शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

राम मंदिर ना भाजपाचा, ना संघाचा मुद्दा, ती तर प्रत्येक हिंदूची भावना : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 12:24 IST

बार्शी : अयोध्येतील राम मंदिराचा प्रश्न सध्या शिवसेनेने उचलून धरत ‘पहले मंदिर, फिर सरकार’ असा नारा दिला आहे. राम ...

ठळक मुद्देराज्यातील राजकीय सर्व्हे पाहता काँग्रेस-राष्टÑवादीला एकत्र आल्याशिवाय पर्याय नसल्याचे रिपोर्ट आहेत - महसूल मंत्रीराम मंदिर उभारले पाहिजे, हे प्रत्येक हिंदूचे स्वप्न - महसूल मंत्री

बार्शी : अयोध्येतील राम मंदिराचा प्रश्न सध्या शिवसेनेने उचलून धरत ‘पहले मंदिर, फिर सरकार’ असा नारा दिला आहे. राम मंदिर हा ना भाजपचा मुद्दा आहे, ना राष्टÑीय स्वयंसेवक संघाचा. तो प्रत्येक हिंदूचा मुद्दा आहे. जो गुणाने हिंदू आहे, म्हणजे जो देशावर प्रेम करतो, इथल्या मातीवर प्रेम करतो तो मुसलमान हादेखील हिंदूच आहे, असे मत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. 

बार्शी येथे सोमवारी आले असता, ते बोलत होते. महसूल मंत्री पाटील म्हणाले, राम मंदिर उभारले पाहिजे, हे प्रत्येक हिंदूचे स्वप्न आहे. त्यामुळे ते शिवसेनेच्या माध्यमातून झाले तर गैर काय? शेवटी मंदिर होणे गरजेचे आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काँग्रेस-राष्टÑवादी आघाडीच्या जागा वाटप झाल्या आहेत. मात्र अद्याप शिवसेना-भाजपाच्या युतीचा निर्णय झाला नाही. ज्यांना जादा भीती वाटते, ते सर्वप्रकारची अ‍ॅडजेस्टमेंट करतात.

राज्यातील राजकीय सर्व्हे पाहता काँग्रेस-राष्टÑवादीला एकत्र आल्याशिवाय पर्याय नसल्याचे रिपोर्ट आहेत. २०१४ साली काँग्रेस-राष्टÑवादी विधानसभेला विरोधात लढले होते, त्याचा फटका त्यांना बसला. यावेळी आघाडी नाही झाली तर त्याचा फटका विशेषत: राष्टÑवादीला जादा बसेल. २०१४ साली राज्यात राष्टÑवादीचे ४१ आमदार निवडून आले होते. आता मात्र काँग्रेस व राष्ट्रवादी स्वतंत्र लढल्यास राष्टÑवादीचे १० आमदारसुद्धा येतील की नाही शंका आहे. या उलट काँग्रेसची पाळेमुळे घट्ट आहेत, असे सांगत राष्टÑवादीवर निशाणा साधला.

राज्यातील सेना नेते म्हणतात, सध्या शिवसेना व भाजपात ‘आम्ही काय कुणाचे खातो, तो राम आम्हाला देतो,’ अशा विचारांची व अहंमभावना असलेले कार्यकर्ते आहेत. त्यांना सत्ता कोणाचीही येवो, त्याशी काही घेणे-देणे नाही. शेवटी शिवसेना काय? भाजपा किंवा अन्य राजकीय पक्ष काय, ही सारी माया आहे. मात्र भाजपा युतीसाठी प्रयत्नशील आहे. शेवटी जे ठरेल ते होईल. भाजपाचा पाया भक्कम आहे. त्यामुळे राज्यात व देशात पक्ष बॅकफूटवर कधीही नव्हता, तो जाणार नाही, असा विश्वासही नामदार पाटील यांनी व्यक्त केला.

युती न झाल्यास स्वतंत्र लढूच्आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी-शिवसेना युती झाली पाहिजे, असा भाजपाचा सद्यस्थितीत मूड असून, ज्या मतदारसंघात शिवसेनेच्या विद्यमान खासदार आहेत त्या ठिकाणी भाजपा दावा करणार नाही. उगाच जागा वाटपावरून भांडणे नकोत. मात्र युती झाली नाही, तर भाजपा स्वतंत्रपणे निवडणुकांना सामोरे जाईल, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. 

बार्शी मंडळाचा दुष्काळात समावेश करूच्राज्याची आर्थिक स्थिती चांगली आहे. बार्शी ते कुर्डूवाडी रस्त्याचे काम मार्गी लावले. यासारख्या लोकहिताच्या कामांची मागणी बार्शीकरांनी केल्यास ती निश्चित पूर्ण करू. बार्शी शहर मंडळाचा समावेश दुष्काळी मंडळात करण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी त्या संबंधीचा अहवाल पाठविल्यानंतर बार्शी मंडळाचा दुष्काळी मंडळात समावेश करू, असे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Solapurसोलापूरchandrakant patilचंद्रकांत पाटीलShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस