शहरं
Join us  
Trending Stories
1
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
2
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
3
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
4
इलेक्ट्रिक व्हेईकल घेणाऱ्यांसाठी CM फडणवीसांची मोठी घोषणा; टोलमाफी देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
5
...म्हणून मुलाचं नाव बॉबी ठेवलं! किशोरी शहाणेंनी सांगितलं कारण, म्हणाल्या- "मी मराठी, नवरा पंजाबी आणि सासू..."
6
ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न अंगलट; दुचाकीवर पाठी बसलेल्या तरुणीचा ट्रकखाली चिरडून मृत्यू
7
पाकिस्तानने कुठे लपवलाय अण्वस्त्रांचा साठा? 'या' अहवालाने केली पाकची पोलखोल...
8
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
9
डॉलरच्या तुलनेत रुपयाची जोरदार कामगिरी; आशियातील सर्वात मजबूत चलन, ही आहेत ५ कारणे
10
टक्केवारीच्या आरोपानंतर परभणीचे जिल्हा नियोजन अधिकारी कार्यमुक्त; अधिकाऱ्यांमध्ये खळबळ
11
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
12
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
13
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
14
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
15
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
16
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
17
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
18
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
19
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
20
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद

राम मंदिर ना भाजपाचा, ना संघाचा मुद्दा, ती तर प्रत्येक हिंदूची भावना : चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 12:24 IST

बार्शी : अयोध्येतील राम मंदिराचा प्रश्न सध्या शिवसेनेने उचलून धरत ‘पहले मंदिर, फिर सरकार’ असा नारा दिला आहे. राम ...

ठळक मुद्देराज्यातील राजकीय सर्व्हे पाहता काँग्रेस-राष्टÑवादीला एकत्र आल्याशिवाय पर्याय नसल्याचे रिपोर्ट आहेत - महसूल मंत्रीराम मंदिर उभारले पाहिजे, हे प्रत्येक हिंदूचे स्वप्न - महसूल मंत्री

बार्शी : अयोध्येतील राम मंदिराचा प्रश्न सध्या शिवसेनेने उचलून धरत ‘पहले मंदिर, फिर सरकार’ असा नारा दिला आहे. राम मंदिर हा ना भाजपचा मुद्दा आहे, ना राष्टÑीय स्वयंसेवक संघाचा. तो प्रत्येक हिंदूचा मुद्दा आहे. जो गुणाने हिंदू आहे, म्हणजे जो देशावर प्रेम करतो, इथल्या मातीवर प्रेम करतो तो मुसलमान हादेखील हिंदूच आहे, असे मत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. 

बार्शी येथे सोमवारी आले असता, ते बोलत होते. महसूल मंत्री पाटील म्हणाले, राम मंदिर उभारले पाहिजे, हे प्रत्येक हिंदूचे स्वप्न आहे. त्यामुळे ते शिवसेनेच्या माध्यमातून झाले तर गैर काय? शेवटी मंदिर होणे गरजेचे आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काँग्रेस-राष्टÑवादी आघाडीच्या जागा वाटप झाल्या आहेत. मात्र अद्याप शिवसेना-भाजपाच्या युतीचा निर्णय झाला नाही. ज्यांना जादा भीती वाटते, ते सर्वप्रकारची अ‍ॅडजेस्टमेंट करतात.

राज्यातील राजकीय सर्व्हे पाहता काँग्रेस-राष्टÑवादीला एकत्र आल्याशिवाय पर्याय नसल्याचे रिपोर्ट आहेत. २०१४ साली काँग्रेस-राष्टÑवादी विधानसभेला विरोधात लढले होते, त्याचा फटका त्यांना बसला. यावेळी आघाडी नाही झाली तर त्याचा फटका विशेषत: राष्टÑवादीला जादा बसेल. २०१४ साली राज्यात राष्टÑवादीचे ४१ आमदार निवडून आले होते. आता मात्र काँग्रेस व राष्ट्रवादी स्वतंत्र लढल्यास राष्टÑवादीचे १० आमदारसुद्धा येतील की नाही शंका आहे. या उलट काँग्रेसची पाळेमुळे घट्ट आहेत, असे सांगत राष्टÑवादीवर निशाणा साधला.

राज्यातील सेना नेते म्हणतात, सध्या शिवसेना व भाजपात ‘आम्ही काय कुणाचे खातो, तो राम आम्हाला देतो,’ अशा विचारांची व अहंमभावना असलेले कार्यकर्ते आहेत. त्यांना सत्ता कोणाचीही येवो, त्याशी काही घेणे-देणे नाही. शेवटी शिवसेना काय? भाजपा किंवा अन्य राजकीय पक्ष काय, ही सारी माया आहे. मात्र भाजपा युतीसाठी प्रयत्नशील आहे. शेवटी जे ठरेल ते होईल. भाजपाचा पाया भक्कम आहे. त्यामुळे राज्यात व देशात पक्ष बॅकफूटवर कधीही नव्हता, तो जाणार नाही, असा विश्वासही नामदार पाटील यांनी व्यक्त केला.

युती न झाल्यास स्वतंत्र लढूच्आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पार्टी-शिवसेना युती झाली पाहिजे, असा भाजपाचा सद्यस्थितीत मूड असून, ज्या मतदारसंघात शिवसेनेच्या विद्यमान खासदार आहेत त्या ठिकाणी भाजपा दावा करणार नाही. उगाच जागा वाटपावरून भांडणे नकोत. मात्र युती झाली नाही, तर भाजपा स्वतंत्रपणे निवडणुकांना सामोरे जाईल, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. 

बार्शी मंडळाचा दुष्काळात समावेश करूच्राज्याची आर्थिक स्थिती चांगली आहे. बार्शी ते कुर्डूवाडी रस्त्याचे काम मार्गी लावले. यासारख्या लोकहिताच्या कामांची मागणी बार्शीकरांनी केल्यास ती निश्चित पूर्ण करू. बार्शी शहर मंडळाचा समावेश दुष्काळी मंडळात करण्यासाठी जिल्हाधिकाºयांनी त्या संबंधीचा अहवाल पाठविल्यानंतर बार्शी मंडळाचा दुष्काळी मंडळात समावेश करू, असे पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Solapurसोलापूरchandrakant patilचंद्रकांत पाटीलShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस