शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदावर कोण बसणार? एनडीए खासदारांनी घेतले प्रशिक्षण, तर इंडिया आघाडीचे आज मॉक पोल
2
Ganesh Visarjan 2025: राज्यात गणेश विसर्जनावेळी ९ जणांचा बुडून मृत्यू; १२ जण बेपत्ता
3
दहशतवादी कट प्रकरणात मोठी कारवाई, जम्मू-काश्मीरसह ५ राज्यांमध्ये एनआयएची धाड
4
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२३,५०८ चं फिक्स व्याज, गॅरेंटीसह मिळेल रक्कम
5
W W W ... पाकिस्तानच्या मोहम्मद नवाजची हॅटट्रिक, Asia Cupआधी उडवली फलंदाजांची झोप
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये वर्षाला ₹५०,००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळतील १३ लाख, व्हाल मालामाल
7
ट्रम्प यांच्या टॅरिफ'वर तोडगा काढण्यासाठी भारत अन् युरोपियन युनियन एकत्र! 'एफटीए'सह अनेक मुद्द्यांवर विशेष प्लान बनवला
8
US Open 2025: अल्काराझचं राज्य! हार्ड कोर्टवर सिनरला मात देत अमेरिकन ओपन जेतेपदासह नंबर वनवर कब्जा
9
"गुजरातवरुन आणलेला महागडा तराफा राजाला आवडला नसेल...", 'लालबागचा राजा' विसर्जनावरुन मराठी अभिनेत्रीची खोचक पोस्ट
10
भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा, ३६ तासांनी विसर्जन; राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी
11
Crime: कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळला अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह, परिसरात खळबळ!
12
जेद्दाह किनाऱ्याजवळ केबल तुटली, इंटरनेटचा स्पीड झाला कमी
13
जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? श्रीमंत-गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार
14
अग्रलेख: माफियांपुढे ‘दादा’गिरी शरण, योग्य तो बोध घ्यावा
15
दिवाळीत मध्य रेल्वेच्या ९४४ एक्स्प्रेस गाड्या धावणार; प्रवाशांच्या सुविधांसाठी अनारक्षित व्यवस्था
16
किम जोंग-पुतीन भेटीत ग्लास, ठशांचं रहस्य! ‘सीक्रेट’ कायम सीक्रेटच राहू द्यावं
17
अदानी लिमिटेडविरुद्धचा ‘तो’ मानहानिकारक मजकूर नष्ट करा; उच्च न्यायालयाचे निर्देश, प्रकरण काय? 
18
एक वर्ष पूर्ण होण्याआधीच जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा पायउतार
19
भारताने रशियाकडून केली तेल खरेदी, अन् नवारो-मस्क यांच्यात भडका! काय म्हणाले होते नवारो?
20
पीडित मुलगी ठाम तर नराधमास शिक्षा होणारच; १० वर्षांच्या मुलीवर बलात्कार, आरोपीला १२ वर्षांचा कारावास 

पावसाच्या पाण्याने बोरामणी येथील शेततळ्यात पावणेदोन कोटी लिटर पाणी भरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 12:12 IST

सोलापूर : सोलापूर म्हटले की दुष्काळी जिल्हा अशी ओळख. यंदा तर ५० टक्केही पाऊस नसल्याने सगळीकडे पाणीटंचाईच. अशा परिस्थितीत ...

ठळक मुद्देबोरामणीच्या शेतकºयाचा उपक्रम वीस एकर द्राक्षबाग बहरली, मुख्यमंत्र्यांनी केले कौतुकपावसाच्या पाण्याने पावसाळ्यात शेततळे भरून घेतले

सोलापूर : सोलापूर म्हटले की दुष्काळी जिल्हा अशी ओळख. यंदा तर ५० टक्केही पाऊस नसल्याने सगळीकडे पाणीटंचाईच. अशा परिस्थितीत दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथील शेतकरी सिद्राम बिराजदार यांनी एक नव्हे, दोन नव्हे तर तब्बल पावणेदोन कोटी लिटर पाण्याचा साठा शेततळ्यात पावसाच्या पाण्याने करून ठेवला आहे. या पाण्यावर बिराजदार यांची वीस एकर द्राक्षबाग बहरत असून त्यांच्या या उपक्रमाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही भरभरून कौतुक केले आहे.

बिराजदार यांनी मागील वर्षी आपल्या शेतात सुमारे अर्धा एकर क्षेत्रात सामूहिक शेततळे योजनेतून तळे बांधले. यासाठी त्यांना तब्बल १५ लाख रुपयांचा खर्च आला आहे. राज्य शासनाचे त्यांना ३ लाख ३९ हजार रुपयांचे अनुदान यासाठी मिळाले आहे. शेततळे पूर्ण झाल्यानंतर उन्हाळ्यात पाण्याची सोय व्हावी, यासाठी बिराजदार यांनी पावसाच्या पाण्याने पावसाळ्यात शेततळे भरून घेतले. त्यानंतर विहीर व बोअरच्या पाण्याचाही साठा याठिकाणी केला. त्यामुळे त्यांच्या आज सुमारे वीस एकर द्राक्षबागेस पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 

शेततळ्यामधील पाण्याचा आधार असल्याने बिराजदार यांनी सरिता, नानासाहेब, थॉमसन, आर. के., शरद, मणिकर, डबल एस आदी जातींची द्राक्षलागवड केली आहे. यासाठी त्यांनी आतापर्यंत वीस एकर क्षेत्रासाठी तीस ते चाळीस लाख रुपयांचा खर्चही औषधे, मजुरी आदींसाठी केला आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसंवाद कार्यक्रमांतर्गत बिराजदार शेतकरी कुटुंबीयांशी व्हिडीओ कॉन्फरन्सने सोमवारी संवाद साधला. सोलापूर जिल्ह्यात ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस असताना शेततळ्याच्या माध्यमातून सुरू असलेल्या बागायती शेतीचे त्यांनी भरभरून कौतुक केले. शेततळे बांधण्यासाठी अनुदान अपुरे असून अनुदान वाढविण्यात यावे, ठिबक सिंचनसाठी शंभर टक्के अनुदान देण्यात यावे, अशी मागणी यावेळी सिद्राम बिराजदार यांचे सुपुत्र आप्पा यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली. मागेल त्याला शेततळे योजना व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना या दोन्ही योजनांतून शेततळे घेण्याचा मार्ग आता मोकळा असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. बागायतदार शेतकरी सिद्राम यांच्या पत्नी निर्मला यांच्याशीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी संवाद साधला. 

एक कोटीचे द्राक्ष काढणार - बिराजदार- शेततळ्याच्या पाण्यावर विविध प्रकारच्या जातीचे द्राक्ष उत्पादन घेण्याचा प्रयत्न आमच्याकडून होत आहे. गतवर्षी सुमारे ५० लाख रुपयांची द्राक्षं यु.के व बांगलादेश यासारख्या देशासाठी निर्यात झाली आहेत. यंदाच्या वर्षीही निर्यात होणार असून, यातून सुमारे एक कोटी रुुपये उत्पन्न मिळण्याची अपेक्षा असल्याची प्रतिक्रिया यावेळी आप्पा बिराजदार यांनी दिली. 

टॅग्स :SolapurसोलापूरSolapur Collector Officeसोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयFarmerशेतकरीagricultureशेतीWaterपाणीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसgovernment schemeसरकारी योजना