शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

प्रवाशांनी ठोकला सोलापूर रेल्वे स्थानकावरच मुक्काम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 13:23 IST

मुंबईतील पावसाचा फटका : बालगोपाळ, आबालवृद्ध हैराण 

ठळक मुद्देमुंबईत धुवाधार पावसाचा फटका या प्रवाशांना बसलामुंबईकडे जाणाºया रेल्वे गाड्या अन् राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्या रद्दचहा, नाष्टा अन् जेवण स्थानकावरच करावे लागत असल्याने त्यांचे हाल

सोलापूर : मुंबईकडे जाणाºया रेल्वे गाड्या अन् राज्य परिवहन महामंडळाच्या गाड्या रद्द करण्यात आल्याने तिकडे जाणाºया प्रवाशांना स्थानकावरच मुक्काम ठोकावा लागला. चहा, नाष्टा अन् जेवण स्थानकावरच करावे लागत असल्याने त्यांचे हाल होत असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. मुंबईत धुवाधार पावसाचा फटका या प्रवाशांना बसला आहे. कोणाला मुंबईला उपचाराला जायचे आहे तर कोणाला पाहुण्यांना भेटायला... कुणाला मुंबईहून इतर ठिकाणी पर्याटनाला तर कुणाला व्यापार-व्यवसायाच्या निमित्ताने... मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे अनेक रेल्वे आणि एसटी गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवासाचे केलेले नियोजन कोलमडल्याचे स्थानकावर थांबलेल्या काही प्रवाशांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. आता पाऊस कधी थांबणार आणि आपण कधी मुंबईला पोहोचू, याच प्रतीक्षेत आता प्रवासी बसले आहेत. 

वीज गायब...- एकीकडे प्रवाशांना गावी जाण्यासाठी गाडी मिळत नसल्यामुळे प्रवाशांना नाईलाजाने रेल्वे स्टेशन आणि एसटी स्टँडवर आसरा घ्यावा लागत आहे़ मंगळवारी सकाळी एसटी स्टँडवरील वीज गेली़ सकाळी गेलेली वीज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास आली़ यामुळे प्रवाशांकडून संताप व्यक्त करण्यात येत होता़

मला गुरूवारी डोळ्याच्या आॅपरेशनसाठी चेन्नईला जायचे आहे़ पण यासाठी मी मंगळवारी स्टेशनवर आलो असता चेन्नईला जाणारी गाडी रद्द झाली असल्याचे कळाले़ यामुळे मला नाईलाजाने येथेच थांबून दुसºया गाडीची वाट पहावे लागत आहे़ दुसरी गाडी जाईल का नाही याबाबत मनात शंका निर्माण होत  आहे़-ए़ यादवरेल्वे प्रवासी 

टॅग्स :Solapurसोलापूरrailwayरेल्वेMumbaiमुंबईMumbai Rain Updateमुंबई मान्सून अपडेटRainपाऊस