शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

बार्शीत शालेय पोषण आहारात अपहार; मुख्याध्यापकासह पाच जणांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 11:34 IST

बार्शी : शालेय पोषण आहार शाळेत न शिजवता अन्यत्र तयार करून दिला. त्याबद्दल खोटी कागदपत्रे तयार करून १.९७ लाखांचा अपहार केल्याबद्दल मुख्याध्यापकासह पाच जणांविरुद्ध बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे. राज्य शासनाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना दिला जाणारा शालेय पोषण आहार शाळेतच शिजवून दिला जावा, असे बंधन असताना याची अंमलबजावणी केली नाही. ...

ठळक मुद्देखोटी कागदपत्रे तयार करून १.९७ लाखांचा अपहारमुख्याध्यापकासह पाच जणांविरुद्ध बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा

बार्शी : शालेय पोषण आहार शाळेत न शिजवता अन्यत्र तयार करून दिला. त्याबद्दल खोटी कागदपत्रे तयार करून १.९७ लाखांचा अपहार केल्याबद्दल मुख्याध्यापकासह पाच जणांविरुद्ध बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे. 

राज्य शासनाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना दिला जाणारा शालेय पोषण आहार शाळेतच शिजवून दिला जावा, असे बंधन असताना याची अंमलबजावणी केली नाही. यासंबंधी गटशिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी राजेंद्र भारुड यांच्या आदेशावरून सुलाखे हायस्कूलचे मुख्याध्यापक तथा शालेय समितीचे सचिव ए. जी. पाटकूलकर, समिती सदस्य आनंद सुलाखे, ह. वि. कुंभार, कि. रो. भानावत, अ. गो. कवठाळे (सर्व रा. बार्शी) यांच्या विरोधात तक्रार अर्ज देताच पोलिसांनी फसवणुकीसह अन्य कलमान्वये गुन्हा नोंदला आहे.  

 त्या तक्रारीवरून व दिलेल्या आदेशावरून गटशिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांनी तपासणी केली. त्यानंतर त्यात पाचवीचे २०० तर आठवीचे ८०० असे एक हजार लाभार्थी दाखवून बोगस रेकॉर्ड केल्याचे दिसून आल्याने त्यात १ लाख ९७ हजार ६१३ रुपयांचे ४७९५ किलोग्रॅम तांदळाचा अपहार करण्याच्या उद्देशाने रेकॉर्ड केल्याचे दिसून आले. दिलेल्या तक्रारीत ज्या आरूषी महिला बचत गटास शिजविण्याचे काम दिले आहे, त्यांना रोज मुख्याध्यापक जेवढा तांदूळ देत होते तेवढा ते शिजवून देत होते, असे दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

आहार शाळेतच तयार करणे बंधनकारकपोलिसांच्या माहितीनुसार शालेय पोषण आहार पहिली ते पाचवीच्या मुलांना प्रत्येक शाळेत दररोज १०० ग्रॅम तर सहावी ते आठवीच्या मुलांना १५० ग्रॅम तांदूळ शिजवून द्यावा. त्यात विविध भाज्या घालून मेनू तयार करून त्याचे वाटप करण्यासाठी हा आहार सुरू केला. विशेष म्हणजे तो शाळेतच तयार करणे बंधनकारक आहे. परंतु याचा अंमल व्यवस्थित केला नाही. तो बाहेरून आणून मुलांना वाटप केला. शिवाय शासनाने ठरविलेल्या प्रमाणापेक्षा कमी शिजवला. रेकॉर्डवर जास्त बोगस पटसंख्या दाखवली. त्याचा अपहार होत असताना त्याबाबत शालेय समितीकडे तक्रार देऊनही दखल घेतली नाही. याबाबत शिक्षण मंडळाचे माजी सदस्य व रिपाइंचे शहराध्यक्ष अ‍ॅड. अविनाश गायकवाड, मराठा महासंघ तालुका युवक अध्यक्षांनी १८ जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे तष्रार केली होती.

टॅग्स :SolapurसोलापूरSchoolशाळाSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस