शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट पुन्हा १० रुपये; अनलॉकनंतर रेल्वेची प्रवासी संख्या वाढतेय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 14:36 IST

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने आता रेल्वेला प्रवाशांचा प्रतिसाद चांगला मिळत आहे.

सोलापूर : राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने आता रेल्वेला प्रवाशांचा प्रतिसाद चांगला मिळत आहे. सोलापूरहून मुंबई, पुण्यासह तिरुपतीच्या बालाजी दर्शनासाठी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या अधिक दिसून येत आहे. अनलॉक झाल्यानंतर रेल्वेने ५० रुपये प्लॅटफॉर्म तिकिटाची रक्कम आता १० रुपये केली आहे. दुसरीकडे कोरोनाकाळात सोलापूरमार्गे धावणाऱ्या बऱ्याच मेल, एक्सप्रेस, पॅसेंजर रेल्वे बंदच असल्याने सोलापूर रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीही मंदावली आहे.

दुसऱ्या टप्प्यात मार्च महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने निर्बंध कडक करण्यात आले होते. त्यामुळे प्रवासावरही मर्यादा आल्या. दुसऱ्या लाटेत जवळपास दीड ते दोन महिने रेल्वेसेवा प्रभावित होती. अनलॉकच्या टप्प्यात आता रेल्वेसेवा पूर्ववत झाली आहे. दुसरीकडे पॅसेंजर रेल्वे अद्यापही बंदच आहेत. एक्स्प्रेस रेल्वे प्रवासाला प्रवाशांचा हळूहळू प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येते. सोलापूरहून धावणाऱ्या सिद्धेश्वर, इंद्रायणी, इंटरसिटीसह अन्य रेल्वे गाड्या व पॅसेंजर गाड्या सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

 

तरच...प्लॅटफॉर्म तिकीट विक्री वाढेल...

सोलापूर विभागात विशेष एक्सप्रेस गाड्या सुरू आहेत. कोरोनाकाळात सोलापूरसह विभागातील अन्य रेल्वे स्थानकावर फारशी गर्दी नव्हती. पॅसेंजरही बंद असल्याने प्रवासी संख्या घटली होती. नियमित व पॅसेंजर रेल्वे गाड्या सुरू झाल्यानंतर सर्वसामान्य लोक रेल्वेने मोठ्या प्रमाणात प्रवास करतील, त्यामुळे प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीच्या संख्येेत वाढ होईल असे रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. विशेष एक्सप्रेसचा दर्जा असलेल्या गाड्या आता नियमित कराव्यात अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.

०००००

प्रवासी संख्या हळूहळू वाढतेय...

अनलॉकच्या टप्प्यात प्रवासावरील निर्बंध हटले आहेत. सोलापूरमार्गे काही एक्सप्रेस रेल्वे धावतात. त्यामुळे प्रवासी संख्या हळूहळू वाढत असल्याचे दिसून येते. सोलापूरहून मुंबई, पुण्यासह तिरुपती बालाजीच्या दर्शनासाठी सोलापुरातून जाणाऱ्या भाविकांची संख्या सर्वात जास्त आहे. सध्या सोलापूर स्टेशनवरून हैदराबाद, तिरुपती, मुंंबई, पुणे, दिल्लीसह अन्य शहराकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

 

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे बऱ्याच रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. पहिली लाट ओसरल्यामुळे काही काळासाठी रेल्वेसेवा पुन्हा पूर्ववत झाली; परंतु त्यानंतर अल्पावधीतच कोरोनाची दुसरी लाट आली. दुसऱ्या लाटेत जवळपास तीन महिने रेल्वेसेवा पुन्हा प्रभावित झाली. अनलॉकच्या टप्प्यात सोलापूरमार्गे बऱ्याच एक्स्प्रेस गाड्या धावत आहेत. हळूहळू प्रवाशांचा प्रतिसाद मिळत आहे. लवकरच गाड्यांच्या संख्येतही वाढ हाेईल.

- प्रदीप हिरडे, वरिष्ठ वाणिज्य मंडल प्रबंधक, सोलापूर मंडल.

 

 

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेcentral railwayमध्य रेल्वेcorona virusकोरोना वायरस बातम्या