शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

बार्शीत शालेय पोषण आहारात अपहार; मुख्याध्यापकासह पाच जणांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2018 11:34 IST

बार्शी : शालेय पोषण आहार शाळेत न शिजवता अन्यत्र तयार करून दिला. त्याबद्दल खोटी कागदपत्रे तयार करून १.९७ लाखांचा अपहार केल्याबद्दल मुख्याध्यापकासह पाच जणांविरुद्ध बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे. राज्य शासनाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना दिला जाणारा शालेय पोषण आहार शाळेतच शिजवून दिला जावा, असे बंधन असताना याची अंमलबजावणी केली नाही. ...

ठळक मुद्देखोटी कागदपत्रे तयार करून १.९७ लाखांचा अपहारमुख्याध्यापकासह पाच जणांविरुद्ध बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा

बार्शी : शालेय पोषण आहार शाळेत न शिजवता अन्यत्र तयार करून दिला. त्याबद्दल खोटी कागदपत्रे तयार करून १.९७ लाखांचा अपहार केल्याबद्दल मुख्याध्यापकासह पाच जणांविरुद्ध बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे. 

राज्य शासनाच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना दिला जाणारा शालेय पोषण आहार शाळेतच शिजवून दिला जावा, असे बंधन असताना याची अंमलबजावणी केली नाही. यासंबंधी गटशिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांनी जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी राजेंद्र भारुड यांच्या आदेशावरून सुलाखे हायस्कूलचे मुख्याध्यापक तथा शालेय समितीचे सचिव ए. जी. पाटकूलकर, समिती सदस्य आनंद सुलाखे, ह. वि. कुंभार, कि. रो. भानावत, अ. गो. कवठाळे (सर्व रा. बार्शी) यांच्या विरोधात तक्रार अर्ज देताच पोलिसांनी फसवणुकीसह अन्य कलमान्वये गुन्हा नोंदला आहे.  

 त्या तक्रारीवरून व दिलेल्या आदेशावरून गटशिक्षणाधिकारी विष्णू कांबळे यांनी तपासणी केली. त्यानंतर त्यात पाचवीचे २०० तर आठवीचे ८०० असे एक हजार लाभार्थी दाखवून बोगस रेकॉर्ड केल्याचे दिसून आल्याने त्यात १ लाख ९७ हजार ६१३ रुपयांचे ४७९५ किलोग्रॅम तांदळाचा अपहार करण्याच्या उद्देशाने रेकॉर्ड केल्याचे दिसून आले. दिलेल्या तक्रारीत ज्या आरूषी महिला बचत गटास शिजविण्याचे काम दिले आहे, त्यांना रोज मुख्याध्यापक जेवढा तांदूळ देत होते तेवढा ते शिजवून देत होते, असे दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

आहार शाळेतच तयार करणे बंधनकारकपोलिसांच्या माहितीनुसार शालेय पोषण आहार पहिली ते पाचवीच्या मुलांना प्रत्येक शाळेत दररोज १०० ग्रॅम तर सहावी ते आठवीच्या मुलांना १५० ग्रॅम तांदूळ शिजवून द्यावा. त्यात विविध भाज्या घालून मेनू तयार करून त्याचे वाटप करण्यासाठी हा आहार सुरू केला. विशेष म्हणजे तो शाळेतच तयार करणे बंधनकारक आहे. परंतु याचा अंमल व्यवस्थित केला नाही. तो बाहेरून आणून मुलांना वाटप केला. शिवाय शासनाने ठरविलेल्या प्रमाणापेक्षा कमी शिजवला. रेकॉर्डवर जास्त बोगस पटसंख्या दाखवली. त्याचा अपहार होत असताना त्याबाबत शालेय समितीकडे तक्रार देऊनही दखल घेतली नाही. याबाबत शिक्षण मंडळाचे माजी सदस्य व रिपाइंचे शहराध्यक्ष अ‍ॅड. अविनाश गायकवाड, मराठा महासंघ तालुका युवक अध्यक्षांनी १८ जुलै रोजी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडे तष्रार केली होती.

टॅग्स :SolapurसोलापूरSchoolशाळाSolapur Zilla Parishadसोलापूर जिल्हा परिषदCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस