शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

मुलांच्या जडणघडणीत पालकांची भूमिका...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 12:22 IST

कोणतेही मूल ते लहान असो किंवा तरुण हे त्या कुटुंबाचे, समाजाचे, देशाचे प्रसंगी जगाचे भविष्य असते.

ठळक मुद्देआई-वडील दिवसभर नोकरी, व्यवसायानिमित्त व्यस्त असले तरी दिवसातून काही वेळ तरी मुलांसाठी ते नक्की देऊ शकतात. कोणतीही गोष्ट तो आई-वडिलांपाशी बोलेल एवढा मोकळेपणा या नात्यात असणे गरजेचे आहे

लहान मूल म्हणजे एक कोरी करकरीत पाटी. त्या पाटीवर जसे गिरवाल तसे त्याचे व्यक्तिमत्त्व घडत जाते, त्याचे आयुष्य बनत जाते. पण या पाटीवर गिरविण्याची मुख्य भूमिका कोणाची?, तर ती त्याच्या पालकाची म्हणजेच आई-वडिलांची, त्यानंतर मग त्याचे शिक्षक, मित्रमंडळी व समाजाची. यातील नंतरचे घटक निवडण्यामध्ये व त्यावर लक्ष ठेवण्यामध्ये पालक आपली भूमिका चांगल्या रितीने वठवू शकतात. पण पालकाची भूमिका चुकली तर सारेच चित्र बिघडू शकते. लहान मूल विशेषत: आईच्या अगदी जवळ असते़ त्यास योग्य ते संस्कार करणे, चांगले वळण लावणे, शिस्त लावणे हे आईशिवाय चांगल्या रीतीने कोण करू शकेल? मूल शाळेत जायला लागल्यानंतर मात्र ही जबाबदारी आई-वडील दोघांची बनते. 

ज्या घरात आजी- आजोबा आहेत त्या घरात मुलांच्या जडणघडणीत त्यांचादेखील वाटा असतो. आजच्या काळात आई-वडील दोघांनाही नोकरी, व्यवसाय करणे क्रमप्राप्त असले तरी एकत्र कुटुंब टिकवणे, मुलांना त्यांच्या आजी-आजोबांच्या छायेत ठेवणे हे तरी पालक निश्चितपणे करू शकतात. 

आई-वडील दिवसभर नोकरी, व्यवसायानिमित्त व्यस्त असले तरी दिवसातून काही वेळ तरी मुलांसाठी ते नक्की देऊ शकतात. त्याच्याशी संवाद साधू शकतात. त्याच्या शाळा, कॉलेजमध्ये सध्या काय चालू आहे? त्याची मित्रमंडळी कोण आहेत? मोबाईल, इंटरनेटवर तो नक्की काय पाहतोय ? त्याच्या वर्तणुकीतील वेळोवेळी होणारे बदल याच्यावर बारकाईने लक्ष ठेवणे हे क्रमप्राप्त आहे. कोणतीही गोष्ट तो आई-वडिलांपाशी बोलेल एवढा मोकळेपणा या नात्यात असणे गरजेचे आहे. मुलाला त्याच्या आई-वडिलांशिवाय कोणीही इतर व्यक्ती चांगल्या रीतीने समजू शकत नाही. त्यासाठी पालकांनी आपली भूमिका चोख बजावणे गरजेचे आहे.

आपल्या पाल्यासाठी योग्य शाळा, कॉलेज निवडणे, चांगल्या मित्राचे महत्त्व त्याला सांगणे, समाजातील चांगल्या घटनांचे त्यास साक्षीदार बनविणे व वाईट प्रवृत्ती, घटनांपासून त्यास दूर ठेवणे यात पालक म्हणून आपण कशी भूमिका निभावतो यावर या इतर घटकांचा चांगला, वाईट परिणाम त्याच्या व्यक्तिमत्त्वावर पडत असतो. त्यामुळे या घटकांचीदेखील खरी दोर ही पालकांच्याच हातात असते असे म्हटले तर वावगे ठरणार नाही .

चांगली शाळा, कॉलेज, मित्रमंडळी, समाजातील घटक नक्कीच त्याचे व्यक्तिमत्त्व फुलविण्यास मदत करतात. पालक आपल्या मुलांसाठी रात्रंदिवस झटत असतात. त्याच्या भविष्याची गुंतवणूक करीत असतात. या धावपळीत, व्यस्ततेत जी मुख्य गुंतवणूक म्हणजे त्यांची मुले, यांच्याकडे त्यांचे दुर्लक्ष होऊ शकते. पालक आपली व्यस्ततेची सबब पुढे करतात. पण जी तुमची अनमोल गुंतवणूक आहे ती मुले व्यसनी, परावलंबी, शिक्षणात पीछेहाट झालेली, गुन्हेगार प्रवृत्तीची झालेली आपल्याला परवडणार आहे का?मुलांना प्रोत्साहन देणे, अपयशामध्ये खंबीरपणे त्याच्या पाठीशी राहणे, खेळ, साहित्य, कला यामध्ये त्याचा रस निर्माण करणे. विविध स्पर्धेमध्ये त्याचा सहभाग करून घेणे, आपल्या संस्कृतीची, परंपरेची त्यास नीटशी ओळख करू देणे या सर्व कामी पालक म्हणून आपण सक्रिय असणे गरजेचे आहे. एखाद्या वेळेस मुले चुकली तर त्यास योग्य त्या वाटेवर आणणे, त्याच त्याच चुकांपासून त्यास परावृत्त करणे, आपल्या जीवनातील चांगल्या-वाईट अनुभवांचे सार त्यास देणे हे पालकाशिवाय दुसरे चांगल्या रितीने कोण करू शकेल? 

कोणतेही मूल ते लहान असो किंवा तरुण हे त्या कुटुंबाचे, समाजाचे, देशाचे प्रसंगी जगाचे भविष्य असते. त्याचे योग्य ते पालनपोषण करणे, भविष्याची निगा राखणे, त्याचे एका चांगल्या व्यक्तीत रूपांतर करणे यात पालकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. इतिहासातील महापुरूषांच्या जीवनावरून या गोष्टीला बळकटी प्राप्त होते. आपल्या व्यस्ततेला, धावपळीला, भविष्यातील गुंतवणुकीला, करीअरला थोडासा लगाम घालून पालकांनी आपली भूमिका काटेकोरपणे बजावली तर मुलांचे भविष्य नक्कीच उज्वल बनेल, यात कोणतीही शंका नाही.  - महेश भा. रायखेलकर(लेखक संगणक प्रशिक्षक आहेत.) 

टॅग्स :SolapurसोलापूरStudentविद्यार्थीSchoolशाळाEducationशिक्षण