शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
4
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
5
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
6
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
7
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
8
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
9
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
10
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
11
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
12
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
13
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
14
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
15
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
16
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
17
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
18
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
19
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
20
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही

मुलांच्या जडणघडणीत पालकांची भूमिका...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 12:22 IST

कोणतेही मूल ते लहान असो किंवा तरुण हे त्या कुटुंबाचे, समाजाचे, देशाचे प्रसंगी जगाचे भविष्य असते.

ठळक मुद्देआई-वडील दिवसभर नोकरी, व्यवसायानिमित्त व्यस्त असले तरी दिवसातून काही वेळ तरी मुलांसाठी ते नक्की देऊ शकतात. कोणतीही गोष्ट तो आई-वडिलांपाशी बोलेल एवढा मोकळेपणा या नात्यात असणे गरजेचे आहे

लहान मूल म्हणजे एक कोरी करकरीत पाटी. त्या पाटीवर जसे गिरवाल तसे त्याचे व्यक्तिमत्त्व घडत जाते, त्याचे आयुष्य बनत जाते. पण या पाटीवर गिरविण्याची मुख्य भूमिका कोणाची?, तर ती त्याच्या पालकाची म्हणजेच आई-वडिलांची, त्यानंतर मग त्याचे शिक्षक, मित्रमंडळी व समाजाची. यातील नंतरचे घटक निवडण्यामध्ये व त्यावर लक्ष ठेवण्यामध्ये पालक आपली भूमिका चांगल्या रितीने वठवू शकतात. पण पालकाची भूमिका चुकली तर सारेच चित्र बिघडू शकते. लहान मूल विशेषत: आईच्या अगदी जवळ असते़ त्यास योग्य ते संस्कार करणे, चांगले वळण लावणे, शिस्त लावणे हे आईशिवाय चांगल्या रीतीने कोण करू शकेल? मूल शाळेत जायला लागल्यानंतर मात्र ही जबाबदारी आई-वडील दोघांची बनते. 

ज्या घरात आजी- आजोबा आहेत त्या घरात मुलांच्या जडणघडणीत त्यांचादेखील वाटा असतो. आजच्या काळात आई-वडील दोघांनाही नोकरी, व्यवसाय करणे क्रमप्राप्त असले तरी एकत्र कुटुंब टिकवणे, मुलांना त्यांच्या आजी-आजोबांच्या छायेत ठेवणे हे तरी पालक निश्चितपणे करू शकतात. 

आई-वडील दिवसभर नोकरी, व्यवसायानिमित्त व्यस्त असले तरी दिवसातून काही वेळ तरी मुलांसाठी ते नक्की देऊ शकतात. त्याच्याशी संवाद साधू शकतात. त्याच्या शाळा, कॉलेजमध्ये सध्या काय चालू आहे? त्याची मित्रमंडळी कोण आहेत? मोबाईल, इंटरनेटवर तो नक्की काय पाहतोय ? त्याच्या वर्तणुकीतील वेळोवेळी होणारे बदल याच्यावर बारकाईने लक्ष ठेवणे हे क्रमप्राप्त आहे. कोणतीही गोष्ट तो आई-वडिलांपाशी बोलेल एवढा मोकळेपणा या नात्यात असणे गरजेचे आहे. मुलाला त्याच्या आई-वडिलांशिवाय कोणीही इतर व्यक्ती चांगल्या रीतीने समजू शकत नाही. त्यासाठी पालकांनी आपली भूमिका चोख बजावणे गरजेचे आहे.

आपल्या पाल्यासाठी योग्य शाळा, कॉलेज निवडणे, चांगल्या मित्राचे महत्त्व त्याला सांगणे, समाजातील चांगल्या घटनांचे त्यास साक्षीदार बनविणे व वाईट प्रवृत्ती, घटनांपासून त्यास दूर ठेवणे यात पालक म्हणून आपण कशी भूमिका निभावतो यावर या इतर घटकांचा चांगला, वाईट परिणाम त्याच्या व्यक्तिमत्त्वावर पडत असतो. त्यामुळे या घटकांचीदेखील खरी दोर ही पालकांच्याच हातात असते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही .

चांगली शाळा, कॉलेज, मित्रमंडळी, समाजातील घटक नक्कीच त्याचे व्यक्तिमत्त्व फुलविण्यास मदत करतात. पालक आपल्या मुलांसाठी रात्रंदिवस झटत असतात. त्याच्या भविष्याची गुंतवणूक करीत असतात. या धावपळीत, व्यस्ततेत जी मुख्य गुंतवणूक म्हणजे त्यांची मुले, यांच्याकडे त्यांचे दुर्लक्ष होऊ शकते. पालक आपली व्यस्ततेची सबब पुढे करतात. पण जी तुमची अनमोल गुंतवणूक आहे ती मुले व्यसनी, परावलंबी, शिक्षणात पीछेहाट झालेली, गुन्हेगार प्रवृत्तीची झालेली आपल्याला परवडणार आहे का?मुलांना प्रोत्साहन देणे, अपयशामध्ये खंबीरपणे त्याच्या पाठीशी राहणे, खेळ, साहित्य, कला यामध्ये त्याचा रस निर्माण करणे. विविध स्पर्धेमध्ये त्याचा सहभाग करून घेणे, आपल्या संस्कृतीची, परंपरेची त्यास नीटशी ओळख करू देणे या सर्व कामी पालक म्हणून आपण सक्रिय असणे गरजेचे आहे. एखाद्या वेळेस मुले चुकली तर त्यास योग्य त्या वाटेवर आणणे, त्याच त्याच चुकांपासून त्यास परावृत्त करणे, आपल्या जीवनातील चांगल्या-वाईट अनुभवांचे सार त्यास देणे हे पालकाशिवाय दुसरे चांगल्या रितीने कोण करू शकेल? 

कोणतेही मूल ते लहान असो किंवा तरुण हे त्या कुटुंबाचे, समाजाचे, देशाचे प्रसंगी जगाचे भविष्य असते. त्याचे योग्य ते पालनपोषण करणे, भविष्याची निगा राखणे, त्याचे एका चांगल्या व्यक्तीत रूपांतर करणे यात पालकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. इतिहासातील महापुरूषांच्या जीवनावरून या गोष्टीला बळकटी प्राप्त होते. आपल्या व्यस्ततेला, धावपळीला, भविष्यातील गुंतवणुकीला, करीअरला थोडासा लगाम घालून पालकांनी आपली भूमिका काटेकोरपणे बजावली तर मुलांचे भविष्य नक्कीच उज्वल बनेल, यात कोणतीही शंका नाही.  - महेश भा. रायखेलकर(लेखक संगणक प्रशिक्षक आहेत.) 

टॅग्स :SolapurसोलापूरStudentविद्यार्थीSchoolशाळाEducationशिक्षण