचा संकल्प करीत छत्रपती विद्यालय वडाचीवाडी या शाळेतून दहावीसाठी प्रवेश घेत ते परीक्षा देत आहेत.

पुढे पदवीधर पर्यंत शिक्षण घेण्याचा त्यांचा मानस आहे. शिक्षणाची दूरदृष्टी ठेवणाºया सरगर यांनी स्वत:च्या चारही मुलांना उच्च शिक्षण देण्याचा मानस व्यक्त केला.

शिक्षणाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज- शिक्षण हे वाघिणीचे दूध मानले जाते. अनेक विचारवंतांनी शिक्षणासाठी स्वत:चे जीवन समर्पित केले; मात्र शिक्षणाच्या बाबतीत आजही अनेक समाजात मागासलेपणा दिसतो. शिवाय शिक्षण सुरू असताना या गोष्टीचे महत्त्व तरुणांना वाटत नसल्यामुळेही अनेक जण या वाटेवरून परत फिरतात. भटकंती करणारे ऊस तोडणी, वीटभट्टी अशा अनेक पद्धतीचे काम करणाºया कुटुंबात शिक्षणाला थारा नाही; मात्र या गोष्टीचे महत्त्व अनेकांना उशिरा कळते. शिक्षणात यश अपयशानं खचून जाणारे अनेक विद्यार्थी वेगळा मार्गही निवडतात. वयाचा विचार न करता ध्येयाने झपाटलेले अनेक जण पुन्हा शिक्षणाची कास धरताना दिसतात. त्यामुळे समाजाचा शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलणे आवश्यक आहे.

मी आयुष्यात गरिबीचे चटके घेत शिक्षण घेतले; मात्र समाजात कोणी दिशादर्शक नसल्यामुळे शिक्षण घेणे सोडून दिले. पुढे व्यापारात पैसा कमावला; मात्र शिक्षण कमी असल्याची सल मनात कायम राहिली होती. त्यामुळे मी अनेकांना शिक्षणासाठी आग्रह करतो. त्याबरोबर  स्वत:ही उच्चशिक्षित होण्याचा संकल्प केला असून, मी सध्या दहावीची परीक्षा देत आहे. - मारूती सरगर

टॅग्स :Solapurसोलापूरssc examदहावीEducationशिक्षणSchoolशाळाmalshiras-acमाळशिरस