शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

सोलापूरसह पुणे, सातारा जिल्ह्यात ६० साखर कारखान्यांकडे एफआरपीचे थकले १३८५ कोटी

By appasaheb.patil | Updated: December 20, 2018 16:31 IST

एफआरपी रक्कम: आरआरसी कारवाईची साखर आयुक्तांकडे शिफारस

ठळक मुद्देकायद्यानुसार एफआरपी थकविणाºया कारखान्यांवर कारवाई केली जाईल - सुभाष देशमुखसाखर कारखानदारी अडचणीत आहे हे खरे असले तरी शेतकºयांचे पैसे वेळेवर मिळाले पाहिजेत, हा शासनाचा आग्रह राहणार आहे - सुभाष देशमुख

सोलापूर : पुणे विभागातील पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील एफआरपी (रास्त किफायतशीर दर) थकविणाºया साखर कारखान्यांची आरआरसीनुसार(महसुली कायदा) कारवाई करण्याची शिफारस पुणे विभागीय सहसंचालक कार्यालयाने साखर आयुक्तांकडे केली आहे. विभागातील ६० कारखान्यांकडे १३८४ कोटी ७९ लाख रुपये इतकी रक्कम थकली आहे.

पुणे विभागातील ६२ साखर कारखान्यांनी यावर्षी गाळप सुरू केले असून, दोन कारखान्यांनी अहवाल दिला नाही. ६० पैकी एकाही कारखान्याने नियमानुसार एफआरपी दिली नसल्याचे सहसंचालकाच्या पत्रात म्हटले आहे. एक नोव्हेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत पुणे, सातारा व सोेलापूर जिल्ह्यातील ६० कारखान्यांनी ८८ लाख ५५ हजार ९६१ मे. टन गाळप केले आहे. या कारखान्यांनी एक महिन्यात गाळपाला आणलेल्या उसाचे एफआरपीनुसार २१४२ कोटी ७ लाख रुपये देणे आहे; मात्र यापैकी २९ साखर कारखान्यांनी ७५७ कोटी ९७ लाख रुपये दिले आहेत. ३१ कारखान्यांनी अद्याप एक रुपयाही शेतकºयांना दिला नाही. एकूणच ६० कारखान्यांकडे १३८४ कोटी ७९ लाख रुपये एफआरपीचे देणे अडकले आहेत. २९ साखर कारखान्यांनी एफआरपीच्या सरासरी ३५ टक्के रक्कम शेतकºयांना दिली आहे. ३१ कारखान्यांनी  एक दमडाही अद्याप दिला नसल्याचे साखर आयुक्तांना दिलेल्या पत्रात दिसत आहे.

सहसंचालकांनी दिला अहवाल 

  • - १५ डिसेंबरच्या माहितीनुसार पुणे सहसंचालकांनी साखर आयुक्तांना १८ डिसेंबर रोजी आरआरसी कारवाई करण्याचे पत्र आॅनलाईन दिले आहे.
  • - सातारा जिल्ह्यातील सर्वच    १३ कारखान्यांनी अद्याप एक रुपयाही दिलेला नाही.
  • - पुणे जिल्ह्यातील १७ कारखान्यांपैकी १३ कारखान्यांनी एफआरपीपोटी काहीअंशी रक्कम दिली असून चार कारखान्यांनी काहीही रक्कम दिली नाही.
  • - सोलापूर जिल्ह्यातील ३० पैकी १६ साखर कारखान्यांनी एफआरपीपोटी काही रक्कम दिली आहे.

गोकुळ माऊली, वसंतराव काळे आघाडीवर - पुणे विभागात गोकुळ माऊली शुगरने एफआरपीच्या  ९२ टक्के, सहकार शिरोमणी वसंतराव काळे कारखान्याने ९० टक्के रक्कम शेतकºयांना दिली आहे. विठ्ठलराव शिंदे व भीमा सहकारी प्रत्येकी ८३ टक्के,पांडुरंग व संत तुकाराम प्रत्येकी ८२ टक्के, सोमेश्वर व आदिनाथ प्रत्येकी ८० टक्के, पराग ८१ टक्के,बारामती अ‍ॅग्रो ५८ टक्के,जकराया ५४ व इंद्रेश्वर कारखान्याने ५२ टक्के रक्कम दिली आहे. 

साखर कारखानदारी अडचणीत आहे हे खरे असले तरी शेतकºयांचे पैसे वेळेवर मिळाले पाहिजेत, हा शासनाचा आग्रह राहणार आहे. कायद्यानुसार एफआरपी थकविणाºया कारखान्यांवर कारवाई केली जाईल.- सुभाष देशमुख, सहकार व पणन मंत्री 

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेFarmerशेतकरीagricultureशेती