शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
3
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
4
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
5
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
6
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
7
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
8
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
9
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
10
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
11
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
12
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
14
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
15
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
16
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
17
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
18
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

देशाचा शत्रू पाकिस्तान की शेतकरी? खासदार राजू शेट्टी यांचा भांबुडी येथील शेतकरी मेळाव्यात सवाल, भाजप सरकारवर जोरदार टिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 2:24 PM

जिल्ह्यातील उसाला भाव कमी का? ऊस तुटल्यानंतर १४ दिवसात रक्कम दिली पाहिजे. नाही दिली तर १५ टक्के व्याज द्यावे, तो देण्याचा कायदा आहे. मग कारखान्याची मालमत्ता जप्त करून शेतकºयांचे पैसे दिले पाहिजेत.

ठळक मुद्दे विकास हवा पण शेतकºयांची थडगी बांधून विकास नको : खा. राजू शेट्टीभांबुर्डी (ता. माळशिरस) येथील काकासाहेब मोटे यांनी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होतेशेतकºयांच्या नुकसानीची एका वर्षाची तफावत ६.५० लाख कोटी : खा. राजू शेट्टी

आॅनलाइन लोकमत सोलापूरमाळशिरस दि २८ : जिल्ह्यातील उसाला भाव कमी का? ऊस तुटल्यानंतर १४ दिवसात रक्कम दिली पाहिजे. नाही दिली तर १५ टक्के व्याज द्यावे, तो देण्याचा कायदा आहे. मग कारखान्याची मालमत्ता जप्त करून शेतकºयांचे पैसे दिले पाहिजेत. कमी रिकव्हरीच्या नावाखाली किती दिवस लूट करणार?, साखरेचे दर पडले म्हणून आम्ही दर कमी घेणार नाही. २०१३ च्या कायद्यानुसार जोपर्यंत शेतकरी संमती देत नाही तोपर्यंत रस्ता करता येत नाही. विकास हवा पण शेतकºयांची थडगी बांधून विकास नको आहे. या सरकारने पाकिस्तानातून माल आयात केला. नेमका या सरकारचा शत्रू कोण पाकिस्तान की शेतकरी? असा सवाल खा. राजू शेट्टी यांनी उपस्थित केला.भांबुर्डी (ता. माळशिरस) येथील काकासाहेब मोटे यांनी आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी काकासाहेब मोटे, अमर कदम, अमोल हिप्परगे, जयंत बगाडे, अनिल पवार, सुरेश मोटे, भीमराव फुले, राहुल बिडवे, किरण साठे, सरपंच केशव वाघमोडे, देविदास वाघमोडे, आप्पासाहेब कर्चे, प्रेमानंद नरुटे, अ‍ॅड. संजय माने, मदनसिंह जाधव, बापू गायकवाड, शिवाजी पाटील, राजाभाऊ वाघमोडे आदी उपस्थित होते.माळशिरस तालुका एकेकाळी स्वाभिमानी संघटनेचा बालेकिल्ला होता. अनेक वर्षांनंतर खा. शेट्टीचा दौरा झाला. ते म्हणाले, काहीही झाले तरी घामाचा दाम मिळायलाच पाहिजे. स्वामीनाथन आयोगासाठी टाळाटाळ केली जाते. शेतकºयांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा वाढत जातोय. शासनाने जाहीर केलेला हमीभावसुद्धा दिला नाही. शेतकºयांच्या नुकसानीची एका वर्षाची तफावत ६.५० लाख कोटी आहे. अशा सरकारचे उदो उदो करणाºयाला तुडवायलाच पाहिजे, असे त्यांनी सांगितले. यावेळी रवींद्र मोटे, दादासाहेब  वाघमोडे, रामभाऊ कचरे, खंडू कळसुले, महादेव वाघमोडे आदी उपस्थित होते. --------------------शेतकरी संघटनेची पहिली एन्ट्रीअंतर्गत राजकीय घडामोडीनंतर पहिल्यांदाच शेतकरी संघटनेचा छोटेखानी शेतकरी मेळावा घेण्यात आला. यासाठी मात्र शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याचे आयोजन माजी जि. प. सदस्य काकासाहेब मोटे यांच्या पुढाकाराने करण्यात आले. यावेळी राजकारणात पदार्पण केलेल्या  काकांचा उल्लेख जखमी वाघ असा खा. शेट्टी यांनी केला. यावेळी सदाभाऊ खोत यांच्या गाडीची तोडफोड करणारे बापू गायकवाड यांचा सत्कार खा. राजू शेट्टी यांनी केला.------------------इतरांची फटकेबाजी - यावेळी आप्पासाहेब कर्चे यांनी अनेक विषयांना हात घालत नेत्यांवर टीकेची झोड उठवली. जयंत बगाडे यांनी संघटनेच्या कामाचे चित्र उभा करत पक्षाच्या पुढाकाराने शेतकºयांच्या प्रश्नाला वाचा फुटली असून यापुढे  समज-गैरसमज बाजूला ठेवून काम करावे. आपल्या डोक्यावरील कर्जाची नैतिक जबाबदारी आहे. यावेळी काकासाहेब मोटे यांनी शंकर सहकारी, चांदापुरी कारखाना, विजय शुगर व सातारा, लातूर, पुणे, पंढरपूर या राष्ट्रीय महामार्ग बाधित शेतकºयांना आपल्या पुढाकाराने न्याय मिळवून देण्याचे आवाहन केले.

टॅग्स :SolapurसोलापूरRaju Shettyराजू शेट्टी